शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सालकऱ्याचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

By admin | Updated: July 8, 2016 23:36 IST

अशोक निमोणकर, जामखेड ‘सून पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर २५ वर्षाचं साल सोडलं. मुलगा राम आमदार, नंतर मंत्री झाला. दीड वर्षाच्या कामाच्या जोरावर बढती मिळाली.

अशोक निमोणकर, जामखेड‘सून पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर २५ वर्षाचं साल सोडलं. मुलगा राम आमदार, नंतर मंत्री झाला. दीड वर्षाच्या कामाच्या जोरावर बढती मिळाली. वृध्दापकाळ व आम्हा दोघांना होणारा गुडघादुखीचा त्रास, यामुळे मुंबईला न जाता टी. व्ही. वरच शपथविधी पहायचा होता. पण लाईट नसल्याने ते पाहता आलं नाही. आता लाईट आली, तर पाहू दे माज्या मुलाचा शपथविधी.’ मुंबईत कॅबिनेट मंत्री म्हणून प्रा. राम शिंदे यांचा शपथविधी सुरू असताना त्यांच्या चौंडी (ता. जामखेड, जि.अहमदनगर) येथील त्यांच्या घरी त्यांच्या मातु:श्री भामाबाई शिंदे ‘लोकमत’ला सांगत होत्या.वृध्दापकाळ व आजारपणामुळे मुलाच्या शपथविधीस जाऊ न शकल्याने चौंडीच्या घरी मंत्री शिंदे यांचे वडील शंकर बापू शिंदे (वय ८०) व आई भामाबाई टी. व्ही. वर शपथविधी पाहण्यासाठी आतुरले होते. शपथविधी सुरू असताना वीज नव्हती. त्यामुळे त्यांना सोहळा पाहता आला नाही. दुपारी गप्पा मारता मारता म्हटलं, आता लाईट आहे, तर लावा बरं टी. व्ही...काही वेळाने बातम्या सुरू झाल्या. काही सेकंदासाठी शपथ घेताना मुलगा दिसताच आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. भामाबार्इंचं तीन वर्षांपूर्वी तर शंकररावांच्याही गुडघ्याचं वर्षापूर्वी आॅपरेशन झालं. मुलगा मोठा झाला, पण गावाकडची सवय झाली. इथं चार एकर शेती हाये. ती पावसावर अवलंबून आहे. चार वर्षापासून पिकच नाही. त्यांना मुलाला शेतीचं खातं मिळणार असल्याचं सांगितल्यावर ‘माझा राम शेतकऱ्यांसाठी खूप काही करील’ असं भावनिक होऊन भामाबाई म्हणाल्या. २५ वर्षे साल घालून मुलाला शिकवलं. त्याने आमचं पांग फेडलं. मोठ्या हुद्द्यावर पोहचला, असं म्हणताना वडील शंकर शिंदे यांना आनंदाच्या भावना अनावर झाल्या होत्या. आई वडिलाबरोबर चौंडी गावाने फटाके व पेढे वाटून गावाने आनंदोत्सव साजरा केला. गावातील प्रमुख कार्यकर्ते मुंबईला शपथविधीला गेल्याचे गावातील दुकानदारांनी सांगितले.टीव्हीवर शपथविधी पहा असं त्यानं सांगितलं‘दीड वर्षापूर्वी शपथविधीला गेलो होतो. रात्री साडेअकराला फोन आला होता. मला मोठं पद मिळालंय. आजारी असल्याने तुम्ही टी. व्ही. वर शपथविधी पहा, असं त्याने सांगितलं. पण लाईट नव्हती. दहाला लाईट आली. पण आम्हाला टी. व्ही. लावता येत नाही. गावातून पोरांना बोलावलं. पण बातम्या दिसत नाही’, भामाबाई डोळ्यात आनंदाश्रू आणत सांगत होत्या.