शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

१६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत

By admin | Updated: October 4, 2016 00:40 IST

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून,

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून, त्यांना समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही़ वाळीत टाकल्याने या कुटुंबातील मुली आणि मुलांचे कुठे नातेही जमत नाहीत़ या कुटुंबातील कुणी लग्नसमारंभात गेले तर त्यांना तेथून हाकलून लावले जाते़ जातीतीलच पंचांनी केलेल्या या अन्यायाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कुटुंबातील सदस्यांसह लोक अधिकार आंदोलन संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा फॅक्ट्री येथे वास्तव्यास असलेल्या २५ तिरमली कुटुंबाना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पुन्हा जातीत घेण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास तयार असतांनाही या कुटुंबांना जातीत घेण्यात आले नाही़ दहा ते बारा वर्षांपूर्वी जातीबाहेर टाकलेल्या काही लोकांनी पंचांना चार ते पाच लाख रुपये दिल्यानंतर त्यांना जातीत घेण्यात आले़ याच कुटुंबातील मोकूळवाडी (ता़ राहुरी) येथे राहणाऱ्या नातेवाईकांनाही असेच वाळीत टाकण्यात आले आहे़ जातीबाहेर टाकलेल्या २५ कुटुंबातील १८ मुले व २५ मुलींचे लग्न होणे बाकी असून, या समाजातील इतर यांच्याशी सोयरिक करण्यास तयार नाहीत़ या कुटुंबातील कुणाचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधीला कुणी येत नाही़ समाजाच्या कुठल्याही सण, उत्सवात या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतले जात नाही़ जातपंचायतीला दंड भरून देण्यास तयार असतानाही पुन्हा जातीत घेतले जात नाही़ जातपंचायतीच्या या निर्णयाचा विरोध केला तर पंच खुन करण्याची धमकी देत आहेत़ या समाजाच्या जातपंचायतीत उत्तम फुलमाळी, शेटीबा काकडे, अण्णा फुलमाळी, सुभाष फुलमाळी, तात्या आव्हाड, उत्तम फुलमाळी, गुलाब काकडे, रामा फुलमाळी हे पंच म्हणून उपस्थित राहत असतात़ यांची सखोल चौकशी करून आमच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ यावेळी बापू ओहोळ, द्वारका पवार, सुभाष शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)