शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

नगरकरांना लवकरच मिळणार‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

अहमदनगर : नगर शहराला केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजनेतून लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथील अमृत ...

अहमदनगर : नगर शहराला केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजनेतून लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथील अमृत योजनेमधून ५० लाख लिटर साठवण टाकीचे काम पूर्ण झाले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शनिवारी (दि. १९) पाईपलाईनच्या कामाची पाहणी करून सूचना केल्या.

नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो. विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंतच्या योजनेच्या कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे वसंत टेकडी येथील जुनी ६७ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार असून पाण्याची गळती बंद होऊन पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

अमृत योजनेच्या कामातील अंतिम टप्प्यातील जोडणी काम हाती घेतले असून, त्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे, जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते, इंजिनिअर गणेश गाडळकर, ठेकेदार दयानंद पानसे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पुढील आठ दिवसात मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर असे एकूण ३४ किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू आहे. पुढील काही दिवसात विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यंतच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण होणार आहे. अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराला फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

....................

वाढीव ४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

सध्या नगर शहराला ७३ दशलक्ष लिटर पाणी मिळत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ११७ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. म्हणजेच ४० दशलक्ष लिटर पाणी जास्त वापरास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

.................

या होत्या समस्या

या अमृत पाणी योजनेच्या कामांमध्ये विविध अडचणी आल्या होत्या. यामध्ये शेतकरी, भूसंपादन, वन विभाग, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्या हद्दीतून पाईपलाईनचे काम होणार होते. त्यामुळे संबंधित विभागांची परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु आता त्या अडचणी पूर्णपणे निकाली लागल्या आहेत. त्यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील दिवसात अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण होणार आहे.

.............

१९ बाबासाहेब वाकळे