शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

तेलही गेले अन् तुपही...

By admin | Updated: June 29, 2014 00:29 IST

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे. मात्र, विशिष्ट शाखेतून विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या नादात अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी प्रवेश अर्ज घेतले नसल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे पाच ते दहा टक्केपर्यंत या विद्यार्थ्यांची संख्या असून त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दुजोरा दिला आहे. दहावीचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर १९ ते २६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज घेण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिले होते. मात्र, शहराबाहेरून येणारे विद्यार्थी, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आमूक महाविद्यालयात, तमुक महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा यावर चर्चा करता करताच प्रवेश अर्ज घेण्याचा कालावधी संपला आहे.आता हे विद्यार्थी आणि पालक शहरातील महाविद्यालयात प्रवेश अर्जासाठी चकरा मारताना दिसत आहे. जामखेड येथील असे पालक त्यांच्या मुलीसोबत नगरमधील एका नामवंत महाविद्यालयात आले होते. संबंधीत मुलीला ८१ टक्के गुण मिळालेले असून तीला मुलींचे निवासी वस्तीगृह असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र, कोठे प्रवेश घ्यावा, यावर चर्चा करण्यात प्रवेशाचा कालावधी उलटला आहे. आता या विद्यार्थिनीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आता या विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधीत पालक आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. शहरात अनेक महाविद्यायात असे उशीर झालेले विद्यार्थी प्रवेश अर्जासाठी चकरा मारत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शिक्षण विभागाने सूचना देऊनही शहरातील अनेक महाविद्यालयांनी प्रवेश अर्जाच्या नावाखाली ५० ते १२० रुपये उकळले आहेत. सुरूवातील शिक्षण विभागाने त्याकडे कानाडोळा केला. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांतून ओरड झाल्यानंतर सर्वच महाविद्यालयांना नोटीस पाठविण्याची जजुबी कारवाई केलेली आहे. तयातून गोंधळ चव्हाट्यावर आला. (प्रतिनिधी)अकरावी प्रवेशासाठी शहर आणि जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजला सूचना देण्यात आलेल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत या ज्युनिअर कॉलेजला अतिरिक्त जागांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.-परशुराम पावसे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी