शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलच्या चुकीच्या धोरणाचा मजुरांना फटका

By admin | Updated: May 7, 2015 01:49 IST

यवतमाळ जिल्हा हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या प्रसिद्ध आहे.

उमरखेड : यवतमाळ जिल्हा हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अशी स्थिती असताना उमरखेड तालुक्यात सुरू असलेल्या पांदण रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना चार महिन्यांपासून तहसील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मजुरीच मिळाली नाही. त्यामुळे या कामावरील मजुरांवर आत्महत्येची पाळी आली आहे.या सर्व परिस्थितीला उमरखेड तहसील प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. उमरखेड तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमार्फत मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या कुटुंबाचा गाडा योग्यरित्या चालावा, हे धोरण समोर ठेवून शासनाने ही योजना तीन वर्षांपासून राबविणे सुरू केले आहे. त्यातूनच तालुक्यातील मानकेश्वर, परजाना, साखरा, ब्राह्मणगाव, बेलखेड, झाडगाव, मुळावा, वानेगाव, आदींसह इतरही गावांचे पांदण रस्ते मजुरांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेले जात आहे. या रस्त्यावर काम सुरू आहे. मजूरही कामावर जातात. या कामावर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे.काम करणाऱ्या मजुरांचे मजुरी रेकॉर्ड जॉब कार्ड, पासबुक व आधार कार्ड आदींचे रेकॉर्ड मेंटेन केले जात आहे. नोंदणी रजिस्टर घेऊन प्रत्येक गावातील रोजगार सेवक हे उमरखेड तहसीलमध्ये येऊन डाटा आॅपरेटरकडून आॅनलाईन करून घेण्यासाठी येतात. ते आॅनलाईन झाले तरच मजुरांच्या खात्यात त्यांच्या मजुरीचे पैसे जमा होतात. परंतु गेल्या चार महिन्यांपासून रोजगार सेवक हे उमरखेड तहसील कार्यालयामध्ये केवळ येरझारा मारत आहेत. तहसीलमध्ये असलेला कंत्राटी डाटा आॅपरेटर विजय माळवे हा त्याला पूर्ण भरलेल्या फॉर्ममध्येही त्रुटी असल्याचे सांगतो. तर कधी मला वेळ नाही, कधी आॅनलाईनच बंद आहे, अशी कारणे देऊन हेतुपुरस्सर मजुरांची मजुरी आॅनलाईन काढण्यामध्ये दिरंगाई करतो. या संदर्भात रोजगार सेवक व मजुरांनी उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना माहिती दिली आहे. परंतु त्यांनीसुद्धा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. पैशासाठी तहसीलमधील आॅपरेटरकडून लोकांना नागविले जात आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील चालू असलेली रस्त्याची कामे अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्यासत्र सुरूच आहे. असे असताना तहसीलच्या या अनागोंदी कारभारामुळे मजूर वर्गावरही आत्महत्येची पाळी आली आहे. (शहर प्रतिनिधी)