शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केराचा ‘फेरा’ संपेना!

By admin | Updated: August 7, 2014 00:07 IST

अहमदनगर: महापालिकेच्या खतप्रकल्प निर्मितीसाठी दाखल झालेली एकमेव निविदाही नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीने रद्द केली़

अहमदनगर: महापालिकेच्या खतप्रकल्प निर्मितीसाठी दाखल झालेली एकमेव निविदाही नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीने रद्द केली़ ठेकेदाराच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला़ ही नकारघंटा स्थायी समितीच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे़ स्थायीच्या निर्णयामुळे राष्ट्रीय हरित आयोगासमोर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत काय सांगायचे? असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे़स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली़ घनकचरा खत प्रकल्प निर्मितीसाठी प्राप्त निविदेस मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर होता़ कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर विषय यामुळे मार्गी लागणार होता़ याबाबत बुरुडगाव ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरित आयोगासमोर सुनावणी सुरू आहे़ न्यायालयाचा दर्जा असलेल्या आयोगाने कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत़ याविषयी राष्ट्रीय हरित आयोगासमोर पुन्हा शुक्रवारी सुनावणी आहे़ त्यामुळे घाईघाईने सभापतींनी ही सभा बोलविली होती़ सभेत खत प्रकल्पाच्या निविदेस मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली़ प्रशासनाने पार्श्व एंटरप्रायजेस संस्थेचा बार्शी येथील प्रकल्प पाहणीचा अहवाल सभेसमोर सादर केला़ संस्थेचा बार्शीचा प्रकल्प सुरू नाही आणि त्याची क्षमता ३० ते ४० टन एवढी आहे, असे सांगण्यात आले़ त्यावर तेथील प्रकल्प छोटा आहे़ तुलनेत आपल्या येथे १२५ टन कचरा दररोज निर्माण होतो़ एवढ्या मोठ्या कचऱ्यावर ते प्रक्रिया करू शकणार नाही, असे सांगून सभापतींनी ठेकेदाराच्या प्रतिनिधीस सभेत बोलवा, अशा सूचना केल्या़ संस्थेस काम देण्याबाबत अनेक शंका सदस्यांनी उपस्थित केल्या़ त्यामुळे ठेकेदाराला सभागृहात बोलविण्याचे ठरले आणि त्यासाठी अर्धा तास सभा तहकूब करण्यात आली़ ज्या ठेकेदारासाठी अर्धातास सभा तहकूब झाली तो महापालिकेतच होता़ त्याच्याशी बंद खोलीत चर्चा होऊन सभा पुन्हा सुरू झाली़ पण सभेत ठेकेदार आलाच नाही़ त्याचा दूरध्वनी स्वीच आॅफ झाला़ ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने सर्वच संतापले़ त्यामुळे ठेका रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत सर्व आले़ पण एका सदस्याने सोयरिक कशीबशी जमवित ठेकेदाराला बोलविले आणि तो हजर झाला़ ठेकेदारावर प्रश्नांचा भडीमार करून त्यास बाहेर जाण्यास सांगण्यात आले आणि सभापती ठेका रद्द करा, असा आदेश देऊन मोकळे झाले़ मात्र खत प्रकल्पासाठी सात दिवसांची निविदा नोटीस प्रसिध्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य दीप चव्हाण, सचिन जाधव, अजिंक्य बोरकर, गणेश कवडे यांनी सहभाग घेतला़(प्रतिनिधी)राष्ट्रीय हरित आयोगाचे ताशेरेदररोज १२५ टन कचऱ्याची निर्मिती होते़ हा कचरा बुरुडगाव परिसरात नेऊन टाकला जातो़ त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही़ गेल्या दहा वर्षांपासून हा कचरा महापालिका तेथे टाकत आहे़ प्रदुषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे़ त्यातच गावकऱ्यांनी याचिका दाखल केली आहे़ त्यावर राष्ट्रीय हरित आयोगापुढे सुनावणी सुरू असून, येत्या शुक्रवारीही यावर सुनावणी होणार आहे़ स्थायीतही सकारात्मक निर्णय झाला नाही़ त्यामुळे सुनावणीत काय निर्णय होतो, याची चिंता प्रशासनाला आहे़एक सदस्य पुन्हा ‘सोयरिकी’साठी बाहेरमागील पारगमनच्या निविदेस मंजुरीसाठी घेतलेली सभा एका सदस्याच्या सोयरिकीसाठी तहकूब केली होती़ त्याची पुनरावृत्ती आजच्या सभेतही झाली. एक सदस्य महापालिकेत असूनही सभेला हजर नव्हते. परंतु, अर्ध्या तासानंतर ते सभागृहात आले. हे सदस्य ठेकेदाराशी सोयरिक करायला गेले होते की आणखी कुणाशी अशीच चर्चा सभागृहात रंगली होती. बार्शी येथील प्रकल्पाची क्षमता ३ ते ४ टनाची आहे़ शहरात दररोज १२५ टन कचरा निर्माण होतो़ तसेच दहा वर्षांपासून पडलेला कचरा आहे़ त्यावरही प्रक्रिया करावी लागेल़ एवढ्या मोठ्या कचऱ्यावर ठेकेदार प्रक्रिया करू शकणार नाही़- किशोर डागवाले, सभापतीबार्शी येथील प्रकल्पाची माहिती घेतली असता ३ ते ४ टन कचऱ्यावरच प्रक्रिया होते़ मात्र प्रकल्पाचे उद्घाटन अद्याप झाले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे़-भालचंद्र बेहरे, उपायुक्त प्रकल्प उभारणीसाठी तीन महिन्यांची मुदतआयोगाने जूनमध्ये तीन महिन्यांची मुदत दिली होती़ त्यानुसार प्रशासनाने २४ जून रोजी स्थायी समितीस याबाबत पत्र दिले होते़ त्यावर स्थायी समितीने ८ जुलै रोजीच्या सभेत प्राप्त दरपत्रकास मंजुरी दिली़ मात्र संबंधित ठेकेदाराचे जिथे कुठे प्रकल्प असतील, त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या़ त्यानंतर याबाबत पुन्हा सभा घेण्यात आली़ यासभेतही विषय मार्गी लागला नाही़ पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय झाला़