शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नगर बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण दोन वर्षांत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी ...

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याचे काम येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि.२२) दुपारी ३.३० वाजता वाळुंज येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नगर विभागाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण आदी उपस्थित राहणार आहेत.

नगर शहर हे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गात मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे नगर शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. अपघातही होत असल्याने शहराबाहेरून बाह्यवळण रस्ता (बायपास) करण्यात आला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटापासून नगर-कल्याण रस्ता व नगर-पुणे रस्ता ओलांडून सोलापूर रस्त्यावरील वाळुंज येथपर्यंत तसेच नगर एमआयडीसी ते नगर-औरंगाबाद रस्ता असा हा बाह्यवळण रस्ता आहे.

----

सर्व महामार्ग चौकात होणार उड्डाणपूल

भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा मालकांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला आहे. भूसंपादनासाठीच्या मोबदल्याची रक्कम आणि डांबरी चौपदरीकरण, मध्य भागी रस्ता दुभाजक असे या कामासाठी तब्बल १ हजार २६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्यावर जेथे जेथे इतर महामार्ग गेलेले आहेत तेथे उड्डाणपूल केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दौंड रस्ता, सोलापूर रस्ता, औरंगाबाद रस्ता जामखेड रस्त्याचा समावेश आहे. या कामाची निविदा मुंबई येथील जी. एच. व्ही. कंपनीने भरलेली असून या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दोन वर्षे कामाची मुदत आहे.

---

विखेंच्या पाठपुराव्यामुळे प्रक्रियेला वेग

बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित झाला असला तरी अगोदर त्याची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या बाह्यवळण रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच गर्दी असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी २०१५ पासून प्रक्रिया सुरु होती; मात्र डॉ. सुजय विखे खासदार झाल्यानंतर त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लष्करी हद्दीतून रस्त्याचे काम होण्यासाठी संरक्षण विभागाकडून त्यांनी मंजुरी मिळविली आहे. भूसंपादन प्रक्रियेलाही त्यांनी वेग दिला.

---

११ गावांच्या हद्दीत झाले भूसंपादन

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर नेप्तीजवळ नगर शहराची हद्द सुरू होते. तेथेच बाह्यवळण रस्ता केला आहे. या रस्त्याच्या दक्षिण व उत्तर दिशेने मिळून ११ गावातील १२२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले. ४८१ खातेदारांच्या जमिनी आहेत. यात अरणगावच्या ६५, बोल्हेगावच्या ६, केडगावच्या ९०, नालेगावच्या २६, नारायणडोहच्या २९, नेप्तीच्या ३७, निंबळकच्या ७२, सारोळा बद्दीच्या ६८, शहापूरच्या २, सोनेवाडी-अकोळनेरच्या ५, वाळुंजच्या ८० जणांच्या जमिनी आहेत.