शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

पाण्यासाठी घर सोडण्याची वेळ

By admin | Updated: May 11, 2014 00:40 IST

यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे.

यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे. अनेक नागरिकांनी पाण्यासाठी स्वत:ची घरे सोडून ज्या नातेवाईकांकडे भरपूर पाणी आहे, अशा नातेवाईकांच्या गावाला जाणे पसंंत केले आहे. प्रभाग क्र. २ मधील सुनंदा मेंढे, सविता गेडाम या महिलांंनी आम्ही सुद्धा येथे पाणीच मिळत नसल्याने गावाला जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यवतमाळ नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मध्ये तलावफैल, गवळीपुरा, विटभट्टी, अंबिकानगर, सुराणा लेआऊट, अशोकनगर, आंबेडकरनगर, राजारामनगर, दलित वस्ती सोसायटी आदी परिसर येतो. या संपूर्ण परिसरात फिरून प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधून पाणीटंचाई संदर्भात त्यांना विचारणा केली असता अतिशय गंभीर परिस्थिती दिसून आली. अधिकृत नळग्राहक वंचित ज्या नागरिकांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे रितसर अर्ज करून नळ जोडणी घेतली आहे, त्यासाठी त्यांनी जवळपास १५ हजार रुपये खर्च केला आहे. अशा लोकांना पाणी मिळत नसताना काही लोकांनी अनधिकृतपणे प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवरून नळ जोडणी घेतली आह, त्यांना मात्र भरपूर पाणी मिळते. अशा लोकांकडे पाण्याचे मीटरच नसल्यामुळे त्यांना बिलसुद्धा भरावे लागत नाही. त्यामुळे अधिकृत नळ जोडणी घेतलेल्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असल्याचे राजाराम नगरात दिसून आले. घरगुती नळांना केले खड्डे पाण्याचा दाब कमी झाल्याने ते जमिनीच्या एक फूट वरही चढत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना जमिनीखाली तीन ते चार फूटचे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात उतरून पाणी भरले जाते. परंतु महिनाभरापासून नळाला पाणीच न आल्यामुळे या खड्ड्यांचाही कोणताही उपयोग होत आहे. सायकल व रिक्षांचा वापर पाण्याचे घराजवळील सर्व स्रोत बंद असल्यामुळे नागरिकांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसते. त्यामुळे अनेक जण सायकल, रिक्षा अथवा इतर वाहनांचा पाणी आणण्यासाठी उपयोग करतात. त्यासाठी रिक्षाचे भाडेही नागरिकांना मोजावे लागते. महिनाभरापासून पाणीच नसल्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे, अशा लोकांकडून एक ते दोन रुपये गुंडाप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. या परिसरात असलेले नगर परिषदेचे बोअरवेल बंद पडले आहेत. हातपंप नाही त्यामुळे फुकटनगरातील हातपंपावरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती ज्योती बनसोड या महिलेने दिली. प्रशासनाचे दावे फोल नगरपरिषदेकडून दररोज प्रत्येक वॉर्डात टँकर पाठविण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहे. वास्तविकता मात्र वेगळी आहे. टँकर पोहोचतच नाही. त्यामुळे हे टँकर नेमके जातात कोठे, याचा शोध पालिका प्रशासनानेच घ्यावा, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. काही भागात पहिल्यांदाच टँकर पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले. या टँकरचे पाणी पाच-सहा कुटुंबीयांनाच मिळू शकले. पाटीपुरा परिसरात खड्डा खोदून पाणी भरावे लागत आहे.