शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

'स्वाईन फ्ल्यू'चा धोका वाढला

By admin | Updated: March 2, 2015 13:17 IST

शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्‍या दिवशी रविवारही कायम होती.

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्‍या दिवशी रविवारही कायम होती. या पावसाने वातावरणातील गारवा चांगलाच वाढला असून, स्वाईन फ्लूचा प्रसार होण्यास पोषक वातारण तयार झाले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर सोंगणीला आलेली गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

उन्हाची काहिली जावणत असतानाच अवकाळी पावसाने नगर शहर व परिसरासह जिल्ह्यात काल शनिवारी जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला तडाखा दिला. पाऊस दुसर्‍या दिवशी रविवारीही सुरूच होता. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. सततच्या सरींनी वातावरणातील गारवा चांगलाच वाढला. या पावसाने महावितरणची यंत्रणाही कोलमडली. अचानक झालेल्या पावसाने गहू आणि हरभरा पिकांना सर्वाधिक तडाखा बसला. कांदाही शेतात भिजला. फळबागांची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. हाताशी आलेली पिके तर जाणारच आहेत, पण उलटपक्षी रोगराईदेखील वाढणार असून, स्वाईन फ्लू उग्र रुप धारण करण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. वीज पुरवठा खंडित
अकोले : अकोले शहर व परिसरात अवकाळी पावसाने सुमारे २४ तास हजेरी लावल्याने ४३ मिमी पावसाची नोंद झाली असून यामुळे पिके व वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरुच होता. यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. इतर पिकांना मात्र थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वीज गायब झाली होती. कळस परिसरात मातीच्या विटा बनवणार्‍यांचे मोठे नुकसान झाले. सहा-सात हजार विटांची माती झाली, असे तान्हाजी झोगडे यांनी सांगितले. गहू व घास भुईसपाट झाल्याचे चित्र होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता परिसरात शेतकर्‍यांना सूर्यदर्शन झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे: अकोले- ४३, भंडारदरा-२४, निळवंडे- १६, पांजरे - २६, वाकी - ३0, कोतूळ- २४, आढळा देवठाण- ४. आश्‍वीला गहू पिकांचे नुकसान
आश्‍वी : शनिवारी सकाळी वातावरणात बदल होवून सायंकाळी ६ वाजल्यापासून आश्‍वी परिसरात २४ तासात आश्‍वी येथे २८ तर ओझर बंधारा येथे ३२ मिलीमीटर पाऊस पडला. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, द्राक्ष व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल २0 तास वीज पुरवठा बंद होता. अशात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागली. रविवारी देखील पावसाचे सातत्य टिकून होते. पावसामुळे परिसरात अघोषित संचारबंदी जाणवत होती. ओझर, उंबरी बाळापूर, शेडगाव, शिबलापूर, आश्‍वी बु, आश्‍वी खु, प्रतापपूर, निमगाव जाळी आदी गावांमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. अवकाळी पावसाने पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भंडारदर्‍याच्या पाणीसाठय़ात वाढ
राजूर : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे भंडारदरा धरणात या पावसामुळे बारा तासांत १0२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. धरणाच्या इतिहासात मार्चमध्ये नवीन पाणी येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, या पावसामुळे आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले. शनिवारी दुपारनंतर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात झाली. त्यामुळे बारा तासांत नवीन १0२ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. परिणामी धरणातील पाणीसाठा आता ५ हजार ७८६ दलघफू झाला. दरम्यान परिसरात सर्वदूर पाऊस होत असल्याने आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आले, तर सांगवी धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी दिली. 
■ शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर शहरात वीजेचा लपंडाव सुरू होता. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे वीजपुरवठय़ात व्यत्यय आला. महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी, सावेडीसह इतर भागात वीजपुरवठा विस्कळीत होता. हाताशी आलेल्या पिकांवर पाणी
■ शेतातील उभी पिके वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने भुईसपाट झाली. गहू, हरभरा आणि ज्वारीच्या हाताशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. जिल्ह्यात डाळींब, द्राक्षे, पपई यांसारख्या फळपिकांवर परिणाम झाला आहे. कडक उन्हामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र पावसामुळे गारवा वाढल्याने स्वाईन फ्लूचा पसार होण्यास पोषक वातावरण तयार झाले असून, काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांची खबरदारीचे उपाय करावेत.- एस. एम. सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक