शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

ज्ञान, सत्ता आणि धन विकासाचे तीन मार्ग

By admin | Updated: December 6, 2014 01:59 IST

व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी विकासाचे तीन मार्ग आहे. ते म्हणजे नवविचारांचे वैज्ञानिक ज्ञान, व्यवस्था परिवर्तनासाठी सत्ता ...

यवतमाळ : व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी विकासाचे तीन मार्ग आहे. ते म्हणजे नवविचारांचे वैज्ञानिक ज्ञान, व्यवस्था परिवर्तनासाठी सत्ता आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी धन. महात्मा फुलेंच्या विचारातून या तीनही गोष्टींचा समन्वय साधला आहे. म्हणून त्यांचे विचार त्यांच्या साहित्यातून समजून घेतले तर शेतकरी आत्महत्या निश्चित थांबतील असे प्रतिपादन अमरावती येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सुधीर महाजन यांनी केले. यवतमाळ येथील आझाद मैदानात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वातील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर गोबरे होेते. डॉ. महाजन म्हणाले, संघर्षाची क्षमता शेतकऱ्यांना आनुवांशिकतेने मिळाली आहे. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, पूरक उद्योगधंदे, शिक्षण, पाण्याचा योग्य वापर, नशामुक्त जीवन या अनावश्यक गोष्टींना फाटा दिला तर प्रेरणादायी वातावरण निर्माण होऊ शकते. संधीच्या रूपाने निर्मिक आमच्या जवळ असतो, दगडाच्या रुपाने नाही. घामाच्या सिंचनाने, अत्यंत कष्टाने पिकविलेले धान्य लग्नात अक्षदा म्हणून फेकले जाते. ही कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे. धान्याऐवजी महात्म्याने लग्नात फुले उधळण्याची सूचना केली आहे. बौद्ध समाजाशिवाय इतर समाजाने ही सूचना स्वीकारली नसल्याचे डॉ. महाजन म्हणाले.याच व्याख्यांनांतर्गत दुसऱ्या भागात ‘ओबीसी समाज व फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा’ या विषयावर अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्लीचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी व्याख्यान दिले. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. तरीही सर्वजण एका विचारात गुफलेले नाही. प्रत्य जात स्वत:ला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजत असते. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. त्यामुळे बहुसंख्य असूनही अनेक चळवळी करूनही पदरात फारसे यश पडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विशाखा काळे या विद्यार्थिनींने ‘मला पडलेले स्वप्न’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. शेवंताबाई गणेश फरतडे या विधवेने कर्जापोटी आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ आहे असा अर्ज स्मृती पर्वाचे आयोजक ज्ञानेश्वर गोबरे यांच्याकडे दिला होता. त्याचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला नगरपरिषद नियोजन सभापती देविदास अराठे, सत्यशोधक समाज अध्यक्ष डॉ. दिलीप घावडे, प्रा. काशिनाथ लाहोरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ राजेंद्र महाडोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, सत्यशोधक स्टडी सर्कल उपाध्यक्ष प्रा. सविता हजारे, अशोक तिखे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे, नाभीक समाज अध्यक्ष संजय मादेश्वार गोपाल कुडमेथे, ओबीसी सेवासंघाचे अध्यक्ष राजेश मुके उपस्थित होते. (सांस्कृतिक प्रतिनिधी)