शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया-स्तनदा माता व किशोरवयीन मुली, कुपोषित बालके तसेच ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना सध्या पुरवठा करत असलेल्या पाककृतींमध्ये (पूरक पोषण आहारात) बदल करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून तेल कमी करून त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. त्यामुळे मिळालेला पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

राज्यात कोरोनाची साथ असल्याने अंगणवाडीमधील बालकांना कोरोनाची लागण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील अंगणवाडीतील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो आहे. मात्र, सध्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारातून तेलाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. मटकी, चना, मूग दाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार देण्यात येतो आहे. पूर्वी पूरक पोषण आहारात तेलाचा समावेश असायचा. सध्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पूरक पोषण आहारात तेल मिळत नाही. महागाई बरोबरच तेलाचे भाव देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मिळणारा आहार शिजवणार कसा? त्यामुळे पुन्हा तेल देणे सुरू करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होते आहे.

-----------

मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल

बालकांच्या कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आहे. शालेय पोषण आहार तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे शून्य ते सहा या वयोगटातील मुले, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांच्या कुपोषण निर्मूलनासाठी मदत होते. या आहारात डाळ, तांदूळ, कडधान्य, तेल इत्यादी दिले जाते. आता तेलाऐवजी साखर देत असल्याचे समजले. तेल नसेल तर आहारात रुची येणार नाही. तेलातील पदार्थांमुळे मुलांना विविध चवीचे पदार्थ खाता येतात. मुलांची हाडे बळकट होतात. साखरेमुळे केवळ गोड पदार्थ बनवता येईल. रोज गोड कोणालाच आवडत नाही. मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल. साखरेचे आहारातील प्रमाण मर्यादित असावे, लहान मुलांना साखर देऊ नये, असे आहार शास्त्र सांगते. तरी मुलांचे आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनासाठी पूर्वीप्रमाणे योग्य तेल द्यावे.

ॲड. निशा शिवूरकर, प्रदेशाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य

--------

अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी जे अनुदान निश्चित केले आहे. सर्वसाधारण त्या अनुदानामध्ये ५०० ते ५५० उष्मांक आणि २० ते २२ ग्रॅम प्रथिने मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार अनुदानाला अधिन राहून काेणत्या घटक पदार्थांचा समावेश आहारात करायचा हे सर्वस्वी शासनाच्या निर्णयावर आधारित आहे.

वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, घारगाव १, ता. संगमनेर

---------

एकात्मिक बालविकास सेवा योजना लाभार्थी (संगमनेर तालुका)

अ. नं. संगमनेर घारगाव १ घारगाव २

गरोदर ८३५ १३२३ १०१६

स्तनदा माता ८१७ १२६२ १०२८

६ महिने ते ३ वर्ष बालके ४०२८ ५९५७ ६०४४

३ ते ६ वर्ष ५१४५ ५९४४ ६१६२

-------

एकूण १०८२५ १४४८६ १४२५०

-----------

असा आहे पूरक पोषण आहार

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी, ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना चना, मटकी, मूग दाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार सध्या देण्यात येतो आहे.

...........771.............