शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

भाजपाचा नगरसह आठ जागांवर दावा!

By admin | Updated: June 12, 2014 00:07 IST

विधानसभा : ताकद वाढल्याने पक्षात ‘फिल गुड’

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने भाजप नेते-कार्यकर्ते ‘फिल गुड’अनुभवित आहेत. राज्यात व जिल्ह्यात ताकद वाढल्याने युतीत भाजप लहानाचा मोठा भाऊ बनला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात निम्म्या तर जिल्ह्यात आठ जागांवर दावा सांगणार आहे.जिल्ह्यात सध्या शिवसेनेकडे ७ आणि भाजपकडे ५ जागा आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश हे केवळ नरेंद्र मोदींमुळेच मिळाले. हे भाजपसह शिवसेनेचे कार्यकर्तेही उघडपणे मान्य करतात. याच मानसिकतेचा भाजप जागावाटपावेळी फायदा उठविणार आहे.जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आठ जागा भाजपकडे घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रह धरीत आहेत. नेतेमंडळी या मागणीला अनुकूल आहेत. नगरच्या जागेवरही पक्षाने हक्क सांगावा. यासाठी कार्यकर्त्यांनी मागील बैठकीत ठराव केला. पक्षाचे नगरसेवकही त्यासाठी अनुकूल आहेत. यास उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दुजोरा दिला.नगरमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल राठोड गेल्या २० वर्षांपासून आमदार आहेत. राज्यातील जागावाटपात गुहागरची जागा भाजपने शिवसेनेच्या रामदास कदम यांच्यासाठी सोडली होती. तेथे विनय नातू हे निवडून येत. त्याबदल्यात नगरची जागा मागा असा प्रस्ताव समोर आला होता. परंतु पक्षातील शिवसेना धार्जिण्या मंडळींनीच तो फेटाळून लावल्याचे भाजपचे नेते, कार्यकर्ते सांगतात. (प्रतिनिधी)मोदींची यंत्रणा महाराष्ट्रातमोदींची यंत्रणा या आठवड्यापासून महाराष्ट्रातील प्रश्न जाणून घेण्यासाठी येणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद आहे. कोण इच्छुक आहे. कोणत्या जागेवर फेररचना होऊ शकते, या बाजू ही यंत्रणा जाणून घेणार आहे. मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय भूकंप झाला नाही. अन्यथा स्थिती वेगळी पाहायला मिळाली असती, असे भाजप नेत्याने सांगितले. कोणाकडे कितीजिल्ह्यात सध्या सात-पाच असे सूत्र आहे. श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव -पाथर्डी व नेवासा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. राहुरी आणि कर्जतमध्ये आमदार आहेत. शिवसेनेकडे नगर, शिर्डी, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगाव, अकोले व संगमनेर आहे. त्यातील संगमनेर, श्रीरामपूर आणि शिर्डी या जागा भाजप मागणार आहे. संगमनेरमध्ये थोरात यांच्या विरोधात वसंतराव गुंजाळ अवघ्या ५ हजारांनी पराभूत झाले होते. नंतर ही जागा सेनेकडे गेली. ती पुन्हा भाजपला हवी आहे. अन्य पक्षातील मंडळी भाजपच्या वाटेवर आहेत. ते मतदारसंघही भाजप मागणार आहे.भाजपची ताकद बहुतांशी मतदारसंघात वाढली आहे. जागावाटपात त्याचाही विचार केला जाईल. शिवसेनेकडे असलेल्या पण सातत्याने पराभव होणाऱ्या जागांची फेररचना करावी लागेल. महायुतीत नव्याने पक्ष आले आहेत. त्यांनाही हिस्सा द्यावा लागेल. या सर्व बाबींचा विचार प्रदेश पातळीवर सुरू आहे.-आमदार राम शिंदे, राज्य सरचिटणीस,भाजप.