शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नगर बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण दोन वर्षांत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी ...

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याचे काम येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि.२२) दुपारी ३.३० वाजता वाळुंज येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नगर विभागाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण आदी उपस्थित राहणार आहेत.

नगर शहर हे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गात मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे नगर शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. अपघातही होत असल्याने शहराबाहेरून बाह्यवळण रस्ता (बायपास) करण्यात आला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटापासून नगर-कल्याण रस्ता व नगर-पुणे रस्ता ओलांडून सोलापूर रस्त्यावरील वाळुंज येथपर्यंत तसेच नगर एमआयडीसी ते नगर-औरंगाबाद रस्ता असा हा बाह्यवळण रस्ता आहे.

----

सर्व महामार्ग चौकात होणार उड्डाणपूल

भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा मालकांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला आहे. भूसंपादनासाठीच्या मोबदल्याची रक्कम आणि डांबरी चौपदरीकरण, मध्य भागी रस्ता दुभाजक असे या कामासाठी तब्बल १ हजार २६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्यावर जेथे जेथे इतर महामार्ग गेलेले आहेत तेथे उड्डाणपूल केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दौंड रस्ता, सोलापूर रस्ता, औरंगाबाद रस्ता जामखेड रस्त्याचा समावेश आहे. या कामाची निविदा मुंबई येथील जी. एच. व्ही. कंपनीने भरलेली असून या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दोन वर्षे कामाची मुदत आहे.

---

विखेंच्या पाठपुराव्यामुळे प्रक्रियेला वेग

बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित झाला असला तरी अगोदर त्याची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या बाह्यवळण रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच गर्दी असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी २०१५ पासून प्रक्रिया सुरु होती; मात्र डॉ. सुजय विखे खासदार झाल्यानंतर त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लष्करी हद्दीतून रस्त्याचे काम होण्यासाठी संरक्षण विभागाकडून त्यांनी मंजुरी मिळविली आहे. भूसंपादन प्रक्रियेलाही त्यांनी वेग दिला.

---

११ गावांच्या हद्दीत झाले भूसंपादन

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर नेप्तीजवळ नगर शहराची हद्द सुरू होते. तेथेच बाह्यवळण रस्ता केला आहे. या रस्त्याच्या दक्षिण व उत्तर दिशेने मिळून ११ गावातील १२२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले. ४८१ खातेदारांच्या जमिनी आहेत. यात अरणगावच्या ६५, बोल्हेगावच्या ६, केडगावच्या ९०, नालेगावच्या २६, नारायणडोहच्या २९, नेप्तीच्या ३७, निंबळकच्या ७२, सारोळा बद्दीच्या ६८, शहापूरच्या २, सोनेवाडी-अकोळनेरच्या ५, वाळुंजच्या ८० जणांच्या जमिनी आहेत.