शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

भाजपात गटबाजीचे महाभारत सुरूच

By admin | Updated: May 28, 2014 00:13 IST

अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे.

अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे. खासदार दिलीप गांधींना मंत्रिपद न मिळाल्याने एक गट खुशीत आहे. त्यांची गद्दार, दृष्ट, कावळे अशी संभावना गांधी समर्थकांनी केली आहे. ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे, श्रीकांत साठे यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांचा समाचार घेतला आहे. गांधी यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी भाजपामधीलच एका गटाने प्रयत्न केल्याची चर्चा उघडपणे शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक काढून विरोधकांवर टीका केली आहे. गांधींना मंत्रिपद मिळू नये म्हणून काही दृष्ट प्रवृत्ती श्रेय घेत आहेत. या दवंडी पिटणार्‍या गद्दारांनी गांधी अडीच लाख मतांनी निवडून आल्याचे ध्यानात ठेवावे. पक्षातील आणि बँकेतील असंतुष्ट मंडळी नेहमी विरोधात उपद््व्याप करीत असते. परंतु ते प्रत्येक वेळी तोंडावर पडले. देशाचा कारभार पाहणारे श्रेष्ठ नेते अशा कावळ्यांच्या किवकिवाकडे लक्ष देत नसतात. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हेही त्यांनी ध्यानात ठेवावे, असे शेलके टोमणे मारले आहेत. मंत्रिमंडळ सर्वसमावेशक करताना अनेक दिग्गजांना संधी मिळाली नाही. मात्र, या पुढील विस्तारात गांधींना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. गांधी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहेत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. मुळे व साठे यांच्या या पत्रकबाजीनंतर दुसरा गट काय भूमिका घेतो. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)