शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:27 IST

दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत.

ठळक मुद्देअपुरा पाऊस : पर्जन्यमानाची टक्केवारी केवळ ४४, जलसंकट गंभीर होण्याची चिन्हे

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत. वर्धा, पैनगंगा, अरुणावती या मोठ्या नदीत तर जेमतेमच पाणी आहे. इतर नद्यांचे पात्र तर अद्याप कोरडेच आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पाऊस झाल्याने ही कोरड्या दुष्काळाची चाहूल मानली जात आहे. आगामी काळात जिल्ह्यात पाणी संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, अरुणावती, बेंबळा या मोठ्या नद्यांसह विदर्भा, गोखी, अडाण, पूस, शीप, खुणी, वाघाडी, चक्रवर्ती या बारमाही वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नदी तीरावरील गावांना पुराचा फटका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येऊन या नद्या शेतशिवार उद्ध्वस्त करतात. परंतु यंदा अर्धा पावसाळा संपला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४४.७६ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत ४०७.९३ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी २४ आॅगस्टपर्यंत ६९९.२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आला नाही. परिणामी नदी तीरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील वर्धा ही प्रमुख नदी असून बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातून वाहते. पैनगंगा नदी पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, झरी आणि वणी तालुक्यातून वाहते. या दोनही नद्या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत वणी तालुक्यातील जुगाद येथे एकत्र येतात. या दोन नद्यांनी जिल्ह्याचा बहुतांश भाग सुपिक केला आहे. त्यासोबतच अनेक गावे रेड झोनमध्ये आणली आहे. परंतु यंदा या दोनही मोठ्या नद्या दुथडी भरुनही वाहल्या नाही. विदर्भा, अरुणावती, पूस, बेंबळा या नद्यांचीही अशीच अवस्था आहे.रेती घाटांचा प्रश्न कायमचयवतमाळ जिल्ह्यातून वाहणाºया नद्यांवर मोठ्या प्रमाणात रेती घाट आहे. शासनाला कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र यावर्षी या नद्यांना पूरच गेला नाही. त्यामुळे रेती वाहून आली नाही. तर दुसरीकडे नदी पात्र कोरडे असल्याने माफियांनी वारेमाप रेती उपसली. आगामी काळात रेती अभावी या घाटांची किंमत घटून जिल्ह्यात रेतीचा प्रश्न निर्माण होईल.