शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:06 IST

रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबेंबळाचे २० दरवाजे उघडले : पूर परिस्थिती बिकट होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.प्रतिसेंकद ५०० घनमिटरने बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वणी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन २००७ मध्ये वणी उपविभागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे तशीच परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ६२.३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत या तालुक्यात ५६५.११ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या फुगल्या असून त्यातच गुरूवारी सकाळी बेंबळा धरणाचे नऊ व दुपारनंतर ११ असे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने वर्धा नदी काठावरील रांगणा, कोना, उकणी, विरूळ, मुंगोली, माथोली, साखरा कोलगाव, जुगाद आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाची संभाव्य परिस्थितीवर करडी नजर असून त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज केली आहे.शेतीचे नुकसान : संयुक्त सर्वेक्षणाला प्रारंभवणीसह तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात संततधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. वणी तालुक्यात २८८९ हेक्टर शेती बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त केला आहे. मात्र महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची यंत्रणा संयुक्त सर्वेक्षणाला लागली असून झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे सर्वेक्षण करणार असून त्यांना सरपंच व पोलीस पाटील सहकार्य करतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली.रांगणालगतच्या नाल्यावर युवकाचे प्राण वाचलेगुरूवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वडगाव-रांगणा मार्गावरील एका नाल्यावर आलेल्या पुरात वाहून जाणाºया युवकाचे सतर्क नागरिकांनी प्राण वाचविले. राजू पंढरी निबुदे (३६) असे युवकाचे नाव असून तो रांगणा येथील रहिवासी आहे. गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजू रांगणा मार्गावरील नाला पार करत असताना तो पाय घसरून प्रवाहात पडला. ही बाब नाल्याच्या दोन्ही काठावर उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच, धाव घेऊन त्याला प्रवाहाबाहेर काढले.बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित तहसीलदारांना त्या-त्या भागात यंत्रणेला सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदी काठावरील गावांत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.- प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी, वणी

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणWardha Riverवर्धा नदी