शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

उच्च शिक्षणाला फाटा देत ८२५ युवकांना व्हायचेय उद्योजक

By admin | Updated: June 30, 2014 00:35 IST

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेमुळे हाऊसफुल्ल आहेत़ मात्र जिल्ह्यातील ८२५ युवकांनी उच्च शिक्षणाला फाटा देत स्वत: चा उद्योग उभारण्याची तयारी सुरू केली

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेमुळे हाऊसफुल्ल आहेत़ मात्र जिल्ह्यातील ८२५ युवकांनी उच्च शिक्षणाला फाटा देत स्वत: चा उद्योग उभारण्याची तयारी सुरू केली असून, जिल्हा उद्योग केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत त्यांनी अर्ज दाखल केले आहेत़ जिल्ह्यातील युवकांना उद्योजक व्हायचे असल्याचे यानिमित्तानेसमोर आले आहे़दहावीच्या निकालापासूनच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला़ बारावीचे शिक्षण पूर्ण करून काहींनी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांचा रस्ता धरला आहे़ त्यामुळे सर्वच महाविद्यालयांत प्रवेशासाठी कमालीची गर्दी झाली आहे़ अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बड्या कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी युवकांचा संघर्ष सुरू झाला आहे़ तर काहींना विदेशातील नोकरीने भुरळ घातली आहे़ मात्र काही युवकांना नोकरी नको आहे, त्यांना स्वत:उद्योग उभा करून मोठे उद्योजक होण्याची इच्छा आहे़ जिल्हा उद्योग केंद्राच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुशिक्षित युवकांनी स्वत:चा उद्योग उभा करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे़ चालूवर्षीही जिल्ह्यातील ८२५ युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे नावनोंदणी केली आहे़ शासनाने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पंतप्रधान रोजगार कार्यक्रम आणला आहे़ उत्पादनासाठी २५ लाख, तर सेवा क्षेत्रासाठी १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ हा कार्यक्रम शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी आहे़ या कार्यक्रमांतर्गत युवकांनी अर्ज केले असून, त्यांना उद्योगासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले़युवकांना उद्योग सुरू करण्याची इच्छा असते़ परंतु त्यांना प्रशिक्षण मिळत नाही़ त्यामुळे प्रशिक्षणासह कर्ज उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम आहे़ उद्योग सुरू करण्याबरोबरच तो यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपथक समितीच्या बैठकीत मुलाखतीव्दारे लाभार्थीची निवड केली जाते़ निवड झालेल्या उमेदवारांसाठी बँकेकडे कर्जाची शिफारस समितीमार्फत करण्यात येते़ राष्ट्रीयकृत बँकेकडून उद्योगासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते़ कर्जाची परतफेड तीन वर्षात करणे बंधनकारक आहे़ उद्योग सुरू करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याने युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर प्रस्ताव दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले़ उद्योग सुरू करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अनेक योजना आहेत़ मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मोठ्याप्रमाणात कर्ज उपलब्ध होत असून,त्यासाठी अर्जही दाखल होत आहेत़-एस़ ए़ भामरे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.अशी आहे योजना....उत्पादनासाठी कर्ज- २५ लाखसेवा क्षेत्रासाठी- १० लाखयुवक ८ वी उत्तीर्ण आवश्यकनव्याने उद्योग सुरू करण्यासाठी योजनास्वत:ची गुंतवणूक प्रकल्पाच्या १० टक्के