शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

अहमदनगर : शहर व परिसरात शंभरहून अधिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले ...

अहमदनगर : शहर व परिसरात शंभरहून अधिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत, अशा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत गतवर्ष कंटेनरमुक्त शहर केले हाेते. याशिवाय शहरात ३५३ ठिकाणी सर्रास कचरा टकाला जात होता. हा परिसरही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्व्च्छ केला होता. मात्र नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर, ओढ्या -नाल्यांच्या कडेला कचरा टाकण्या सुरुवात केली आहे. घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने घंटा गाडीची व्यवस्था केलेली आहे. असे असताना नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१ ची तयारी सुरू केली आहे. शहरातील कचरा कुंड्यांचा माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरासह उपनगरात १०० ठिकाणी पुन्हा कचरा कुंड्या साचलेल्या आहेत. नागरिकांना वेळोवेळी सांगून सर्रास रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने आरोग्य विभागाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. त्यास मंजूरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

महापालिकेने कचरा साठविण्यासाठी ११० कंटनेर ठेवले होते. हे कंटेनर आरोग्य विभागाने उचलून घेतल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा रस्त्यावर कचरा ढिग साचू लागले आहेत. त्यामुळे शहर व परिसरात पुन्हा दर्गंधी निर्माण झाली असून, रस्त्यावर कचरा टाकणार्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड अकारण्यात येणार आहे. महापालिेकेने स्वच्छतेसाठी कडक पाऊल उचलले असून, स्वच्छता निरीक्षकांकडून पुढील आढवड्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

...

ओला व सुका कचरा वेगळा करणार

महापालिकेने घर ते घर कचरा संकलानासाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. ओला व सुका कचरा करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला. ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यानुसार एक दिवस ओला व दुसर्या दिवशी सूका, असे कचरा संकलानाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

..

मनपा कर्मचाऱ्यांना ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक

स्वच्छ सर्वेक्षणात नागिरकांचा प्रतितसाद किती आहे, यावर पालिकेला गुण मिळतात. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेत दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचार्यांना स्वच्छतेचे ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

...