शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

नगर बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण दोन वर्षांत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी ...

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याचे काम येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि.२२) दुपारी ३.३० वाजता वाळुंज येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नगर विभागाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण आदी उपस्थित राहणार आहेत.

नगर शहर हे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गात मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे नगर शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. अपघातही होत असल्याने शहराबाहेरून बाह्यवळण रस्ता (बायपास) करण्यात आला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटापासून नगर-कल्याण रस्ता व नगर-पुणे रस्ता ओलांडून सोलापूर रस्त्यावरील वाळुंज येथपर्यंत तसेच नगर एमआयडीसी ते नगर-औरंगाबाद रस्ता असा हा बाह्यवळण रस्ता आहे.

----

सर्व महामार्ग चौकात होणार उड्डाणपूल

भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा मालकांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला आहे. भूसंपादनासाठीच्या मोबदल्याची रक्कम आणि डांबरी चौपदरीकरण, मध्य भागी रस्ता दुभाजक असे या कामासाठी तब्बल १ हजार २६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्यावर जेथे जेथे इतर महामार्ग गेलेले आहेत तेथे उड्डाणपूल केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दौंड रस्ता, सोलापूर रस्ता, औरंगाबाद रस्ता जामखेड रस्त्याचा समावेश आहे. या कामाची निविदा मुंबई येथील जी. एच. व्ही. कंपनीने भरलेली असून या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दोन वर्षे कामाची मुदत आहे.

---

विखेंच्या पाठपुराव्यामुळे प्रक्रियेला वेग

बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित झाला असला तरी अगोदर त्याची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या बाह्यवळण रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच गर्दी असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी २०१५ पासून प्रक्रिया सुरु होती; मात्र डॉ. सुजय विखे खासदार झाल्यानंतर त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लष्करी हद्दीतून रस्त्याचे काम होण्यासाठी संरक्षण विभागाकडून त्यांनी मंजुरी मिळविली आहे. भूसंपादन प्रक्रियेलाही त्यांनी वेग दिला.

---

११ गावांच्या हद्दीत झाले भूसंपादन

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर नेप्तीजवळ नगर शहराची हद्द सुरू होते. तेथेच बाह्यवळण रस्ता केला आहे. या रस्त्याच्या दक्षिण व उत्तर दिशेने मिळून ११ गावातील १२२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले. ४८१ खातेदारांच्या जमिनी आहेत. यात अरणगावच्या ६५, बोल्हेगावच्या ६, केडगावच्या ९०, नालेगावच्या २६, नारायणडोहच्या २९, नेप्तीच्या ३७, निंबळकच्या ७२, सारोळा बद्दीच्या ६८, शहापूरच्या २, सोनेवाडी-अकोळनेरच्या ५, वाळुंजच्या ८० जणांच्या जमिनी आहेत.