शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाणीटंचाईचे सावट गडद

By admin | Updated: May 16, 2015 00:14 IST

यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर व नजीकच्या ...

नियोजनाचा अभाव : रात्र जागूनही पाणी मिळत नाहीयवतमाळ : यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर व नजीकच्या ग्रामपंचायत परिसरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार या बाबत नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत आहे. परंतु आता वेळेवर काहीही करणे शक्य होताना दिसत नाही. यवतमाळ शहरातील काही भाग तसेच नजीकच्या उमरसरा, लोहारा, भोसा, मोहा आदी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षात हजारोच्या संख्येने नळजोडण्या प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहे. परंतु त्या तुलनेत नियोजन मात्र प्राधिकरणाकडून करण्यातच आलेले नाही. परिणामी मागणी जास्त आणि साठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून त्याच त्या असलेल्या पाईप लाईन जीर्ण झाल्या आहे. वारंवार पाईप लाईन लिक होत असल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असताना अनेकांना मात्र पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पाईप लाईनची दुरुस्ती करण्यामध्येच आठ-दहा दिवस लागतात. अशावेळी पाणी कोठून आणावे, हा प्रश्न आहेच. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. निळोणा धरणाची साठवण क्षमता जरी चांगली असली तरी गेल्या ४०-४५ वर्षांपासून या धरणातील गाळच काढण्यात न आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. आता कुठे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा गाळ काढणे सुरू आहे. शहरातील अनेक भागात रात्री २ नंतर कधी तरी नळाला पाणी पोहोचते. तर काही परिसरात तर रात्र जागूनही पाणी मिळत नाही. परिणामी नागरिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येतो. दिवसभर काम करायचे आणि रात्रभर पाण्यासाठी जागायचे, अशी परिस्थिती सध्या शहरात दिसून येते. अनेक ठिकाणी पाणी वेळेवर सोडल्याच जात नसल्याची तक्रार प्राधिकरणाकडे करण्यात येते. परंतु कोणत्याही तक्रारीची दखल घेण्याच्या मनस्थितीत प्राधिकरण नाही. एकीकडे पाणी न पुरवू शकणाऱ्या प्राधिकरणाचे देयके मात्र वेळेवर दिल्या जातात. त्यामध्ये न दिलेल्या पाण्याचे पैसेही नमूद असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदारांचा मनमानी कारभारप्रत्येक भागात पाणी सोडण्याची जबाबदारी विविध कंत्राटदारांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सोपविली आहे. त्यातही या कंत्राटदारांनी रोजंदारीवर माणसं नेमली आहे. ही माणसं जबाबदारीने पाणी सोडत नाही. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो.जीवन प्राधिकरणाकडे कोणत्याही बाबीची तक्रार करण्यास नागरिक गेले असता ते केवळ आपली जबाबदारी झटकून कंत्राटदार व इतर रोजंदारांची नावे सांगतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही नागरिकांना अशाच प्रकारची वागणूक मिळते.अनेक भागात आठ-आठ दिवस नळच येत नाही. त्यातही जे पाणी मिळते तेदेखील दूषित असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.