शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाईन फ्ल्यू'चा धोका वाढला

By admin | Updated: March 2, 2015 13:17 IST

शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्‍या दिवशी रविवारही कायम होती.

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेली 'अवकाळी'ची संततधार दुसर्‍या दिवशी रविवारही कायम होती. या पावसाने वातावरणातील गारवा चांगलाच वाढला असून, स्वाईन फ्लूचा प्रसार होण्यास पोषक वातारण तयार झाले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर सोंगणीला आलेली गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

उन्हाची काहिली जावणत असतानाच अवकाळी पावसाने नगर शहर व परिसरासह जिल्ह्यात काल शनिवारी जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला तडाखा दिला. पाऊस दुसर्‍या दिवशी रविवारीही सुरूच होता. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. सततच्या सरींनी वातावरणातील गारवा चांगलाच वाढला. या पावसाने महावितरणची यंत्रणाही कोलमडली. अचानक झालेल्या पावसाने गहू आणि हरभरा पिकांना सर्वाधिक तडाखा बसला. कांदाही शेतात भिजला. फळबागांची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. हाताशी आलेली पिके तर जाणारच आहेत, पण उलटपक्षी रोगराईदेखील वाढणार असून, स्वाईन फ्लू उग्र रुप धारण करण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. वीज पुरवठा खंडित
अकोले : अकोले शहर व परिसरात अवकाळी पावसाने सुमारे २४ तास हजेरी लावल्याने ४३ मिमी पावसाची नोंद झाली असून यामुळे पिके व वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरुच होता. यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. इतर पिकांना मात्र थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वीज गायब झाली होती. कळस परिसरात मातीच्या विटा बनवणार्‍यांचे मोठे नुकसान झाले. सहा-सात हजार विटांची माती झाली, असे तान्हाजी झोगडे यांनी सांगितले. गहू व घास भुईसपाट झाल्याचे चित्र होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता परिसरात शेतकर्‍यांना सूर्यदर्शन झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे: अकोले- ४३, भंडारदरा-२४, निळवंडे- १६, पांजरे - २६, वाकी - ३0, कोतूळ- २४, आढळा देवठाण- ४. आश्‍वीला गहू पिकांचे नुकसान
आश्‍वी : शनिवारी सकाळी वातावरणात बदल होवून सायंकाळी ६ वाजल्यापासून आश्‍वी परिसरात २४ तासात आश्‍वी येथे २८ तर ओझर बंधारा येथे ३२ मिलीमीटर पाऊस पडला. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, द्राक्ष व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल २0 तास वीज पुरवठा बंद होता. अशात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागली. रविवारी देखील पावसाचे सातत्य टिकून होते. पावसामुळे परिसरात अघोषित संचारबंदी जाणवत होती. ओझर, उंबरी बाळापूर, शेडगाव, शिबलापूर, आश्‍वी बु, आश्‍वी खु, प्रतापपूर, निमगाव जाळी आदी गावांमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. अवकाळी पावसाने पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भंडारदर्‍याच्या पाणीसाठय़ात वाढ
राजूर : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे भंडारदरा धरणात या पावसामुळे बारा तासांत १0२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. धरणाच्या इतिहासात मार्चमध्ये नवीन पाणी येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, या पावसामुळे आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले. शनिवारी दुपारनंतर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात झाली. त्यामुळे बारा तासांत नवीन १0२ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. परिणामी धरणातील पाणीसाठा आता ५ हजार ७८६ दलघफू झाला. दरम्यान परिसरात सर्वदूर पाऊस होत असल्याने आढळा धरणातून सुरू असलेले आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आले, तर सांगवी धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी दिली. 
■ शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर शहरात वीजेचा लपंडाव सुरू होता. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे वीजपुरवठय़ात व्यत्यय आला. महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी, सावेडीसह इतर भागात वीजपुरवठा विस्कळीत होता. हाताशी आलेल्या पिकांवर पाणी
■ शेतातील उभी पिके वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने भुईसपाट झाली. गहू, हरभरा आणि ज्वारीच्या हाताशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. जिल्ह्यात डाळींब, द्राक्षे, पपई यांसारख्या फळपिकांवर परिणाम झाला आहे. कडक उन्हामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र पावसामुळे गारवा वाढल्याने स्वाईन फ्लूचा पसार होण्यास पोषक वातावरण तयार झाले असून, काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांची खबरदारीचे उपाय करावेत.- एस. एम. सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक