शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

विजेबाबत ‘निंबळक’ची स्वयंपूर्णतेकडे झेप!

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

नागेश सोनवणे , अहमदनगर मीटर पद्धतीच्या पाणी पुरवठ्यामुळे राज्यात नावलौकिक मिळवलेल्या निंबळक ग्रामपंचायतीने आता त्यापुढे जाऊन वीज निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे

नागेश सोनवणे , अहमदनगरमीटर पद्धतीच्या पाणी पुरवठ्यामुळे राज्यात नावलौकिक मिळवलेल्या निंबळक ग्रामपंचायतीने आता त्यापुढे जाऊन वीज निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. एम.आय.डी.सी.तील कारखान्यांतून ओला-सुका तसेच प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतल्यामुळे आता निंबळक ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.या प्रकल्पामुळे गावातील सर्व पथदिवे व सार्वजनिक ४०० दिवे कायम स्वरुपी सुरू राहतील. त्याच प्रकल्पातून विविध प्रकारच्या उत्पादनामधून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. निंबळक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व कारखान्यामधला ओला, सुका कचरा गोळा करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग करूनच निंबळकला बायोगॅस प्रकल्प उभा करणार आहे. विशेष म्हणजे कारखान्यामधील कचरा जमा होणार असल्याने कारखाने परिसर तसेच एम.आय.डी.सी. परिसर स्वच्छ राहणार आहे. या कचऱ्याचे संकलन करून ग्रामपंचायत वीज निर्मिती करणार आहे. तसेच प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून डांबरयुक्त वस्तुचे उत्पादन करणार असल्याने या उत्पादनाची ग्रामपंचायतीच्या वतीने विक्री करण्यात येणार आहे. गावात पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. या वृक्षांच्या संवर्धनासाठी तसेच पाण्यासाठी गावातील सर्व सांडपाणी एकत्र करून ते जलवाहिनीच्या माध्यमातून एकत्र करून फिल्टरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हेच शुद्ध झालेले पाणी वृक्षांना वापरण्यात येणार आहे. लोणांद पॅटर्न निंबळकमध्येपुणे जिल्ह्यातील लोणांद येथे वीज निर्मितीसाठी अशा प्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. अशा प्रकल्पाची पाहणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सरपंच विलासराव लामखडे, उपसरपंच अशोक पवार, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे, उद्योजक के.गोपाळकृष्णन करणार आहे. या प्रकल्पामुळे विजेच्या बिलातही घट होणार असून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होणार असल्याचे सरपंच लामखडे यांनी सांगितले.संपूर्ण गावच वाय-फाय झोनगावातील सर्व अंगणवाड्या, जि.प. शाळा, डिजीटल बनवून त्यांना आय.एस.ओ. हे नामांकन मिळवून प्रत्येकाला इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी संपूर्ण गावात वाय-फाय झोन बसविण्यात येणार आहे. वाय-फाय झोन बसविणारी ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात एकमेव ठरेल.संपूर्ण गावात कॅमेरेवाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी व गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक चौकात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.प्रदूषणाला आळा बसेलएम.आय.डी.सी. येथील कारखाने कंपनीमधील कचरा उघड्यावर टाकून पेटवून देत होते. यामुळे परिसरात प्रदूषण व मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. या प्रकल्पामुळे प्रदूषण व दुर्गंधी कायमची नाहीशी होणार आहे.