शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी वेगळा नियम व नगर तालुका आणि अकोले तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवण्यात आला आहे. या नियमाचा फटका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहणार आहेत. नगर तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार व ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.राज्य सरकारने हवामानावर आधारित विमा योजनेसाठी विभागातून एक याप्रमाणे पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यासाठी धान्य पिकांमध्ये हरबरा व ज्वारी यांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी पीक विमा रक्कम भरत नोंदणी केली आहे. पण जनरल इंशुरन्स कंपनीने जिल्ह्यात वेगवेगळे नियम ठेवले आहेत. नगर तालुका व अकोले तालुका यांच्यासाठी तापमानाची अट किमान ७ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान गेल्यास विम्यास पात्र अशी अट ठेवली आहे, तर इतर अकरा तालुक्यांसाठी किमान ११ डिग्री सेल्सिअसच्या खाली विम्यास पात्र अशी अट ठेवण्यात आली आहे.नगर तालुक्याचे तापमान गेल्या कित्येक वर्षात ७ डिग्री पेक्षा कमी गेलेले नाही. यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी या अटीनुसार विम्यास पात्र होणार नाहीत. नगर तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यांना वेगळा नियम व नगर तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवत कंपनी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर विम्याबाबत अन्याय करीत आहेत. विशेष म्हणजे नगर तालुक्यासाठी १० डिग्री तापमानाची शिफारस राहुरी कृषी विद्यापीठाने शासनाकडे व कंपनीकडे केली असताना कंपनी मनमानी करत आहे. या कंपनीच्या अन्यायी धोरणाच्या विरोधात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.(प्रतिनिधी) शेतकरी आभारही मानत नाहीतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मी खस्ता खाल्ल्या. शेतकऱ्यांना मागील वर्षी मोठा प्रयत्न करून ३८ कोटी ५० लाखांचा लाभ मिळवून दिला. यापूर्वीही तीन-चार वर्षांपासून मी पीक विम्यासाठी संघर्ष करीत आहे. पण तालुक्यातील शेतकरी साधे आभार मानायला सुद्धा माझ्याकडे फिरकले नाहीत, अशी खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली.तालुक्यातील पुढाऱ्यांना यात रस नाहीनगर जिल्ह्यातीलच काय पण नगर तालुक्यातील पुढाऱ्यांना व जिल्हा बँकेलाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यात रस नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी फक्त मला शिव्या शाप देण्याचेच काम करतात. पण शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी त्यांचे योगदान नाही, मुळात त्यांना विम्यातले काही कळत नाही अशी टीका शेळके यांनी केली. विमा मिळाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यात सगळे पुढे पळतात असेही शेळके म्हणाले.