शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:06 IST

रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबेंबळाचे २० दरवाजे उघडले : पूर परिस्थिती बिकट होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.प्रतिसेंकद ५०० घनमिटरने बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वणी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन २००७ मध्ये वणी उपविभागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे तशीच परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ६२.३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत या तालुक्यात ५६५.११ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या फुगल्या असून त्यातच गुरूवारी सकाळी बेंबळा धरणाचे नऊ व दुपारनंतर ११ असे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने वर्धा नदी काठावरील रांगणा, कोना, उकणी, विरूळ, मुंगोली, माथोली, साखरा कोलगाव, जुगाद आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाची संभाव्य परिस्थितीवर करडी नजर असून त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज केली आहे.शेतीचे नुकसान : संयुक्त सर्वेक्षणाला प्रारंभवणीसह तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात संततधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. वणी तालुक्यात २८८९ हेक्टर शेती बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त केला आहे. मात्र महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची यंत्रणा संयुक्त सर्वेक्षणाला लागली असून झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे सर्वेक्षण करणार असून त्यांना सरपंच व पोलीस पाटील सहकार्य करतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली.रांगणालगतच्या नाल्यावर युवकाचे प्राण वाचलेगुरूवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वडगाव-रांगणा मार्गावरील एका नाल्यावर आलेल्या पुरात वाहून जाणाºया युवकाचे सतर्क नागरिकांनी प्राण वाचविले. राजू पंढरी निबुदे (३६) असे युवकाचे नाव असून तो रांगणा येथील रहिवासी आहे. गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजू रांगणा मार्गावरील नाला पार करत असताना तो पाय घसरून प्रवाहात पडला. ही बाब नाल्याच्या दोन्ही काठावर उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच, धाव घेऊन त्याला प्रवाहाबाहेर काढले.बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित तहसीलदारांना त्या-त्या भागात यंत्रणेला सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदी काठावरील गावांत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.- प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी, वणी

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणWardha Riverवर्धा नदी