शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भाजपात गटबाजीचे महाभारत सुरूच

By admin | Updated: May 28, 2014 00:13 IST

अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे.

अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे. खासदार दिलीप गांधींना मंत्रिपद न मिळाल्याने एक गट खुशीत आहे. त्यांची गद्दार, दृष्ट, कावळे अशी संभावना गांधी समर्थकांनी केली आहे. ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे, श्रीकांत साठे यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांचा समाचार घेतला आहे. गांधी यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी भाजपामधीलच एका गटाने प्रयत्न केल्याची चर्चा उघडपणे शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक काढून विरोधकांवर टीका केली आहे. गांधींना मंत्रिपद मिळू नये म्हणून काही दृष्ट प्रवृत्ती श्रेय घेत आहेत. या दवंडी पिटणार्‍या गद्दारांनी गांधी अडीच लाख मतांनी निवडून आल्याचे ध्यानात ठेवावे. पक्षातील आणि बँकेतील असंतुष्ट मंडळी नेहमी विरोधात उपद््व्याप करीत असते. परंतु ते प्रत्येक वेळी तोंडावर पडले. देशाचा कारभार पाहणारे श्रेष्ठ नेते अशा कावळ्यांच्या किवकिवाकडे लक्ष देत नसतात. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हेही त्यांनी ध्यानात ठेवावे, असे शेलके टोमणे मारले आहेत. मंत्रिमंडळ सर्वसमावेशक करताना अनेक दिग्गजांना संधी मिळाली नाही. मात्र, या पुढील विस्तारात गांधींना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. गांधी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहेत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. मुळे व साठे यांच्या या पत्रकबाजीनंतर दुसरा गट काय भूमिका घेतो. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)