शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

माजी महापौरांनी संपविला ५० टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST

अहमदनगर : माजी महापौरांचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवसाआधी रोख निधीतील २० टक्के रक्कम वितरित करून कामेही प्रस्तावित करण्यात आल्याचा ...

अहमदनगर : माजी महापौरांचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवसाआधी रोख निधीतील २० टक्के रक्कम वितरित करून कामेही प्रस्तावित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नूतन महापौर, उपमहापौरांना रोख निधीतून कामे प्रस्तावित करण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला. त्याच दिवशी नवीन महापौर व उपमहापौर निवड झाली. निवडीनंतर नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी खड्डेमुक्त शहर, तर उपमहापौर गणेश भोसले यांनी हरितनगरची घोषणा केली. असे असले तरी ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना नोव्हेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. कारण माजी महापौर वाकळे यांनी अखेरच्या टप्प्यात रोख स्वरूपात महापालिकेत जमा झालेला २० टक्के रोख निधी खर्ची पाडला आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवसआधी २९ जून रोजी राेख निधीतील २० टक्के रक्कम आयुक्त शंकर गोरे यांच्याकडून वितरित केली गेली. या निधीतून शेवटच्या दोन दिवसांत कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापूर्वी मे महिन्यात रोख निधीतील ३० रक्कम वितरित करण्यात आली होती. या निधीतून कामे प्रस्तावित करून निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांतील रोख निधीतील एकूण ५० टक्के म्हणजे ५ कोटी ५० लाखांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित ५० टक्के निधी येत्या नोव्हेंबरमध्ये वितरित केला जाईल. महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे रोख स्वरूपात जमा होणाऱ्या निधीतूनच विकास कामे प्रस्तावित करावी लागतात. विकासकामे प्रस्तावित करण्याचा अधिकार महापौरांना असतो. या अधिकाराचा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुरेपूर वापर करत रोख निधी खर्च केला. विशेष म्हणजे आयुक्त शंकर गोरे यांनीही त्यांना सहकार्य करत २० टक्के निधी वितरीत केला. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांना रोख निधीतून कामे सुचविता येणार नाहीत. त्यासाठी त्यांना नोंव्हेबरपर्यंत थांबावे लागणार आहे.

....

निधीसाठी गेले अन्‌ रिकाम्या हाती परतले

उपमहापौर गणेश भोसले यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यानिमित्त राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत आले होते. स्थायी समितीसाठी सभापती अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली, तसेच स्वेच्छा निधीतून केलेल्या कामांची बिले अदा करावीत. जेणे करून ठेकेदार पुढील कामे घेतील, असे नगरसेवकांचे म्हणणे होते. परंतु, आयुक्तांनी आर्थिक परिस्थितीच त्यांच्यासमोर मांडली. निधी शिल्लक नाही. कामे करणार कशी असा सवाल आयुक्तांनीच पदाधिकारी व नगरसेवकांना केला.