शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाणीटंचाईचे सावट गडद

By admin | Updated: May 16, 2015 00:14 IST

यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर व नजीकच्या ...

नियोजनाचा अभाव : रात्र जागूनही पाणी मिळत नाहीयवतमाळ : यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर व नजीकच्या ग्रामपंचायत परिसरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार या बाबत नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत आहे. परंतु आता वेळेवर काहीही करणे शक्य होताना दिसत नाही. यवतमाळ शहरातील काही भाग तसेच नजीकच्या उमरसरा, लोहारा, भोसा, मोहा आदी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षात हजारोच्या संख्येने नळजोडण्या प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहे. परंतु त्या तुलनेत नियोजन मात्र प्राधिकरणाकडून करण्यातच आलेले नाही. परिणामी मागणी जास्त आणि साठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून त्याच त्या असलेल्या पाईप लाईन जीर्ण झाल्या आहे. वारंवार पाईप लाईन लिक होत असल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असताना अनेकांना मात्र पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पाईप लाईनची दुरुस्ती करण्यामध्येच आठ-दहा दिवस लागतात. अशावेळी पाणी कोठून आणावे, हा प्रश्न आहेच. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. निळोणा धरणाची साठवण क्षमता जरी चांगली असली तरी गेल्या ४०-४५ वर्षांपासून या धरणातील गाळच काढण्यात न आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. आता कुठे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा गाळ काढणे सुरू आहे. शहरातील अनेक भागात रात्री २ नंतर कधी तरी नळाला पाणी पोहोचते. तर काही परिसरात तर रात्र जागूनही पाणी मिळत नाही. परिणामी नागरिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येतो. दिवसभर काम करायचे आणि रात्रभर पाण्यासाठी जागायचे, अशी परिस्थिती सध्या शहरात दिसून येते. अनेक ठिकाणी पाणी वेळेवर सोडल्याच जात नसल्याची तक्रार प्राधिकरणाकडे करण्यात येते. परंतु कोणत्याही तक्रारीची दखल घेण्याच्या मनस्थितीत प्राधिकरण नाही. एकीकडे पाणी न पुरवू शकणाऱ्या प्राधिकरणाचे देयके मात्र वेळेवर दिल्या जातात. त्यामध्ये न दिलेल्या पाण्याचे पैसेही नमूद असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदारांचा मनमानी कारभारप्रत्येक भागात पाणी सोडण्याची जबाबदारी विविध कंत्राटदारांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सोपविली आहे. त्यातही या कंत्राटदारांनी रोजंदारीवर माणसं नेमली आहे. ही माणसं जबाबदारीने पाणी सोडत नाही. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो.जीवन प्राधिकरणाकडे कोणत्याही बाबीची तक्रार करण्यास नागरिक गेले असता ते केवळ आपली जबाबदारी झटकून कंत्राटदार व इतर रोजंदारांची नावे सांगतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही नागरिकांना अशाच प्रकारची वागणूक मिळते.अनेक भागात आठ-आठ दिवस नळच येत नाही. त्यातही जे पाणी मिळते तेदेखील दूषित असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.