शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

माता मृत्युचा दर घटला

By admin | Updated: May 28, 2014 00:14 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील माता मृत्युचे दर घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील माता मृत्युचे दर घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या आरोग्य सुविधा, दळणवळणाची साधणे, आरोग्य संस्थांमध्ये वाढलेले प्रसूतीचे प्रमाण हे याला कारणीभूत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर स्त्रियांच्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. किशोरवयीन मुलींपासून, गरोदर माता, प्रसूती झालेल्या माता यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागासोबत जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग आणि राज्य सरकारचा आरोग्य विभाग खांद्याला खांदा लावून स्त्री आरोग्यासाठी काम करतांना दिसत आहे. ग्रामीण पातळीवर अंगणवाडी सेविकेपासून आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून महिला आरोग्याबाबत केवळ जनजागृतीच नव्हे, तर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात येत आहेत. यात महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त करणे, त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करणे, कमी हिमोग्लोबीन असणार्‍या महिलांना नियमित लोह युक्त गोळ्या देणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात ८० हजार १७३ गरोदर माता आहेत. मार्चअखेर ६४ हजार ६७६ महिलांची आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती झालेली असून त्याची टक्केवारी ९६ टक्के आहे. जननी सुरक्षा योजनेत १४ हजार ७६८ महिलांना लाभ देण्यात आला असून गेल्यावर्षी अवघ्या ३५ मातांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचे मातामृत्युचे प्रमाण दर लाखांमागे १०४ असून जिल्ह्याचे प्रमाण अवघे ५८ आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून गरोदरपणात महिलांची काळजी घेणे, साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, दळणवळणाची साधने ही त्यामागील कारणे आहेत. गत महिन्यात आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या सर्व्हेक्षणात ९६ हजार किशोरवयीन मुली आणि मातांचे हिमोग्लोबीन ११ मिली ग्रामपेक्षा कमी आढळले होते. यासर्वांसाठी महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. मार्चअखेर जिल्ह्यात महिला कुटुंब कल्याण कार्यक्रमात ९४. १२ टक्के काम झालेले आहे. यात एका अपत्यावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण उद्दिष्टाच्या १०३ टक्के आहे. १४ हजार ७०८ मातांनी एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. दोन अपत्यावर शस्त्रक्रिया करणार्‍यांची टक्केवारी ८२ टक्के असून त्यांची संख्या २३ हजार ९१४ आहे. कमी हिमोग्लोबीन असणार्‍या महिलांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने लोहाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या गोळ्यांच्या माध्यमातून महिलांचे हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य विभाग सरकारकडून येणार्‍या विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचाच परिणाम आता दिसत असून, जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्युचे प्रमाण कमी होत आहे. - डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी