शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांची तहान भागविणारेच तहानलेले

By admin | Updated: May 23, 2016 02:24 IST

संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे

धरण उशाला-कोरड घशाला : जॅकवेल कर्मचारी, बरबडा व चौधरा गावकऱ्यांची व्यथा रूपेश उत्तरवार यवतमाळ संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे जॅकवेल कर्मचारीच निळोणा धरणाच्या पाण्यापासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चापडोह प्रकल्प किंवा लगतच्या शेतशिवारातील विहिरींवर अवलंबून रहावे लागते. निळोणा धरण पूर्णत: आटल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असा हा प्रकार पुढे आला. १९७२ ला यवतमाळच्या दक्षिणेकडे गोधनी गावाजवळ निळोणा धरण अस्तित्वात आले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या सुरक्षेसह पाणीपुरवठा नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तेथेच निवासाची व्यवस्था केली गेली. आजच्या घडीला तेथे सुमारे १५ कर्मचारी कुटुंबासह राहतात. शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांनाच या निळोणा धरणाचे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. सुरुवातीची काही वर्ष हे कर्मचारी जुन्या विहिरीचे पाणी पित होते. परंतु त्यात ब्लिचींग पावडर नसल्याने आजाराचा धोका वाढला. त्यामुळे प्रकल्प क्षेत्राच्या गावातील जुन्या विहिरींचे पाणी बंद झाले. नंतरच्या काळात चापडोह प्रकल्पावर शुद्धीकरण केंद्र तयार झाल्याने हे कर्मचारी तेथून पाणी आणतात. अनेकदा त्यांना शेतशिवारातील विहिरींचा आधार घ्यावा लागतो. कित्येकदा यवतमाळवरून पाणी नेण्याची वेळ त्यांच्यावर येते. लाखो नागरिकांना पाणी पाजणारेच तहानलेले आहेत. त्यांच्या पाणीटंचाईकडे कुणाचेच लक्ष नसते. पाणी डोळ्याने दिसते पण पिता येत नाहीनिळोणा धरणाचे अथांग पाणी घराच्या अंगणातून वर्षभर डोळ्याने दिसते. परंतु पिता येत नाही, अशी व्यथा या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बरबडा व चौधरा या गावातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविली. बरबडा गावात पाच हातपंप आहे, यातील चार दूषित असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक हातपंप आहे पण आता उन्हाळ्यात तोसुद्धा खोल गेला आहे. गावातील सार्वजनिक विहिरीला पाण्याचा थेंब नाही. शेतातील विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. चौधरा गावासाठी जलस्वराज्यमधून नळ योजना सुरू झाली. मात्र वीज पुरवठा नसल्याने व पाणी खोल गेल्याने ते मिळत नाही. आज या गावात प्रत्येकाच्या डोळ्यापुढे धरणातील पाणी आहे. मात्र ते पिता येत नाही, अशी अवस्था आहे. चौधरा गावाला जाण्यासाठी कच्चा रोड आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन ते तीन दिवस तो सुरु होत नाही. गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. केव्हाही गावातील आबालवृद्ध पाणी भरण्यातच व्यस्त दिसतात. चौधरा येथील सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली सुरेश मेश्राम यांनी गावकऱ्यांची ही व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. शुद्ध पाणी मिळत नाही - उत्तम मोकाशेनिळोणा धरणाच्या जॅकवेलवर १९७४ पासून पंप आॅपरेटर पदावर कार्यरत असलेले उत्तम मोकाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, निळोणा धरणाचे पाणी हे रॉमटेरियल आहे. त्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध झाल्यानंतरच ते शहराला पुरवठा केले जाते. परंतु निळोणातील हे शुद्ध पाणी आम्हाला कधीच मिळत नाही. चापडोहच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आम्हाला पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते.