शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

चारा पाण्यासाठी जनावरांसह मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 00:14 IST

अकोले: ‘चारा व पाणी’ मागणीसाठी मुथाळणे ग्रामस्थांचा गाय बैल गुरांसह भर उन्हात सोमवारी दुपारी दोन वाजता अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.

अकोले: ‘चारा व पाणी’ मागणीसाठी मुथाळणे ग्रामस्थांचा गाय बैल गुरांसह भर उन्हात सोमवारी दुपारी दोन वाजता अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसील गेटवर पोलीस व आंदोलक यांच्यात संघर्ष झाल्यानंतर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जनावरांना चारा द्या! पाणी द्या! अशा घोषणा देत नायकरवाडी, पागीरवाडीसह मुथाळणे गावच्या आदिवासी शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांसह मोर्चा काढला. सात ते आठ किलोमिटरचा पल्ला पार करीत गर्दणी घाटातून हा मोर्चा तहसिल कचेरीवर धडकला. मोर्चात गावठी डांग जातीची जणावरे बहुसंख्येने होती. हा कसला आला विकास, जनावरांना व माणसांना प्यायला पाणी नाही? मुक्या जनावरांनी करायच काय? दरवर्षीच चारा व पाण्यासाठी मुथाळणे, समशेरपुरसह आढळा खोऱ्याला संघर्ष करावा लागत आहे. तालुक्याला लाल दिवा असून नसल्यासारखा आहे. आधिकारी मुजोर झालेत, निवेदने अन् कागदी ठराव करत बसू नका? लवकरात लवकर पाणी व चारा द्या? कायदा हातात घ्यायला लावू नका, असा सज्जड इशारा वयोवृध्द शेतकरी मुरलीधर जोरवर यांनी दिला. बाळू सदगीर व बबन सदगीर यांनी मुथाळणे गावात जनावरांसाठी छावणी सुरु न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करु, असा इशारा दिला. मच्छिंद्र धुमाळ, शांताराम संगारे, केरु सदगीर, शंकर सदगीर, भास्कर होलगीर, दुंदा गोडे यांची भाषणे झाली. तहसिलदार चंद्रशेखर देशमुख, गटविकास अधिकारी दिलिप रुपवते, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बर्डे यांनी आंदोलनास सामोरे जात निवेदन स्वीकारले. आंदोलकांशी तहसीलदार यांचे दालनात चर्चा केली. पिण्याच्या पाण्याचा टँकर खेप वाढवून देऊ, चाऱ्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करु, अशा ठोस आश्वासनानंतर तुर्त आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)