शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तो मूर्तिमंत जाण दया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:54 IST

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची ...

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची पाने खाऊन सच्चिदानंदांच्या कंदातील ब्रह्मनंद आपल्या भावार्थदीपिकेच्या रूपाने जनता जनार्दनास वाटला. संन्याशांची मुले म्हणून ज्यांनी उपेक्षा केली, त्यांना शापही नाही की उश्शापही नाही. कर्मठांनी झोळी मोडून टाकल्यानंतरसुद्धा माउलीने त्यांच्यावर आपल्या कृपेची छायाच पांघरली; म्हणूनच तर कारुण्याचा मूर्तिमंत महासागर म्हणजे संत ही संतत्वाची परिभाषा आपल्या आचरणाने महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम या मायमाउलीने केले. अग्नीप्रमाणे भडकणाºया सामाजिक विकारावर आपल्या कारुण्यमय विचारांचे शिंंपण करतो तो संत, अशा दयावान, मूर्तिमंत कारुण्य पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानोबा माउली म्हणतात -तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।मी उदयजातांची तया । ऋणिया लाभे ।निर्भर्त्सर भावनेने समाजातील सर्वच प्राणिमात्रांवर समान दृष्टीने दया करतो तोच खरा संतत्वाच्या पदवीपर्यंत जाऊन पोहोचतो. कारण संताचे येणे, राहणे व जाणेसुद्धा समाजासाठीच असते. समाजाच्या कल्याणासाठी आपला देह झिजविणे ही तर संतांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोठ्यामध्ये हंबरणाºया वासरासाठी चौखूर उधळत जाऊन त्याला दुग्धपान करण्याचे पाठ गायीला कोणी शिकवीत नाही. रडून रडून आक्रोश करणाºया बालकाला छातीशी कसे कवटाळावे यासाठी आईला कुठल्या विद्यापीठाची पदवी घ्यावी लागत नाही. पिलाच्या चोचीत दाणे भरविणाºया पक्षिणीला कुठल्या मंत्रांची गरज नसते. तद्वत संतांना दुसºयावर दया करण्यासाठी मंत्र-तंत्राची गरज लागत नाही. कारण, ज्याला-ज्याला तहान लागते, तो-तो पाण्याच्या शोधार्थ भटकू लागला अन् एकदाचे का पाणी मिळाले तर पाणी ते पिणाºयाला त्याची जात, धर्म, प्रांत, देश विचारत नाही, तर तहान भागविणे हेच पाण्याचे आद्यकर्तव्य होय. तद्वत कारुण्यमूर्ती संत देशकालाच्या व व्यक्ती आणि समाजाच्या कृत्रिम बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर समान भावनेने कृपा करण्याचे कामङ्ककरतात. निंदक, सज्जन, दुर्जन, भक्त या सर्वांवर समान भावनेने कृपावंत होणारा पर्जन्य म्हणजे संत होय. आपल्या पुत्र-पौत्रादिकावर तो जेवढ्या प्रमाणात ‘दया’ करतो, त्यापेक्षा चार पटीने अधिक जे आपले संबंधी नाहीत त्यांच्यावर कृपावंत होणारी मूर्तिमंत माउली म्हणजे संत. समाजात दैवी गुणांचे संवर्धन व्हावे म्हणून ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरीच्या १६व्या अध्यायात ज्या दैवी संपदेचे अर्थात दैवी गुणांचे वर्णन केले, त्यातील अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे ‘दया’ हा होय. जेव्हा धरणीमातेच्या गर्भातून बीजाचे अंकुर होऊन उर्ध्वगामी होता-होता पर्जन्याची याचना करू लागते, तेव्हा धोऽऽ धोऽऽ कोसळणाºया पर्जन्यधारा स्वत:ला धरतीच्या गर्भात गाडून घेतात आणि अंकुराचे रोपटे व्हावे म्हणून आपल्याङ्कसमर्पणातच आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे, असे पर्जन्यधारांना वाटते. तसेच असते दयावंत संतांचे. समाजातील दुर्गुण नष्ट व्हावेत व त्याने सद्गुणांची पाऊलवाट चोखाळावी म्हणून संत नावाची कारुण्यमूर्ती स्वत:ला समाजाच्या तळाशी गाडून घेते व समाजास उर्ध्वगामी करून समाजाचे दु:ख नाहीसे झाले की त्यास तोच ब्रह्मानंद वाटतो. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायसुद्धा म्हणाले होते -दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा अन् दासीतुका म्हणे सांगो किती । तोचि भगवंताची मूर्ती ।प्रा. शिवाजीराव भुकेले