शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विधानसभा लढवावी ही तरुणाईची इच्छा

By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST

श्रीगोंदा : कामांमुळे तिकिटाची चिंता नाही. मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी तरुणाईची इच्छा आहे. या आग्रहाखातर रिंगणात उतरल्यास पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविन,

श्रीगोंदा : कामांमुळे तिकिटाची चिंता नाही. मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी तरुणाईची इच्छा आहे. या आग्रहाखातर रिंगणात उतरल्यास पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविन, असे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट करुन निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन उसाला जादा भाव दिला. सहवीजनिर्मिती प्रकल्प उभा केला व कोळगाव जि.प. गटात अडीच वर्षात पाच कोटी चाळीस लाखांची कामे केली. लोकप्रतिनिधींना स्वत:च्या काष्टी गावात ३५ वर्षात शुध्द पाणी आणता आले नाही. ते तालुक्याचा पाणीप्रश्न कसा सोडविणार हे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांचे ऊस बिल रखडून तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की लोकप्रतिनिधींवर आली. आपले अपयश झाकण्यासाठी कुकडी कारखाना काटा मारतो, असा आरोप करण्यात आला. पाचपुतेंकडे आमदारकीची सत्ता आहे. त्यांनी ‘कुकडी’चा काटा केव्हाही तपासावा, चौकशी करावी, परंतु दिशाभूल करणारे आरोप करु नयेत, असेही जगताप यांनी सूचित केले.काम केलेला पक्ष उमेदवारी देणार आहे असे सांगून जगताप यांनी पक्षाचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. यावेळी कुंडलिक जगताप, अ‍ॅड. सुभाष डांगे, दादा औटी, धनंजय दांडेकर, संजय डुबल, मच्छिंद्र नलगे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)दुजाभाव कोणाचा ?भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या जूनपूर्वीच फळ्या काढण्यात आल्या आहेत. मग घोड नदीवरील ७२ बंधाऱ्याच्या फळ्या का काढल्या नाहीत. हा दुजाभाव कोणी केला. घोड व कुकडीचे चौथे आवर्तन सोडण्यात आले नाही. पिके जळाल्यास जबाबदार कोण? असा सवाल राहुल जगताप यांनी केला.