शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

शेवगाव तालुक्यातील नद्यांच्या पुनरूत्थानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST

शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. ...

शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. नदीपात्राला पडलेला बाभळींचा विळखा, अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे अरुंद झालेले पात्र, प्रदूषण याचा सर्वाधिक परिणाम महापुरात दिसून आला.

गत आठवड्यात नदी तिरावरील गावांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. शेकडो जनावरे वाहून गेली. भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच नद्यांची रुंदीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे नदी तिरावरील गावकऱ्यांना पाऊस आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते आहे.

शेवगाव तालुक्यातून गोदावरी, नंदिनी, ढोरा, काशी, भागीरथी, खटकळी, चांदणी, सुकी आदीसह अन्य प्रमुख नद्या वाहत आहेत. यातील बहुतांश नद्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावरून प्रवाहित होऊन वाहतात. तर अनेक ठिकाणचे ओढे, नाले प्रमुख नद्यांना मिळतात. सोबतच अनेक लहान-मोठ्या नद्या व नाले आहेत. तालुक्याला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. तालुक्यासाठी जीवनदायीनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेशरम वृक्ष वाढले आहेत. मोठी झुडपे, बाभळी नदीपात्रात दिसून येतात. झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा अडकतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. याचा प्रत्यय आखेगाव ते सोमठाणे दरम्यानच्या नदीने बदललेल्या प्रवाहातून शेती वाहून गेल्याने आला आहे.

यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते.

-------

नद्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबविला पाहिजे. सांडपाणी आणि कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आले की नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. तसेच नद्यांमध्ये उभारण्यात आलेले काँक्रीटची बांधकामे जमीनदोस्त केली पाहिजे.

-हर्षदा काकडे,

जिल्हा परिषद सदस्या

----

पुरानंतर नद्यांच्या पुनरुत्थानासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. नाल्यांना गटार समजून त्यात सांडपाणी सोडले जाते. तेच नाले नद्यांना जाऊन मिळतात. त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नदी पात्रातील झुडपे काढून अतिक्रमण हटवायला हवेत.

-बाळासाहेब फटांगडे, सामजिक कार्यकर्ते

---

०६ शेवगाव

नुकत्याच आलेल्या पुरामुळे आखेगाव शिवारातन वाहणाऱ्या नंदिनी नदीने प्रवाह बदलल्याने शेती वाहून गेली.