शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शाळा सुरू, मात्र एसटी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST

अहमदनगर : कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनमध्ये एसटी बस बंद झाल्या. त्या अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांचे ...

अहमदनगर : कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनमध्ये एसटी बस बंद झाल्या. त्या अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागात बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, तोट्याच्या भीतीने ते पूर्ण क्षमतेने बस सुरू करण्यास धजावत नाहीत.

लाॅकडाऊनच्या काळात मार्च ते जून असे साधारण चार महिने एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती, परंतु त्यानंतर हळूहळू बस सुरू करण्यात आल्या. सध्या तालुक्याच्या ठिकाणी, तसेच मोठ्या, बाजारपेठेच्या गावांपर्यंत बससेवा सुरू आहे, परंतु पूर्वीप्रमाणे खेड्यापाड्यात बस अद्यापही सुरू नाहीत. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी व गेल्या आठवड्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये पाच ते सहा महिने विद्यार्थी ॲानलाइन अभ्यास करत होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलसह इतर साधने नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विशेषत: दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष लक्षात घेता, त्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊनच अध्ययन करावे लागत आहे, परंतु बहुतांश ठिकाणी बस सुरू नसल्याने, विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. नाइलाजास्तव काही विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे.

नगर विभागात अकरा आगार असून, त्यातून सध्या ४७० बस धावत आहेत. लाॅकडाऊनपूर्वी जिल्हाभर ६५२ बस धावत होत्या. म्हणजे अजूनही १८२ बस बंद असून, त्या ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थ्यांकडून मागणी आल्यानंतर बस सुरू केल्या जातील, असे महामंडळाचे म्हणणे असले, तरी अजूनही अनेक मार्गांवर तोट्यात बस धावत असल्याने महामंडळाने पूर्वीप्रमाणे बससेवा अद्यापही सुरू केलेली नाही. ती कधीपर्यंत सुरू होईल, हेही अद्याप निश्चित नाही.

------------

नगर विभागातील आगार - ११

एकूण बस - ७००

सध्या सुरू - (प्रवाशी- ४७०, बेस्टसाठी ६०, मालवाहू- ८८)

लाॅकडाऊनपूर्वी सुरू - ६५२

--------------

जिल्ह्यात सध्या ८० टक्के एसटी वाहतूक सुरू आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांनी एसटीची मागणी केली, तर त्या मार्गावर बस सुरू केली जाईल.

- दादाजी महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी, अहमदनगर