शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

विविध मुद्यांवरुन ग्रामसभेत खडाजंगी

By admin | Updated: June 22, 2014 00:22 IST

जामखेड : जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करावे, या मागणीसाठी शनिवारी आयोजित ग्रामसभा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये निरनिराळ्या मुद्यांवर खडाजंगी झाल्याने वादळी ठरली.

जामखेड : जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करावे, या मागणीसाठी शनिवारी आयोजित ग्रामसभा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये निरनिराळ्या मुद्यांवर खडाजंगी झाल्याने वादळी ठरली.ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करावा, या जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक मुद्यांवर वादळी ठरली. सभेत जामखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करावे, असा ठराव एकमताने करण्यात आला. जामखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात वाड्यांचा नगरपरिषदेत समावेश करावा यासाठी ग्रामस्थ आग्रही असताना सरपंच प्रा. कैलास माने यांनी विरोध करीत वाड्या-वस्त्यानिहाय गावकऱ्यांची मते जाणून घेतल्याशिवाय समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार नाही,असे स्पष्ट केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामपंचायत पदाधिकारी नगरपरिषदेसाठी अनुकूल आहेत. मात्र ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होऊन द्यावा, असे सरपंच म्हणताच ग्रामस्थ आक्रमक झाले. जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करण्याबाबतचा ठराव चर्चेला आणला असता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, नितीन हुलगुडे, मयुर डोके, सतीश राजगुरु, पोपट घायतडक, पवन राळेभात, नय्युम शेख, दिगंबर चव्हाण या कार्यकर्त्यांनी जामखेडच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करताना ग्रामपंचायत नागरिक सुविधा देण्यात कमी पडत आहेत. यामुळे नगरपरिषद होणे आवश्यक आहे. तसेच जामखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात वाड्यांचा नगरपरिषदेत समावेश करावा,अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.दरम्यान, या मागणीला विरोध दर्शवित सरपंच माने म्हणाले, या वाड्यांचा समावेश केला जावा यासाठी प्रत्येक ‘वाडी’ तील लोकांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे सांगताच ग्रामसभेत गोंधळ उडाला. यावेळी नागरिक म्हणाले, यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या अंमलबजावणी संदर्भात वाड्यांमधील नागरिकांचे ठराव घेतले की नाही, आताच का घेण्यात येणार आहेत याचे उत्तर ग्रामविकास अधिकारी यांनी द्यावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी सदर सात वाड्यांचा समावेश नगरपरिषदेत करण्यात येईल, असे सांगताच आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. (तालुुका प्रतिनिधी)नागरिक अंधारातमहत्वाच्या विषयावर ग्रामसभा असतानाही नागरिकांना कळविण्यात आले नव्हते किंवा दवंडीही देण्यात आली नाही. नगरपरिषदेसाठी आग्रही असलेलेच सभास्थानी असल्याचे दिसून आले. - राजू गोरे,शहराध्यक्ष, राष्ट्रवादीतर पुन्हा सभा घेऊग्रामसभेची नोटीस बोर्डवर लावली होती. याविषयी कोणाला शंका असल्यास पुन्हा ग्रामसभा घेऊ. याविषयीची जनजागृती आठवडाभर करु. परिसरातील सात वाड्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी ग्रामसभा घेण्यात येईल. - कैलास माने, सरपंच