शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:06 IST

रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबेंबळाचे २० दरवाजे उघडले : पूर परिस्थिती बिकट होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.प्रतिसेंकद ५०० घनमिटरने बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वणी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन २००७ मध्ये वणी उपविभागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे तशीच परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ६२.३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत या तालुक्यात ५६५.११ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या फुगल्या असून त्यातच गुरूवारी सकाळी बेंबळा धरणाचे नऊ व दुपारनंतर ११ असे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने वर्धा नदी काठावरील रांगणा, कोना, उकणी, विरूळ, मुंगोली, माथोली, साखरा कोलगाव, जुगाद आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाची संभाव्य परिस्थितीवर करडी नजर असून त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज केली आहे.शेतीचे नुकसान : संयुक्त सर्वेक्षणाला प्रारंभवणीसह तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात संततधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. वणी तालुक्यात २८८९ हेक्टर शेती बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त केला आहे. मात्र महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची यंत्रणा संयुक्त सर्वेक्षणाला लागली असून झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे सर्वेक्षण करणार असून त्यांना सरपंच व पोलीस पाटील सहकार्य करतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली.रांगणालगतच्या नाल्यावर युवकाचे प्राण वाचलेगुरूवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वडगाव-रांगणा मार्गावरील एका नाल्यावर आलेल्या पुरात वाहून जाणाºया युवकाचे सतर्क नागरिकांनी प्राण वाचविले. राजू पंढरी निबुदे (३६) असे युवकाचे नाव असून तो रांगणा येथील रहिवासी आहे. गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजू रांगणा मार्गावरील नाला पार करत असताना तो पाय घसरून प्रवाहात पडला. ही बाब नाल्याच्या दोन्ही काठावर उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच, धाव घेऊन त्याला प्रवाहाबाहेर काढले.बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित तहसीलदारांना त्या-त्या भागात यंत्रणेला सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदी काठावरील गावांत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.- प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी, वणी

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणWardha Riverवर्धा नदी