शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

अमरधाममधील बांधकाम थांबविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 00:22 IST

अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली.

अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली. बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र तसे आदेश चार दिवसांपूर्वीच देवून बांधकाम थांबविल्याचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी स्पष्ट केले. अमरधाममधील अवैध बांधकामाचा ठराव विखंडित करणे आणि झालेले बांधकाम हटविण्याबाबत सभापतींनी मौन बाळगले. अवैध बांधकामाबाबत महासभेत चर्चा करण्याचे मोघम उत्तर देवून सभापतींनीही वेळ मारून नेली.अमरधाम स्मशानभूमीतील गाळेधारकांनी गाळ््यांच्या मागे असलेली अमरधाममधील मुलांच्या दफनभूमीच्या जागेवरच अतिक्रमण केले आहे. याबाबत वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निवेदन देवून सदरचे बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा सुरू होताच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी अमरधाममधील अवैध बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत शहरात ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत, याबाबत सभेला सविस्तर माहिती दिली आणि सदरचे बांधकाम हटविण्याबाबत आक्रमक भाषेत मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे सभापतींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केले. याबाबत महासभेत नेमका काय ठराव झाला होता, याचे वाचन सभेत झाले. मुलांची दफनभूमी उकरली आहे. मृतदेह उकरून काढण्याचे प्रयत्न झाले आहेत. असे असताना झालेले बांधकाम पाडून तेथे पुन्हा संरक्षक भिंत घालावी आणि दफनभूमी सुरक्षित करावी, अशी बोराटे यांनी ओरड केली. मात्र त्यांचा मुद्दा स्थायी समिती आणि प्रशासनाला कळालाच नाही. बांधकाम थांबविण्याचे आदेश सभापती जाधव यांनी देवून याबाबत महासभेत चर्चा करू, असे मोघम उत्तर त्यांना ऐकायला मिळाले. दरम्यान महासभेत झालेला बोगस ठराव विखंडित करून अमरधाममधील जागा गाळेधारकांकडून पुन्हा ताब्यात घेण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्थायी समितीमधील चर्चाही फोल ठरली.(प्रतिनिधी)