शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दोन्ही मतदारसंघात युतीच्या मतांत वाढ

By admin | Updated: March 18, 2024 16:18 IST

अहमदनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली आहे.

अहमदनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली आहे. शिर्डीत मतदारसंघात तर शिवसेनाचा उमेदवार बदला गेला असतांना गत पंचवार्षिकच्या तुलनेत सेनेच्या लोकप्रियतेत तीन टक्क्यांनी वाढलेली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीत झालेल्या सरळ लढतीत भाजपच्या मताधिक्क १७ टक्क्यांची भरघोस वाढलेले आहे. राज्याच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची ताकद मोठी. या शिवाय उत्तर जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असतांनाही लोकसभा निवडणुकीत दोन पंचवार्षिक पासून सेना मोठ्या फरकाने विजयी होत आहे. २००९ निवडणुकीत शिवसेनेच्या तिकाटावर भाऊसाहेब वाकचौरे ५४. २६ टक्के मिळवित आघाडी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात असणारे रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांना ३४.२५ टक्के मिळाली होती. यंदा वाकचौरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेनेला जय महाराष्ट्र करत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे सेनेची मोठी अडचण झाली. मात्र, सदाशिव लोखंडे यांच्या रूपाने सेनेला उमेदवार मिळाला आणि त्यांनी सरळ लढतीत वाकचौरे (काँग्रेसचा) मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत सेनेला ५७ टक्के मते मिळाली तर २००९ पेक्षा काँग्रेस आघाडीच्या मताधिक्यात २ टक्क्यांनी घट होत त्यांना ३५ टक्क्यांवर समाधान मानावे लागले. नगर दक्षिणेत मात्र भाजपाने २००९ च्या तुलनेत आपल्या मताधिक्क्यात १७ टक्क्यांची भरघोष वाढ मिळविण्यात यश मिळविले आहे. गत पंचवार्षिकला तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार दिलीप गांधी ३९. ६८ टक्के मिळाली होती. राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार शिवाजी कर्डिले यांना ३३.७४ टक्के मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांना १९.४३ टक्के मिळाली होती. यंदा या मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. दहा लाखांपुढे मतदानाचा आकडा गेल्याने वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होतो, याकडे याकडे सर्वांच लक्ष होते. मात्र, नरेंद्र मोदीचा लाटेचा फटका असा बसला की, गांधींना मिळालेल्या मतांचा आकडा ५७ टक्क्यापर्यंत पोहचला. गत निडणूकीच्या तुलनेत यंदा यात १७ टक्क्यांनी वाढ झाली. २००९ च्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीच्या मताधिक्यात सव्वा तीन टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गतवेळे अपक्ष उमेदवार राजळे हे राष्ट्रवादीच्या चिन्हा वर उभे होते. ( प्रतिनिधी)

गांधींची घोडदौड

लोकसभा निवडणुकीत वाढलेले मतदान मिळविण्यात भाजपाला यश मिळाले. यामुळे गांधींना सहा लाख मतांचा आकडा ओलांडता आला. सोशल मीडियाशी २४ तास कनेक्ट असणारी तरूणाईने नरेंद्र मोदीसाठी भाजपाला मतदान केले. मतदारसंघातील शेवगाव- पाथर्डी वगळता प्रत्येक मतदारसंघात गांधींना ४० ते ६० टक्के मताधिक्य मिळाले.