शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:27 IST

दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत.

ठळक मुद्देअपुरा पाऊस : पर्जन्यमानाची टक्केवारी केवळ ४४, जलसंकट गंभीर होण्याची चिन्हे

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत. वर्धा, पैनगंगा, अरुणावती या मोठ्या नदीत तर जेमतेमच पाणी आहे. इतर नद्यांचे पात्र तर अद्याप कोरडेच आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पाऊस झाल्याने ही कोरड्या दुष्काळाची चाहूल मानली जात आहे. आगामी काळात जिल्ह्यात पाणी संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, अरुणावती, बेंबळा या मोठ्या नद्यांसह विदर्भा, गोखी, अडाण, पूस, शीप, खुणी, वाघाडी, चक्रवर्ती या बारमाही वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नदी तीरावरील गावांना पुराचा फटका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येऊन या नद्या शेतशिवार उद्ध्वस्त करतात. परंतु यंदा अर्धा पावसाळा संपला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४४.७६ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत ४०७.९३ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी २४ आॅगस्टपर्यंत ६९९.२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आला नाही. परिणामी नदी तीरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील वर्धा ही प्रमुख नदी असून बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातून वाहते. पैनगंगा नदी पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, झरी आणि वणी तालुक्यातून वाहते. या दोनही नद्या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत वणी तालुक्यातील जुगाद येथे एकत्र येतात. या दोन नद्यांनी जिल्ह्याचा बहुतांश भाग सुपिक केला आहे. त्यासोबतच अनेक गावे रेड झोनमध्ये आणली आहे. परंतु यंदा या दोनही मोठ्या नद्या दुथडी भरुनही वाहल्या नाही. विदर्भा, अरुणावती, पूस, बेंबळा या नद्यांचीही अशीच अवस्था आहे.रेती घाटांचा प्रश्न कायमचयवतमाळ जिल्ह्यातून वाहणाºया नद्यांवर मोठ्या प्रमाणात रेती घाट आहे. शासनाला कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र यावर्षी या नद्यांना पूरच गेला नाही. त्यामुळे रेती वाहून आली नाही. तर दुसरीकडे नदी पात्र कोरडे असल्याने माफियांनी वारेमाप रेती उपसली. आगामी काळात रेती अभावी या घाटांची किंमत घटून जिल्ह्यात रेतीचा प्रश्न निर्माण होईल.