शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पावसाळ्यात साथीच्या आजारांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. ...

पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. या डबक्यांमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. या डासांमुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यूसारखे आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने गॅस्ट्रो, कॉलरासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. वातावरणातील बदल, प्रदूषित हवाही या आजाराचे प्रमुख कारण ठरत आहे. परिणामी काही दिवसांपासून शहरासह पठार भागात सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढत आहेत.

सद्यस्थितीत संगमनेर तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, पूर्वीपेक्षा कोरोना रुग्णसंख्या कमी असल्याने पूर्वीच्या तुलनेत तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. परंतु, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

..............

पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला असे आजार होतात. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार सुरू करावेत. सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळावे.

- डॉ. राहुल आहेर, साईसिद्धी हॉस्पिटल, घारगाव (संगमनेर)