शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हजारांवर शेतकरी तिष्ठत

By admin | Updated: March 24, 2017 02:15 IST

बारदाना नसल्याचे कारण पुढे करून नाफेडने पुन्हा एकदा तूर खरेदी बुधवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद केल्याने तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडून लूट : बारदान्याअभावी तूर खरेदी थांबलीवणी : बारदाना नसल्याचे कारण पुढे करून नाफेडने पुन्हा एकदा तूर खरेदी बुधवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद केल्याने तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. याचाच फायदा खासगी व्यापारी घेत आहे. चार हजार ते चार हजार २०० रुपये प्रति क्विंटल भावाने खासगी व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तूर विक्रीसाठी अद्याप ९०० शेतकरी तिष्ठत उभे आहेत. त्यांना बारदाणा येण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्याने यंदा वणी उपविभागात तुरीचा पेरा वाढला. तुरीचे उत्पादनही चांगले झाले. शेतकऱ्यांजवळील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, अशी गगनभेदी घोषणा शासनाने केली होती.त्यानुसार वणी कृषी उत्पन्ना बाजार समितीत सरकारची एजन्सी असलेल्या नाफेड मार्फत १३ जानेवारीपासून तूर खरेदीला प्रारंभ केला. ३१ जानेवारीपासून प्रत्यक्ष नाफेडकडे तुरीची आवक सुरू झाली. तत्पूर्वी तूर खरेदीसाठी २० नोव्हेंबरला १० गाठी बारदाणा आला. मात्र तुरीची आवक पाहता हा बारदाणा लवकरच संपल्याने नाफेडला २ फेब्रुवारीपासून तूर खरेदी बंद करावी लागली. त्यानंतर १८ फेब्रुवारीला १० गाठी बारदाणा नाफेडला प्राप्त झाला. १० मार्चला पुन्हा पाच गाठी व १४ मार्चला ५ गाठी असा एकूण आतापर्यंत ३० गाठी बारदाणा नाफेडला प्राप्त झाला. मात्र २२ मार्चला बारदाणा संपल्याने नाफेडने पुन्हा तुरीची खरेदी बंद केली आहे. आता पुन्हा बारदाणा कधी येईल, हे नाफेडच्या अधिकाऱ्यांनादेखील माहित नाही. तूर खेरदी बंद झाल्यानंतर ४५० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नाफेडकडून टोकन घेतले आहे, तर आणखी टोकन न घेतलेले ४५० शेतकरी तूर खरेदीची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अ.का.झाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तूर खरेदीच्या प्रारंभापासून २२ मार्चपर्यंत नाफेडने सहा हजार ९०१ क्विंटल तुरीची खरेदी केली. त्याची किंमत तीन कोटी ४८ लाख ५१ हजार ९६९ इतकी आहे. ५०९ शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत नाफेडला आपली तूर विकली. (कार्यालय प्रतिनिधी)