शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

बागा जमीनदोस्त, घर जळाले

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले.

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळे अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला. रस्त्यावरील व शेत बांधावरील छोटे-मोठे वृक्ष, वीजवाहक सिमेंटचे खांब, पाचटाची व पत्र्याची घरे या वादळात अनेक ठिकाणी पडली. तळपेवाडी येथे घराची भिंत पडल्यामुळे काही जण किरकोळ जखमी झाल्याचे नायब तहसीलदार शितलकुमार सावळे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये वादळामुळे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करण्याचा सूचना तलाठी व कृषी सहाय्यकांना दिल्याचे प्रांताधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. दरम्यान या वादळामुळे सर्वाधिक नुकसान महावितरणचे झाले आहे. मंगळापूर, चिखली, कासारा-दुमाला, राजापूर, धांदरफळ, निमज, साकूर, घारगाव व अन्य गावांमध्ये वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर पडले. ूमहावितरणने महत्त्वाच्या वीजवाहिन्या दुरूस्त केल्या असल्या तरी उपवाहिन्या दुरूस्त करण्यास उशीर लागणार आहे. (वार्ताहर) सात्रळ : राहुरी तालुक्यातील सात्रळ सोनगाव, धानोरे परिसरावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकर्‍याचे घर जळाले. राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोषीला मंगळवारी सायंकाळी गारपिटीचा मोठा तडाखा बसला. तुफानी वार्‍यासह जोरदार पाऊस व मोठ्या आकाराच्या गारांनी परिसराला जबरदस्त तडाखा दिला. गारांच्या तडाख्याने लोखंडी पत्रांना छिद्रे पडली. अनेकांची पत्रे उडाली. गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यातच मंगळवारी सात्रळ परिसराचा आठवडे बाजार असल्याने बाजाराची पुरत वाट लागली. गारांच्या तडाख्याने तंबू फाटले, भाजीपाल्याचे नुकसान झाले. परिसरातील शेतकर्‍यांचे शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले. डॉ. पंजाबी यांचे साडेपाच एकर टरबुजाच्या शेतीचे नुकसान झाले. अ‍ॅड. विजयराव कडू यांच्या सहा एकर केशर जातीच्या आंब्याच्या बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पंचायत समिती सदस्य डुक्रे यांची डाळींब बागही उद्धवस्त झाली. विठ्ठल ताजणे या शेतकर्‍याच्या राहत्या घरावर वीज पडून संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने दहाच मिनिटे अगोदर संपूर्ण कुटुंब शेजारच्या वस्तीवर गेले होते म्हणून मोठा अनर्थ टळला. दिलीप कडू या शेतकर्‍याची गाय छप्पर पडून जखमी झाली. परिसरामध्ये विजेचे खांब वाकून संपूर्ण तारा तुटल्या. गेल्या वीस तासांपासून परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. उसाचीही मोठी हानी झाली आहे. कृषी व महसूल खात्याचे अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामे करीत आहेत. (वार्ताहर) अकोले : तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळाने आढळा खोर्‍यातील डाळिंबाची झाडे मुळासकट उपटून पडल्याने डाळींब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून पीक नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. गणोरे, विरगाव, देवठाण, कळस, सुगाव, तांभोळ, सांगवी, केळीरुम्हणवाडी परिसराला मंगळवारी वादळ वार्‍याचा तडाखा बसला. डाळिंब झाडांच्या ओळीच्या ओळी उन्मळून पडल्या आहे. विरगावफाटा येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. सुगाव येथे प्रवासी जीपवर बाभळीचे झाड पडले. देवठाण येथील आश्रमशाळेचे पन्नास पञे उडून गेले. तांभोळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. धामणगाव पाट येथील सरस्वती विद्यालयाच्या तीन खोल्यांचे पञे उडून गेले. (तालुका प्रतिनिधी)