शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

यवतमाळ जिल्ह्यातील ५४ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर येणार गदा

By अविनाश साबापुरे | Updated: May 28, 2023 09:00 IST

Yawatmal News नॅक मूल्यांकन करण्याकडे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्ष चालविले आहे. परंतु, आता याबाबत थेट उच्च शिक्षण संचालनालयानेच कठोर भूमिका घेत अशा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखण्यासह विद्यापीठ संलग्नता काढून घेण्याबाबत सक्त इशारा दिला आहे.

यवतमाळ : वारंवार आवाहन करूनही नॅक मूल्यांकन करण्याकडे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्ष चालविले आहे. परंतु, आता याबाबत थेट उच्च शिक्षण संचालनालयानेच कठोर भूमिका घेत अशा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखण्यासह विद्यापीठ संलग्नता काढून घेण्याबाबत सक्त इशारा दिला आहे. त्याबरहुकूम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही जिल्ह्यातील अशा ५४ महाविद्यालयांना ताकिद दिली आहे. आता ऐन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या कालावधीत महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनासाठी चांगलीच धावपळ उडणार आहे. 

महाविद्यालयांमधील सोयी सुविधा आणि तेथील शैक्षणिक दर्जा याबाबत नॅक मूल्यांकन केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद (नॅक) कार्यरत आहे. ८ ऑक्टोबर २०१० शासन निर्णयानुसार महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्यांची नॅक वैधता संपुष्टात आलेली आहे, अशा महाविद्यालयांनी ३१ मार्चपर्यंत मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे आवश्यक होते. त्यासाठी संचालनालयाने २ मार्च रोजी महाविद्यालयांना अलर्टही केले होते. नॅककडे संस्था नोंदणी करून इस्टीट्यूशनल इनफाॅर्मेशन फाॅर क्वालिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अहवाल नॅक कार्यालयाकडे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तरीही बहुतांश महाविद्यालयांनी ही कार्यवाही टाळली आहे. 

आता अशा महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या दिवसापर्यंत आयआयक्यूए अहवाल नॅक कार्यालयास सादर न झाल्यास गंभीर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार अशा महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कोणतीही संलग्नता दिली जाणार नाही. त्यासाठी उच्च शिक्षण संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २३ मे रोजी सर्वच विद्यापीठांना जागे केले. त्यानंतर अमरावती विद्यापीठानेही २६ मे रोजी जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांना नॅक न केल्यास कार्यवाहीचा इशारा देणारे पत्र पाठविले आहे. 

प्रत्येक महाविद्यालयाने गुणवत्ता वाढीसाठी नॅकला सामोरे गेलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना सहा वर्षे झालीत किंवा दोन बॅचेस निघाल्या, त्या प्रत्येक महाविद्यालयाला हे मूल्यांकन बंधनकारक आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठीही ते गरजेचे आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची सध्यस्थिती २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गुगल लिंकवर पाठवावी लागेल.- डाॅ. संदीप वाघुळे, संचालक, इंटर्नल क्वालिटी अशुअरन्स सेल (आयक्यूएसी), अमरावती विद्यापीठ. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र