शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

वन्यजीव उमरखेडमध्ये, डीएफओ पांढरकवड्यात!

By admin | Updated: October 11, 2015 00:35 IST

जिल्ह्यात वन्यजीव विभागाचे सर्वाधिक वनक्षेत्र उमरखेड तालुक्यात विस्तारले असताना त्याचे उपवनसंरक्षक कार्यालय पांढरकवडा येथे थाटले ....

५४ हजार हेक्टर वनक्षेत्र : टिपेश्वर-पैनगंगा अभयारण्य यवतमाळ : जिल्ह्यात वन्यजीव विभागाचे सर्वाधिक वनक्षेत्र उमरखेड तालुक्यात विस्तारले असताना त्याचे उपवनसंरक्षक कार्यालय पांढरकवडा येथे थाटले गेल्याने यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्च २०१४ मध्ये पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाचे स्वतंत्र उपवनसंरक्षक (डीएफओ) कार्यालय स्थापन झाले. या कार्यालयांतर्गत टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील खरबी, उमरखेड, बिटरगाव व टिपेश्वर ही चार वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. यातील खरबी, उमरखेड व बिटरगाव ही तीनही वनपरिक्षेत्र कार्यालये उमरखेड तालुका व परिसरात विस्तारलेली आहेत. त्यानंतरही डीएफओ कार्यालय तेथून १५० किलोमीटर दूर पांढरकवडा येथे थाटण्यात आले. दोनही अभयारण्यमिळून ५४ हजार ९६ हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यातील तीन वनपरिक्षेत्र मिळून तब्बल ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर टिपेश्वरमध्ये १४ हजार २९ हेक्टर क्षेत्र आहे. पांढरकवडा डीएफओ कार्यालयापासून खरबी १००, उमरखेड १२५, तर बिटरगाव वनपरिक्षेत्र १५० किलोमीटरवर आहे. कार्यालयीन कामासाठी पांढरकवड्याला येताना तेथील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होते. तेथे अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. गिरीष वशिष्ठ हे पांढरकवडा वन्यजीव विभागाचे पहिले डीएफओ आहेत. ते सहा महिने राहिले. त्यानंतर कोल्हापूर येथील टी.पी. पाटील बदलून आले. मात्र आजारामुळे त्यांना त्यांच्या गावाजवळ कोल्हापूरला सामाजिक वनीकरण विभागात बदली देण्यात आली. ७ आॅक्टोबरला ते कार्यमुक्त झाले. अद्याप या जागेवर कुणाची नियुक्ती नाही. वन्यजीव विभागाला राजेंद्र बोराडे हे एकमेव सहायक वनसंरक्षक असून त्यांचे मुख्यालय किनवटला आहे. वास्तविक अभयारण्यात दोन एसीएफची आवश्यकता आहे. त्याचा प्रस्ताव गतवर्षी एसीएफ लॉबीने मोर्चेबांधणी करून रद्द करून आणला. वन्यजीव विभागात एका एसीएफकडे चार परिक्षेत्र आहेत. तर पांढरकवडा प्रादेशिक विभागात सहा वनपरिक्षेत्रांसाठी सहा एसीएफ आहेत. वन्यजीवमध्ये एकही सर्वेअर नाही. तेथे लिपिकांचीही वाणवा आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक काढून डीएफओ कार्यालय चालविले जात आहे. वन्यजीव विभागात सुमारे १५० वनकर्मचारी सेवारत आहेत. वन्यजीव विभागात ४५ वर्षांवरील वनकर्मचाऱ्यांना नेमणूक देऊ नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र हा आदेश दुर्लक्षित करून बहुतांश सेवानिवृत्तीवर आलेल्या वनकर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमले गेले आहे. सरळ सेवेचा एकही वनपाल तेथे नाही. तेथील कर्मचाऱ्यांना अग्निशस्त्रे दिली गेली. मात्र ती चालविण्याचे प्रशिक्षण अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे वाहने आहेत मात्र इंधनाचा निधी तीन ते चार महिने मिळत नाही. पांढरकवडा डीएफओ कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. टिपेश्वरला तेलंगाणा राज्याची तर अन्य तीन वनपरिक्षेत्रांना मराठवाडा विभागाची सीमा लागलेली आहे. पूर्वी टिपेश्वर अभयारण्य नागपूरच्या पेंच अंतर्गत, तर अन्य तीन परिक्षेत्र अकोला वन्यजीव विभागात समाविष्ट होते. मात्र अकोल्यातून या वनपरिक्षेत्रांना कायम उपेक्षितच ठेवले गेले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत आणि मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी तरी अभयारण्याची दुरावस्था सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)