शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

पाण्यासाठी घर सोडण्याची वेळ

By admin | Updated: May 11, 2014 00:40 IST

यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे.

यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे. अनेक नागरिकांनी पाण्यासाठी स्वत:ची घरे सोडून ज्या नातेवाईकांकडे भरपूर पाणी आहे, अशा नातेवाईकांच्या गावाला जाणे पसंंत केले आहे. प्रभाग क्र. २ मधील सुनंदा मेंढे, सविता गेडाम या महिलांंनी आम्ही सुद्धा येथे पाणीच मिळत नसल्याने गावाला जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यवतमाळ नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मध्ये तलावफैल, गवळीपुरा, विटभट्टी, अंबिकानगर, सुराणा लेआऊट, अशोकनगर, आंबेडकरनगर, राजारामनगर, दलित वस्ती सोसायटी आदी परिसर येतो. या संपूर्ण परिसरात फिरून प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधून पाणीटंचाई संदर्भात त्यांना विचारणा केली असता अतिशय गंभीर परिस्थिती दिसून आली. अधिकृत नळग्राहक वंचित ज्या नागरिकांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे रितसर अर्ज करून नळ जोडणी घेतली आहे, त्यासाठी त्यांनी जवळपास १५ हजार रुपये खर्च केला आहे. अशा लोकांना पाणी मिळत नसताना काही लोकांनी अनधिकृतपणे प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवरून नळ जोडणी घेतली आह, त्यांना मात्र भरपूर पाणी मिळते. अशा लोकांकडे पाण्याचे मीटरच नसल्यामुळे त्यांना बिलसुद्धा भरावे लागत नाही. त्यामुळे अधिकृत नळ जोडणी घेतलेल्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असल्याचे राजाराम नगरात दिसून आले. घरगुती नळांना केले खड्डे पाण्याचा दाब कमी झाल्याने ते जमिनीच्या एक फूट वरही चढत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना जमिनीखाली तीन ते चार फूटचे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात उतरून पाणी भरले जाते. परंतु महिनाभरापासून नळाला पाणीच न आल्यामुळे या खड्ड्यांचाही कोणताही उपयोग होत आहे. सायकल व रिक्षांचा वापर पाण्याचे घराजवळील सर्व स्रोत बंद असल्यामुळे नागरिकांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसते. त्यामुळे अनेक जण सायकल, रिक्षा अथवा इतर वाहनांचा पाणी आणण्यासाठी उपयोग करतात. त्यासाठी रिक्षाचे भाडेही नागरिकांना मोजावे लागते. महिनाभरापासून पाणीच नसल्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे, अशा लोकांकडून एक ते दोन रुपये गुंडाप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. या परिसरात असलेले नगर परिषदेचे बोअरवेल बंद पडले आहेत. हातपंप नाही त्यामुळे फुकटनगरातील हातपंपावरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती ज्योती बनसोड या महिलेने दिली. प्रशासनाचे दावे फोल नगरपरिषदेकडून दररोज प्रत्येक वॉर्डात टँकर पाठविण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहे. वास्तविकता मात्र वेगळी आहे. टँकर पोहोचतच नाही. त्यामुळे हे टँकर नेमके जातात कोठे, याचा शोध पालिका प्रशासनानेच घ्यावा, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. काही भागात पहिल्यांदाच टँकर पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले. या टँकरचे पाणी पाच-सहा कुटुंबीयांनाच मिळू शकले. पाटीपुरा परिसरात खड्डा खोदून पाणी भरावे लागत आहे.