शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

। धाव्याची अनुभूती।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:55 IST

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी। प्रेमे वनमाळी चित्ती धरू।।

इंद्रजित देशमुख

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी।प्रेमे वनमाळी चित्ती धरू।।या संतश्रेष्ठ सावताबाबांच्या वचनाप्रमाणे आपल्या सामान्य जीवनात हा सुखाचा सोहळा भरून आम्ही आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत वेळापूरहून निघून ठाकूर बुवांच्या समाधीजवळील या पालखी सोहळ्यातील तिसरा गोल रिंगण सोहळा आणि त्यातील आंनद अनुभवून तोंडले बोंडलेमार्गे भांडीशेगाव येथे विसावणार आहोत. मध्येच टप्प्यावेळी सोपानकाकांच्या पालखीची भेट होणार आहे. तर आमचे तुकोबाराय आज बोरगाव इथून निघून माळखांबी मार्गे तोंडल्या बोंडल्याहून पिराची कुरोलीत विसावणार आहेत. या दोन्ही पालखी सोहळ्यांतील आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे कारण माउलींच्या पालखी सोहळ्यात आज ठाकूरबुवांच्या समाधीजवळ गोल रिंगण होणार आहे आणि दुपारी सोपानकाकांची भेट होणार आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुपारी धावा अनुभवायला मिळणार आहे.तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात धावा हा एक विशेष आणि खूप आर्ततादायी सोहळा आहे. कारण पूर्वी आमचे तुकोबाराय याच मार्गे चालत पंढरीला चालले होते. तुकोबारायांचं पंढरीला जाणं आणि आमचं पंढरीला जाणं यात खूप अंतर आणि वेगळेपणा आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी अगदी उतावीळ झालेले आमचे तुकोबाराय अंत:करणातील अतीव आर्ततेने त्याला म्हणत होते,‘बा रे पांडुरंगा केंव्हा भेट देसी।झालो परदेशी तुजवीण।।तुजवीण सखा मज नाही कोणी।वाटते चरणी घालू मिठी।।ओवाळावि काया चरणा वरोनी।केंव्हा चक्रपाणी भेट देसी।।तुका म्हणे माझी पुरवावी आवडी।वेगीं घाली उडी नारायणा।।’त्यांच्या भेटीसाठी अंत:करणातून विकल झालेले तुकोबाराय आळवून आळवून त्याला म्हणत होते ‘तू मला कधी भेट देशील? तुज्यावाचून माझं सगळं जगणं परदेसी म्हणजेच अनाथपणाचं झालेलं आहे. मला लवकर भेट दे कारण तुझ्यावाचून मला कुणीच सखा नाही. मला तुझ्या पायाला घट्ट मिठी मारायची आहे. माझ्या पूर्ण कायेला तुझ्या रूपावरून ओवाळून टाकावं की काय की ज्यानंतर तू मला भेट देशील असं झालंय; पण हे देवा माझी एकच आवड पूरव आणि मला धावत येऊन भेट दे.’महाराजांच्या अंत:करणातील प्रभूच्या भेटीची आस व्यक्त करणारा आणखी एक खूप गोड अभंग आहे.‘भेटीलागी जिवा लागलीसे आस।पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन।तैसे माझे मन वाट पाहे।।दिवाळीच्या मुळा लेकी असावली।पाहतसे वाटुली पंढरीची।।भुकेलिया बाळ अतिशोक करी।वाट पाहे परी माउलीची।।तुका म्हणे मज लागलीसे भूक।धावुनी श्रीमुख दावी आता।।महाराज त्यांच्या भेटीची रात्रंदिवस वाट पाहत होते. काय सांगावी ती अवस्था, ज्याप्रमाणे चकोर नावाचा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राचे चंद्रमृत सेवण्यासाठी आसुसलेला असतो. त्याचे इतर कोणत्याच पदार्थ अथवा द्रवापासून समाधान होत नाही. महाराज मनापासून तशी वाट पाहत होते.ती वाट पाहण्यात प्रचंड आर्तता होती. दिवाळीच्या सनावेळी सासुरवासाचा जाच असणारी एखादी सासुरवाशीण ज्या आतुरतेनं आपल्या माहेरच्या दिवाळी सणाच्या निरोपाची वाट पाहत असते. महाराजांचं तसचं झालं होतं ते म्हणतात , ‘हे पांडुरंगा माझ्या डोळ्याला एकच भूक लागली आहे आणि ती म्हणजे तुझं श्रीमुख डोळ्यांनी पाहण्याची म्हणून मला लवकर भेट दे आणि मला तृप्त कर,’ असं म्हणून ते वारंवार डोळ्यातून आसवं गाळावयाचे.अंत:करणातून असे भावविभोर झालेले आमचे तुकोबाराय या परिसरातून म्हणजेच तोंडले बोंडले परिसरातून चालले होते. इथे एक नंदाचा ओढा नावाचा ओढा आहे. त्या ओढ्यात पूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अंघोळ केली होती, अशी आख्यायिका आहे. या ओढ्याजवळून जाताना आमच्या तुकोबारायांना अचानक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसल्याचा भास झाला आणि महाराज,‘तुका म्हणे धावा।आहे पंढरी विसावा।’असं म्हणून पंढरपूरच्या दिशेने धावत सुटले. यालाच धावा म्हणतात. अजूनही महाराजांचा पालखी सोहळा इथे आला की, वारकरी पंढरीच्या दिशेने धावतात यालाच धावा म्हणतात.आज आम्ही याच धाव्याची अनुभूती घेणार आहोत; पण हा धावा अनुभवताना आमच्या अंत:करणाची धाव म्हणजेच सीमा आमच्या तुकोबारायांप्रमाणेच व्यापक आणि विशाल होऊन आम्हालाही त्या सावळ्या परब्रह्मचा मनापासून लळा लागावा एवढीच माझ्या तुकोबारायांचरणी प्रार्थना.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)