शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

तेलही गेले अन् तुपही...

By admin | Updated: June 29, 2014 00:29 IST

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे. मात्र, विशिष्ट शाखेतून विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या नादात अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी प्रवेश अर्ज घेतले नसल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे पाच ते दहा टक्केपर्यंत या विद्यार्थ्यांची संख्या असून त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दुजोरा दिला आहे. दहावीचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर १९ ते २६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज घेण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिले होते. मात्र, शहराबाहेरून येणारे विद्यार्थी, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आमूक महाविद्यालयात, तमुक महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा यावर चर्चा करता करताच प्रवेश अर्ज घेण्याचा कालावधी संपला आहे.आता हे विद्यार्थी आणि पालक शहरातील महाविद्यालयात प्रवेश अर्जासाठी चकरा मारताना दिसत आहे. जामखेड येथील असे पालक त्यांच्या मुलीसोबत नगरमधील एका नामवंत महाविद्यालयात आले होते. संबंधीत मुलीला ८१ टक्के गुण मिळालेले असून तीला मुलींचे निवासी वस्तीगृह असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र, कोठे प्रवेश घ्यावा, यावर चर्चा करण्यात प्रवेशाचा कालावधी उलटला आहे. आता या विद्यार्थिनीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आता या विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधीत पालक आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. शहरात अनेक महाविद्यायात असे उशीर झालेले विद्यार्थी प्रवेश अर्जासाठी चकरा मारत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शिक्षण विभागाने सूचना देऊनही शहरातील अनेक महाविद्यालयांनी प्रवेश अर्जाच्या नावाखाली ५० ते १२० रुपये उकळले आहेत. सुरूवातील शिक्षण विभागाने त्याकडे कानाडोळा केला. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांतून ओरड झाल्यानंतर सर्वच महाविद्यालयांना नोटीस पाठविण्याची जजुबी कारवाई केलेली आहे. तयातून गोंधळ चव्हाट्यावर आला. (प्रतिनिधी)अकरावी प्रवेशासाठी शहर आणि जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजला सूचना देण्यात आलेल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत या ज्युनिअर कॉलेजला अतिरिक्त जागांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.-परशुराम पावसे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी