शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यवतमाळ जिल्ह्यातील ५४ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर येणार गदा

By अविनाश साबापुरे | Updated: May 28, 2023 09:00 IST

Yawatmal News नॅक मूल्यांकन करण्याकडे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्ष चालविले आहे. परंतु, आता याबाबत थेट उच्च शिक्षण संचालनालयानेच कठोर भूमिका घेत अशा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखण्यासह विद्यापीठ संलग्नता काढून घेण्याबाबत सक्त इशारा दिला आहे.

यवतमाळ : वारंवार आवाहन करूनही नॅक मूल्यांकन करण्याकडे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्ष चालविले आहे. परंतु, आता याबाबत थेट उच्च शिक्षण संचालनालयानेच कठोर भूमिका घेत अशा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रोखण्यासह विद्यापीठ संलग्नता काढून घेण्याबाबत सक्त इशारा दिला आहे. त्याबरहुकूम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेही जिल्ह्यातील अशा ५४ महाविद्यालयांना ताकिद दिली आहे. आता ऐन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या कालावधीत महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनासाठी चांगलीच धावपळ उडणार आहे. 

महाविद्यालयांमधील सोयी सुविधा आणि तेथील शैक्षणिक दर्जा याबाबत नॅक मूल्यांकन केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद (नॅक) कार्यरत आहे. ८ ऑक्टोबर २०१० शासन निर्णयानुसार महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्यांची नॅक वैधता संपुष्टात आलेली आहे, अशा महाविद्यालयांनी ३१ मार्चपर्यंत मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे आवश्यक होते. त्यासाठी संचालनालयाने २ मार्च रोजी महाविद्यालयांना अलर्टही केले होते. नॅककडे संस्था नोंदणी करून इस्टीट्यूशनल इनफाॅर्मेशन फाॅर क्वालिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अहवाल नॅक कार्यालयाकडे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तरीही बहुतांश महाविद्यालयांनी ही कार्यवाही टाळली आहे. 

आता अशा महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या दिवसापर्यंत आयआयक्यूए अहवाल नॅक कार्यालयास सादर न झाल्यास गंभीर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार अशा महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कोणतीही संलग्नता दिली जाणार नाही. त्यासाठी उच्च शिक्षण संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २३ मे रोजी सर्वच विद्यापीठांना जागे केले. त्यानंतर अमरावती विद्यापीठानेही २६ मे रोजी जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांना नॅक न केल्यास कार्यवाहीचा इशारा देणारे पत्र पाठविले आहे. 

प्रत्येक महाविद्यालयाने गुणवत्ता वाढीसाठी नॅकला सामोरे गेलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना सहा वर्षे झालीत किंवा दोन बॅचेस निघाल्या, त्या प्रत्येक महाविद्यालयाला हे मूल्यांकन बंधनकारक आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठीही ते गरजेचे आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची सध्यस्थिती २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गुगल लिंकवर पाठवावी लागेल.- डाॅ. संदीप वाघुळे, संचालक, इंटर्नल क्वालिटी अशुअरन्स सेल (आयक्यूएसी), अमरावती विद्यापीठ. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र