शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्याची जीवन ‘वारी’ अर्ध्यावरच!

By admin | Updated: June 29, 2014 00:30 IST

अहमदनगर : बँकेचे कर्ज, सावकाराचा कर्जफेडीसाठीचा तगादा त्यातच दुष्काळाचे ओझे, तरीही विठ्ठलाच्या भेटीची आस असेलेला एक शेतकरी धुळे जिल्ह्यातून पंढरपूरला निघाला खरा मात्र

अहमदनगर : बँकेचे कर्ज, सावकाराचा कर्जफेडीसाठीचा तगादा त्यातच दुष्काळाचे ओझे, तरीही विठ्ठलाच्या भेटीची आस असेलेला एक शेतकरी धुळे जिल्ह्यातून पंढरपूरला निघाला खरा मात्र या शेतकऱ्याला आषाढी वारीसह आपली जीवन ‘वारी’ही अर्ध्यावरच सोडावी लागली. नगर तालुक्यातील देहरे येथे एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक शेतकरी शुक्रवारी रात्री आढळला़ तो मृतदेह होता धनराज खंडू महाले (वय ५२, रा़ दुसाणे, ता. साक्री, जि. धुळे) या शेतकरी असलेल्या वारकऱ्याचा़महाले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल एवढीच जेमतेम शेती आहे. शेती करता करता ते हरिनामात नेहमीच तल्लीन असायचे. रोज पहाटे उठून चार-पाच वारकऱ्यांसमवेत हरिनामाचा गजर करत गावातून प्रभात फेरी काढायचे. भजनी मंडळात ते सर्वात पुढे असायचे. गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की ते त्यामध्ये भाग घ्यायचे.हाती पडेल ती कामे करून आपली सेवा पांडुरंगाचरणी अर्पण करायचे. धनराज यांच्यामागे पत्नी, चार मुली, दोन लहान मुले असा परिवार आहे. मुलींची लग्नं झाली असून मुले शाळेत शिकत आहेत. दुष्काळी स्थितीमुळे शेतात यंदा काहीच पीक आले नव्हते. त्यामुळे घरसंसार चालविण्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले. ते वेळेवर फेडता न आल्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे कर्ज फेडता येत नसल्याने धनराज नेहमीच चिंतेत असायचे.मागील वर्षांपासून धनराज हे लिमकामी ते पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीत जायचे. यावर्षीही ते उत्साहाने दिंडीत आले, मात्र डोक्यावर कर्जाचे ओझे घेऊन. त्यामुळे हरिनामातही त्यांचे लक्ष लागायचे नाही. शुक्रवारी रात्री नगर तालुक्यातील देहरे येथे दिंडी मुक्कामाला आली होती. यावेळी धनराज हे अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता दिंडीतील वाकऱ्यांनाही दिसायची. देहरे येथील रस्त्याच्या कडेला करंजीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली, असे दिंडीतील वारकऱ्यांनी सांगितले़ आत्महत्या केल्यानंतर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस कर्मचारी अनंत गायकवाड यांनी पंचनामा केला. दरम्यान मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्याचा पार्थीव देह दुसाणे येथे पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)दिंडीवर शोककळाधनराज यांच्या आत्महत्येमुळे दिंडीवर शोककळा पसरली. अनेकांची पावले थबकली. वारकऱ्यांनी अन्न-पाण्यालाही स्पर्श केला नाही. दिंडीमध्ये दुसाणे गावातील ५० वारकरी सहभागी झाले होते. ह.भ. प. संजय महाराज भंडारी हे या दिंडीचे चालक आहेत. घटनेची माहिती मिळताच तेही जिल्हा रुग्णालयात धावले.