शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर ‘पॉवरफुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 17:16 IST

नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली.

अण्णा नवथर। अहमदनगर : नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली. ती आजतागायत कायम असून, महसूल, नगरविकास आणि जलसंधारण, या तिन्ही महत्वाच्या खात्यांवर आता नगर जिल्ह्याची छाप दिसणार आहे. तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांकडून नगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.नगर जिल्हा हा कुरघोडीच्या राजकारणासाठी ओळखला जात असला तरी राज्याच्या राजकारणात मात्र नगरी नेत्यांची नेहमीच छाप राहिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील नेते रामराव आदिक यांच्या रुपाने सन १९८३ मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. ते दोन वर्षे उपमुख्यमंत्री राहिले. महत्वाच्या खात्यांसह उपमुख्यमंत्री पदापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी मजल मारली. शेवगाव येथील बाळासाहेब भारदे यांच्या रुपाने नगर जिल्ह्याने पहिल्यांदा मंत्रिमंडळात खाते उघडले. पहिल्या मंत्रिमंडळात सहकार खाते व विधानसभेचे अध्यक्षपद ही पदे भारदे यांनी भूषविली. त्याचबरोबर बी. जे. खताळ, बाबूराव भारस्कर, आबासाहेब निंबाळकर, गोविंदराव आदिक, शंकरराव काळे, बबनराव ढाकणे, अण्णासाहेब म्हस्के, एस.एम. आय. असीर, शंकरराव कोल्हे, मधुकरराव पिचड, अनिल राठोड, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपतुे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे हा जिल्ह्यातील मंत्र्यांचा चढता आलेख निश्चित गौरवास्पद आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नगर जिल्ह्याने काहीकाळ विरोधी भूमिकाही बजावली. पाथर्डीचे बबनराव ढाकणे यांच्या रुपाने पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यानंतर ना.स. फरांदे, सूर्यभान वहाडणे, मधुकरराव पिचड आणि युतीच्या काळात राधाकृष्ण विखे या नेत्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. निवडणुकीपूर्वी विखे हे भाजपवासी झाले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांचे पारंपरिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी भरून काढली.  महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत नगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली. थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला दुस-यांदा महसूल खाते मिळाले. नगरविकास व ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षणही महत्वाची खाती प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आली आहेत.  जलसंधारण हे खाते मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे आहे. जलसंधारण हे खाते संभाळणारे  गडाख हे जिल्ह्यातील पहिले मंत्री आहेत.महसूल खाते तिस-यांदा नगरकडेतत्कालीनमंत्री बी. जे. खताळ यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांच्याकडे महसूल खाते होते. आघाडीच्या काळात तिस-यांदा बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने जिल्ह्याला महसूलमंत्रीपद मिळाले. या खात्याचा अनुभव असल्याने थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खाते देण्यात आले आहे.कृषी व महसूल खात्यावर नगरचा वरचष्माकृषी व महसूल ही दोन महत्वाची खाती नेहमीच नगरच्या वाट्याला आली. पहिल्यांदा गोविंदराव आदिक यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला कृषी मंत्री पद मिळाले. त्यानंतर अण्णासाहेब म्हस्के, शंकरराव कोल्हे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे कृषी खाते होते. तसेच महसूल खाते जिल्ह्यात पहिल्यांदा खताळ यांना मिळाले. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी या खात्याचा कारभार पाहिला असून, थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खात्याची जबाबदारी आली आहे.नगर जिल्ह्याने राज्याला दिले २० मंत्री१)रामराव आदिक- उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री २)बाळासाहेब भारदे- सहकार, विधानसभा अध्यक्ष३)बी.जे. खताळ- महसूल, सार्वजनिक बांधकाम, विधी न्याय४)बाबूराव भारस्कर- समाजकल्याण५)आबासाहेब निंबाळकर- पाटबंधारे, ग्रामविकास६)गोविंदराव आदिक- परिवहन, विधी व न्याय, कृषी७)शंकरराव काळे- शिक्षण, सहकार८)बबनराव ढाकणे- सार्वजनिक बांधकाम, विरोधी पक्षनेते९)अण्णासाहेब म्हस्के- पाटबंधारे, कृषी१०)एस.एम.आय. असीर- ऊर्जा, वक्फ११)शंकरराव कोल्हे- सहकार, महसूल, कृषी, परिवहन,राज्य उत्पादन,हंगामी सभापती, फळ उत्पादन, कमाल जमीन धारणा१२)मधुकरराव पिचड- दुग्ध व पशुसंवर्धन, बंदरे, रोजगार हमी, आदिवासी, वन, विरोधीपक्षनेते, जिल्ह्याचे पालकमंत्री१३)अनिल राठोड- अन्न,नागरी पुरवठा१४)राधाकृष्ण विखे- कृषी, जलसंधारण, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, शालेय शिक्षण, विधी व न्याय, पालकमंत्री (औरंगाबाद), परिवहन,बंदरे,विधी व न्याय,कृषी व पणन, पालकमंत्री (अमरावती), विरोधीपक्ष नेते, गृहनिर्माणमंत्री१५)बाळासाहेब थोरात- पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, शालेय, शिक्षण, कृषी, रोजगार हमी,महसूल, खार जमीन, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, सध्या महसूल खाते.१६)बबनराव पाचपुते- गृह, वन, आदिवासी, पालकमंत्री१७शिवाजीराव कर्डिले- मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास१८)राम शिंदे- गृह, पर्यटन, राजशिष्टाचार, आरोग्य, जलसंधारण, जिल्ह्याचे पालकमंत्री.१९)शंकरराव गडाख- मृद व जलसंधारण२०)प्राजक्त तनपुरे- नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षणविखे- थोरात सर्वाधिक खात्यांचे मंत्रीआघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्याकडे महत्वाची खाती होती. थोरात व विखे हे जिल्ह्यातील सर्वाधिक खात्यांचा कारभार पाहिलेले नेते आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनministerमंत्री