अहमदनगर : शहर व परिसरात शंभरहून अधिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत, अशा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत गतवर्ष कंटेनरमुक्त शहर केले हाेते. याशिवाय शहरात ३५३ ठिकाणी सर्रास कचरा टकाला जात होता. हा परिसरही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्व्च्छ केला होता. मात्र नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर, ओढ्या -नाल्यांच्या कडेला कचरा टाकण्या सुरुवात केली आहे. घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने घंटा गाडीची व्यवस्था केलेली आहे. असे असताना नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१ ची तयारी सुरू केली आहे. शहरातील कचरा कुंड्यांचा माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरासह उपनगरात १०० ठिकाणी पुन्हा कचरा कुंड्या साचलेल्या आहेत. नागरिकांना वेळोवेळी सांगून सर्रास रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने आरोग्य विभागाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. त्यास मंजूरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
महापालिकेने कचरा साठविण्यासाठी ११० कंटनेर ठेवले होते. हे कंटेनर आरोग्य विभागाने उचलून घेतल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा रस्त्यावर कचरा ढिग साचू लागले आहेत. त्यामुळे शहर व परिसरात पुन्हा दर्गंधी निर्माण झाली असून, रस्त्यावर कचरा टाकणार्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड अकारण्यात येणार आहे. महापालिेकेने स्वच्छतेसाठी कडक पाऊल उचलले असून, स्वच्छता निरीक्षकांकडून पुढील आढवड्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल.
...
ओला व सुका कचरा वेगळा करणार
महापालिकेने घर ते घर कचरा संकलानासाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. ओला व सुका कचरा करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला. ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानुसार एक दिवस ओला व दुसर्या दिवशी सूका, असे कचरा संकलानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
..
मनपा कर्मचाऱ्यांना ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक
स्वच्छ सर्वेक्षणात नागिरकांचा प्रतितसाद किती आहे, यावर पालिकेला गुण मिळतात. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेत दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचार्यांना स्वच्छतेचे ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
...