शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

१६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत

By admin | Updated: October 4, 2016 00:40 IST

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून,

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून, त्यांना समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही़ वाळीत टाकल्याने या कुटुंबातील मुली आणि मुलांचे कुठे नातेही जमत नाहीत़ या कुटुंबातील कुणी लग्नसमारंभात गेले तर त्यांना तेथून हाकलून लावले जाते़ जातीतीलच पंचांनी केलेल्या या अन्यायाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कुटुंबातील सदस्यांसह लोक अधिकार आंदोलन संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा फॅक्ट्री येथे वास्तव्यास असलेल्या २५ तिरमली कुटुंबाना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पुन्हा जातीत घेण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास तयार असतांनाही या कुटुंबांना जातीत घेण्यात आले नाही़ दहा ते बारा वर्षांपूर्वी जातीबाहेर टाकलेल्या काही लोकांनी पंचांना चार ते पाच लाख रुपये दिल्यानंतर त्यांना जातीत घेण्यात आले़ याच कुटुंबातील मोकूळवाडी (ता़ राहुरी) येथे राहणाऱ्या नातेवाईकांनाही असेच वाळीत टाकण्यात आले आहे़ जातीबाहेर टाकलेल्या २५ कुटुंबातील १८ मुले व २५ मुलींचे लग्न होणे बाकी असून, या समाजातील इतर यांच्याशी सोयरिक करण्यास तयार नाहीत़ या कुटुंबातील कुणाचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधीला कुणी येत नाही़ समाजाच्या कुठल्याही सण, उत्सवात या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतले जात नाही़ जातपंचायतीला दंड भरून देण्यास तयार असतानाही पुन्हा जातीत घेतले जात नाही़ जातपंचायतीच्या या निर्णयाचा विरोध केला तर पंच खुन करण्याची धमकी देत आहेत़ या समाजाच्या जातपंचायतीत उत्तम फुलमाळी, शेटीबा काकडे, अण्णा फुलमाळी, सुभाष फुलमाळी, तात्या आव्हाड, उत्तम फुलमाळी, गुलाब काकडे, रामा फुलमाळी हे पंच म्हणून उपस्थित राहत असतात़ यांची सखोल चौकशी करून आमच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ यावेळी बापू ओहोळ, द्वारका पवार, सुभाष शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)