शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

संचालकांवर २०० कोटींची जबाबदारी

By admin | Updated: October 3, 2016 00:22 IST

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरसहकार खात्यातील कागदांचा केरकचरा काढून प्रशासकीय स्वच्छता केल्यानंतर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या १४५० संचालकांवर २०० कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान सहकार पंढरी असलेल्या नगर जिल्ह्यातही घोटाळेबाज संस्थांभोवती चौकशीचा फास आवळण्यात येत आहे. सहकारी पतसंस्था, सहकारी बँकांसह विविध सहकारी संस्थांमधील आर्थिक बेशिस्त, घोटाळे, गैरव्यवहार यांना चाप लावून या संस्थांमधील पैशांची उधळपट्टी करणाऱ्या संचालकांविरूद्ध कारवाई हाती घेण्यात आली आहे. एखाद्या सहकारी संस्थेविषयी तक्रारी आल्यास, लेखापरीक्षणात दोष दिसून आल्यास त्यांची महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसार चौकशी केली जाते. तर या तपासणीत अपहार, गैरव्यवहार दिसून आल्यास त्याची जबाबदारी कलम ८८ नुसार निश्चित केली जाते. ८३ नुसार २६० संस्थांची चौकशी करण्यात आली आहे. तर ८८ नुसार २५० प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कलम ८८ नुसार राज्यातील सहकारी पतसंस्था व सहकारी बँकांमधील १४५० संचालकांवर २०० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सहकार आयुक्त दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कलम ८३ नुसार वर्धमान बिगरशेती पतसंस्था वाकडी (राहाता), मोहिनीराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्था नेवासा, अश्वमेध बिगरशेती पतसंस्था वडझिरे (पारनेर), मार्तंड नागरी पतसंस्था (नगर), सह्याद्री नागरी पतसंस्था (नगर),रावसाहेब देशमुख बिगरशेती राशीन (कर्जत), समर्थ हरिदासबाबा बिगरशेती (सुपा) यांची चौकशी करण्यात आली. वर्धमान व मार्तंडची चौकशी पूर्ण झाली. तर कलम ८८ नुसार नगरमधील रावसाहेब पटवर्धन,रामकृष्ण अर्बन क्रेडिट, चंद्रमा नागरी, राशीनची पार्श्वनाथ व नम्रता, सुप्याची समर्थ हरिदास बाबा पतसंस्थेची चौकशी सुरू आहे. चांदा येथील वरदान पतसंस्थेची चौकशी पूर्ण झाली आहे. -अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.आर्थिक संस्थांबाबत सहकारी खात्याकडे तक्रारी आल्यास त्याची वेगाने चौकशी करून वस्तुस्थिती तपासून संस्थेची प्रतिमा डागाळणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. संस्थेची बाजू अगोदर ऐकून घेऊन तक्रारीत अथवा तपासणीत तथ्य आढळले तरच पुढील कारवाई करण्यात येते. तक्रारीत तथ्य नसल्यास ती तत्काळ निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.-चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त, पुणे.