शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

१६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत

By admin | Updated: October 4, 2016 00:40 IST

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून,

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून, त्यांना समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही़ वाळीत टाकल्याने या कुटुंबातील मुली आणि मुलांचे कुठे नातेही जमत नाहीत़ या कुटुंबातील कुणी लग्नसमारंभात गेले तर त्यांना तेथून हाकलून लावले जाते़ जातीतीलच पंचांनी केलेल्या या अन्यायाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कुटुंबातील सदस्यांसह लोक अधिकार आंदोलन संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा फॅक्ट्री येथे वास्तव्यास असलेल्या २५ तिरमली कुटुंबाना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पुन्हा जातीत घेण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास तयार असतांनाही या कुटुंबांना जातीत घेण्यात आले नाही़ दहा ते बारा वर्षांपूर्वी जातीबाहेर टाकलेल्या काही लोकांनी पंचांना चार ते पाच लाख रुपये दिल्यानंतर त्यांना जातीत घेण्यात आले़ याच कुटुंबातील मोकूळवाडी (ता़ राहुरी) येथे राहणाऱ्या नातेवाईकांनाही असेच वाळीत टाकण्यात आले आहे़ जातीबाहेर टाकलेल्या २५ कुटुंबातील १८ मुले व २५ मुलींचे लग्न होणे बाकी असून, या समाजातील इतर यांच्याशी सोयरिक करण्यास तयार नाहीत़ या कुटुंबातील कुणाचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधीला कुणी येत नाही़ समाजाच्या कुठल्याही सण, उत्सवात या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतले जात नाही़ जातपंचायतीला दंड भरून देण्यास तयार असतानाही पुन्हा जातीत घेतले जात नाही़ जातपंचायतीच्या या निर्णयाचा विरोध केला तर पंच खुन करण्याची धमकी देत आहेत़ या समाजाच्या जातपंचायतीत उत्तम फुलमाळी, शेटीबा काकडे, अण्णा फुलमाळी, सुभाष फुलमाळी, तात्या आव्हाड, उत्तम फुलमाळी, गुलाब काकडे, रामा फुलमाळी हे पंच म्हणून उपस्थित राहत असतात़ यांची सखोल चौकशी करून आमच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ यावेळी बापू ओहोळ, द्वारका पवार, सुभाष शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)