श्रीगोंदा : कामांमुळे तिकिटाची चिंता नाही. मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी तरुणाईची इच्छा आहे. या आग्रहाखातर रिंगणात उतरल्यास पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविन, असे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट करुन निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन उसाला जादा भाव दिला. सहवीजनिर्मिती प्रकल्प उभा केला व कोळगाव जि.प. गटात अडीच वर्षात पाच कोटी चाळीस लाखांची कामे केली. लोकप्रतिनिधींना स्वत:च्या काष्टी गावात ३५ वर्षात शुध्द पाणी आणता आले नाही. ते तालुक्याचा पाणीप्रश्न कसा सोडविणार हे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांचे ऊस बिल रखडून तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की लोकप्रतिनिधींवर आली. आपले अपयश झाकण्यासाठी कुकडी कारखाना काटा मारतो, असा आरोप करण्यात आला. पाचपुतेंकडे आमदारकीची सत्ता आहे. त्यांनी ‘कुकडी’चा काटा केव्हाही तपासावा, चौकशी करावी, परंतु दिशाभूल करणारे आरोप करु नयेत, असेही जगताप यांनी सूचित केले.काम केलेला पक्ष उमेदवारी देणार आहे असे सांगून जगताप यांनी पक्षाचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. यावेळी कुंडलिक जगताप, अॅड. सुभाष डांगे, दादा औटी, धनंजय दांडेकर, संजय डुबल, मच्छिंद्र नलगे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)दुजाभाव कोणाचा ?भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या जूनपूर्वीच फळ्या काढण्यात आल्या आहेत. मग घोड नदीवरील ७२ बंधाऱ्याच्या फळ्या का काढल्या नाहीत. हा दुजाभाव कोणी केला. घोड व कुकडीचे चौथे आवर्तन सोडण्यात आले नाही. पिके जळाल्यास जबाबदार कोण? असा सवाल राहुल जगताप यांनी केला.
विधानसभा लढवावी ही तरुणाईची इच्छा
By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST