शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

तो मूर्तिमंत जाण दया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:54 IST

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची ...

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी निर्माण करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी सिद्धबेटामध्ये चंद्रमोळी झोपडी थाटून, खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन व सळसळत्या आजाण वृक्षाची पाने खाऊन सच्चिदानंदांच्या कंदातील ब्रह्मनंद आपल्या भावार्थदीपिकेच्या रूपाने जनता जनार्दनास वाटला. संन्याशांची मुले म्हणून ज्यांनी उपेक्षा केली, त्यांना शापही नाही की उश्शापही नाही. कर्मठांनी झोळी मोडून टाकल्यानंतरसुद्धा माउलीने त्यांच्यावर आपल्या कृपेची छायाच पांघरली; म्हणूनच तर कारुण्याचा मूर्तिमंत महासागर म्हणजे संत ही संतत्वाची परिभाषा आपल्या आचरणाने महाराष्ट्रासमोर आणण्याचे काम या मायमाउलीने केले. अग्नीप्रमाणे भडकणाºया सामाजिक विकारावर आपल्या कारुण्यमय विचारांचे शिंंपण करतो तो संत, अशा दयावान, मूर्तिमंत कारुण्य पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानोबा माउली म्हणतात -तो पुरुष वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।मी उदयजातांची तया । ऋणिया लाभे ।निर्भर्त्सर भावनेने समाजातील सर्वच प्राणिमात्रांवर समान दृष्टीने दया करतो तोच खरा संतत्वाच्या पदवीपर्यंत जाऊन पोहोचतो. कारण संताचे येणे, राहणे व जाणेसुद्धा समाजासाठीच असते. समाजाच्या कल्याणासाठी आपला देह झिजविणे ही तर संतांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. गोठ्यामध्ये हंबरणाºया वासरासाठी चौखूर उधळत जाऊन त्याला दुग्धपान करण्याचे पाठ गायीला कोणी शिकवीत नाही. रडून रडून आक्रोश करणाºया बालकाला छातीशी कसे कवटाळावे यासाठी आईला कुठल्या विद्यापीठाची पदवी घ्यावी लागत नाही. पिलाच्या चोचीत दाणे भरविणाºया पक्षिणीला कुठल्या मंत्रांची गरज नसते. तद्वत संतांना दुसºयावर दया करण्यासाठी मंत्र-तंत्राची गरज लागत नाही. कारण, ज्याला-ज्याला तहान लागते, तो-तो पाण्याच्या शोधार्थ भटकू लागला अन् एकदाचे का पाणी मिळाले तर पाणी ते पिणाºयाला त्याची जात, धर्म, प्रांत, देश विचारत नाही, तर तहान भागविणे हेच पाण्याचे आद्यकर्तव्य होय. तद्वत कारुण्यमूर्ती संत देशकालाच्या व व्यक्ती आणि समाजाच्या कृत्रिम बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर समान भावनेने कृपा करण्याचे कामङ्ककरतात. निंदक, सज्जन, दुर्जन, भक्त या सर्वांवर समान भावनेने कृपावंत होणारा पर्जन्य म्हणजे संत होय. आपल्या पुत्र-पौत्रादिकावर तो जेवढ्या प्रमाणात ‘दया’ करतो, त्यापेक्षा चार पटीने अधिक जे आपले संबंधी नाहीत त्यांच्यावर कृपावंत होणारी मूर्तिमंत माउली म्हणजे संत. समाजात दैवी गुणांचे संवर्धन व्हावे म्हणून ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरीच्या १६व्या अध्यायात ज्या दैवी संपदेचे अर्थात दैवी गुणांचे वर्णन केले, त्यातील अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे ‘दया’ हा होय. जेव्हा धरणीमातेच्या गर्भातून बीजाचे अंकुर होऊन उर्ध्वगामी होता-होता पर्जन्याची याचना करू लागते, तेव्हा धोऽऽ धोऽऽ कोसळणाºया पर्जन्यधारा स्वत:ला धरतीच्या गर्भात गाडून घेतात आणि अंकुराचे रोपटे व्हावे म्हणून आपल्याङ्कसमर्पणातच आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे, असे पर्जन्यधारांना वाटते. तसेच असते दयावंत संतांचे. समाजातील दुर्गुण नष्ट व्हावेत व त्याने सद्गुणांची पाऊलवाट चोखाळावी म्हणून संत नावाची कारुण्यमूर्ती स्वत:ला समाजाच्या तळाशी गाडून घेते व समाजास उर्ध्वगामी करून समाजाचे दु:ख नाहीसे झाले की त्यास तोच ब्रह्मानंद वाटतो. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायसुद्धा म्हणाले होते -दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा अन् दासीतुका म्हणे सांगो किती । तोचि भगवंताची मूर्ती ।प्रा. शिवाजीराव भुकेले