शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

४५ वर्षानंतर गाळ काढण्यास मुहूर्त

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

जामखेड : जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ ४५ वर्षानंतर प्रथमच लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे.

जामखेड : जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ ४५ वर्षानंतर प्रथमच लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाला. जामखेड नगर परिषदेने गाळ काढण्यास पुढाकार घेतला असून आजअखेर ४१ लाख रुपये जमा झाले आहेत. शहरातील अनेक दात्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश धस होते. धस म्हणाले, भुतवडा तलावातील गाळ निघावा, याविषयी जनतेच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कोणीही राजकारण न आणता मदत करावी. तालुक्यात अनेक कामासाठी निधी येतो, परंतु गाळ काढण्यास निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. नगरपरिषद निवडणुकीत तलावाच्या वरील बाजूस चार तलाव सुरेश धस यांनी केल्याने तलावात पाणी आले नाही, असा अपप्रचार करण्यात आला. पाणी अडविण्याचे राज्य शासनाच्या धरणातून प्रकल्प झाले. केवळ नकारात्मक दृष्टीने प्रचार करू नका. एखाद्या कामाला निधी आणला तर पोस्टर लावून वाहवा करू नका. तलावाशेजारील जोडतलावाला निधी आणला, टेंडर केले पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिटेंडर करण्याची वेळ आली. आता पावसाळ्यात जोडतलावाचे अपूर्ण काम होणार नाही. या साऱ्या प्रकारात मंत्र्यांची फटफजिती झाली आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रिती राळेभात, शिवसेना नेते मधुकर राळेभात, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडखे, पुणे महानगरपालिका सभागृह नेते शंकर केमसे, पुण्याचे नगरसेवक अनिल टिंगरे, विनोद पठारे, फारूक इनामदार, विकास दांगट, महेंद्र पठाडे, उद्योगपती रमेश गुगळे, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय वारे, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, बंकटराव बारवकर, विकास राळेभात, जालिंदर राळेभात, विजयसिंह गोलेकर, फिरोज कुरेशी, राजू गोरे, नगरसेवक अमित जाधव, डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) दुष्काळाची दाहकता कमी करणारमहापौर प्रशांत जगताप म्हणाले, शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळस्थिती पाहून दुष्काळीपट्टयात फिरुन काम करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आम्ही महापालिकेचे पदाधिकारी व ५६ नगरसेवकांनी एक महिन्याचा पगार, भत्ता व इतर असे ६६ लाख रुपये जमा केले. माजी मंत्री सुरेश धस सुचवतील तेथे देत आहे. त्यांनी आमच्याकडे आधी दहा लाखाची मागणी केली. आता आणखी पाच लाख मागितले, तेही देणार आहोत. ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मदतीचा हात देऊन दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही जगताप म्हणाले. मदतीसाठी हात सरसावले !माजी मंत्री सुरेश धस यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार उद्योगपती रमेश गुगळे यांनी ५० हजार, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राळेभात यांनी ३१ हजार, सोमनी डेव्हलपमेंटतर्फे ३१ हजार, युवक काँग्रेस अध्यक्ष जमीर सय्यद यांनी रोख ५ हजार दिले. बुधवारी एका दिवशी १ लाख १७ हजार रुपये जमा झाले. त्यामुळे लोकवर्गणीचा आकडा ४२ लाख १७ हजार झाला आहे.