शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST

सरकारने राज्यात ४५ वर्षे वया पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणात प्राधान्य देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र असे असले तरी कोव्हॅक्सिन ...

सरकारने राज्यात ४५ वर्षे वया पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणात प्राधान्य देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र असे असले तरी कोव्हॅक्सिन लसीचा मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा तुटवडा आहे. त्यामुळे या लसीचा डोस केंद्रावर आल्याची माहिती मिळताच नागरिक लसीसाठी थेट रस्त्यावरच मुक्काम ठोकत आहेत.

श्रीरामपूर शहरामध्ये पूर्वी ग्रामीण रुग्णालय तसेच दोन खासगी रुग्णालयांमध्ये या लसीचा पुरवठा केला जात होता. आता मात्र शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयातील आझाद मैदानात लसीकरण केंद्र हलविण्यात आले आहे. केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिक थेट रस्त्यावर तर काहीजण चक्क कारमध्ये रांगेत मुक्कामी आल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी चालू होणाऱ्या लसीकरणासाठी नागरिक आदल्या दिवशी रात्री नऊ वाजेपासून रांगा लागत आहेत.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तालुक्यांमध्ये अद्यापही १५ हजार ज्येष्ठ नागरिक कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लसीचा केवळ दीडशे ते दोनशे कुपींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण रखडले आहे.

-----

पहिल्या डोसला ६० दिवस पूर्ण

दरम्यान, अनेक नागरिकांच्या पहिल्या डोसला आता ६० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घ्यायचा अथवा नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले असले तरी कोव्हॅक्सिनबाबत मात्र अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.

----

मी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन ६० दिवस पूर्ण झाले आहेत. अनेकदा केंद्रावर जाऊनही मला पुरेशा पुरवठ्याआभावी लस मिळू शकली नाही. त्यामुळे आता लस घ्यावी का नाही असा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

-युवराज जगताप,

कारेगाव, ज्येष्ठ नागरिक.