शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, वस्तूंच्या ‘एमआरपी’वर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:12 IST

वस्तूंवर बाजारात मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ (मॅक्सीमम रिटेल प्राईज) नोंदवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खुलेआम लूट सुरू आहे. ‘एमआरपी’ कुणी निश्चित करावी, ती किती असावी व त्या संबंधी तक्रार आल्यास कारवाईचे अधिकार कुणाला या मुद्यांवर येथील प्रशासनातच संभ्रमाची स्थिती पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देप्रशासनातच संभ्रम : नागरिकांची खुलेआम लूट, लोकल पॅकिंगवर मनमानी दर, स्वच्छ-दर्जाच्या आड फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वस्तूंवर बाजारात मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ (मॅक्सीमम रिटेल प्राईज) नोंदवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खुलेआम लूट सुरू आहे. ‘एमआरपी’ कुणी निश्चित करावी, ती किती असावी व त्या संबंधी तक्रार आल्यास कारवाईचे अधिकार कुणाला या मुद्यांवर येथील प्रशासनातच संभ्रमाची स्थिती पहायला मिळत आहे.‘एमआरपी’आड बाजारात ग्राहक सर्रास लुटला जातो आहे. ब्रॅन्डेड किंवा कंपनीच्या वस्तूंच्या किंमती ठरविण्याचे अधिकार त्या कंपनीला आहे. जीएसटी व प्राप्तीकराच्या माध्यमातून त्यावर अप्रत्यक्ष नियंत्रणही असते. वस्तूची निर्मिती करणाऱ्याला त्याच्या वस्तूचे दर ठरविण्याची मूभा शासनाने दिली आहे. केवळ निर्धारित दरापेक्षा अधिक किंमतीत विकू नये, याचे बंधन त्याला आहे. तसे आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. परंतु कोणताही ब्रॅन्ड अथवा कंपनीकडून निर्मित नसलेल्या वस्तूंवर किती ‘एमआरपी’असावी याचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ नोंदवून ग्राहक बाजारात लुटला जातो आहे.स्वच्छ व दर्जेदार वस्तूंसाठी बाजारपेठेतील प्रसिद्ध दुकाने, मॉल-सूपर बाजार या संस्थांमध्ये धान्य, किराणा मालाच्या वस्तूंचे आपल्या स्तरावरच पॅकिंग केले जाते. एक किलो, पाच किलो, दहा किलो अशा पद्धतीने धान्य-किराणा पॅक केला जातो. अशा पॅकिंगवर सदर विक्रेता स्वत:च आपल्या मनाने दर निश्चित करतो. त्याला वाटेल तेवढे दर निश्चित करून तो ग्राहकांकडून वसूल करतो. एखाद्या ग्राहकाने चुकून या दरावर आक्षेप नोंदविलाच तर आमच्याकडील किराणा माल स्वच्छ असतो असे बिरुद लावले जाते. त्यासाठी हा माल स्वच्छ करण्यासाठी महिला नेमल्या जातात, त्यांना किती मोबदला देतो याचा हिशेबही मांडला जातो. पारदर्शकता दाखविण्यासाठी यांत्रिक प्रकाश टाकून त्या पॅकिंग मालाची किंमत थेट संगणकात नोंदविली जाते. परंतु अशा पद्धतीने किराणा दुकानातच तुकड्यांमध्ये पॅक होणाºया मालांवर ग्राहक फसविला जात आहे. किराणा दुकानदाराला होलसेलमध्ये एक किलोची गुळाची भेली ३२ रुपयाला मिळत असताना ती कुठे ८० रुपयात तर कुठे ७० रुपयात सर्रास विकली जात आहे. या गुळाच्या भेलीवर दुकानदार कोणतीही प्रक्रिया करीत नाही. केवळ त्याला पॅकिंग केले जाते. मग ३२ रुपयांच्या या गुळाच्या भेलीचे सुमारे तीन पट दर अधिक कसे? हा मुख्य मुद्दा आहे. अशाच पद्धतीने दुकानात पॅकिंग होणाºया व कोणताही ब्रॅन्ड नसलेल्या अनेक वस्तूंमध्ये ग्राहकांची खुलेआम लूट होत आहे. पोत्याने किराणा माल आणायचा व त्याला आपल्या दुकानातच पॅकिंग करून स्वत:च ‘एमआरपी’ निश्चित करायची, असे प्रकार सर्रास सुरू आहे. विशेष असे या पॅकिंगवर लावले जाणारे लेबल कोर्डवर्डमध्ये असल्याने सहसा कुणालाही त्याची किंमत वाचता येत नाही. त्या लेबलवर मशीनने प्रकाश टाकल्यानंतरच त्या पॅक मालाची नेमकी किंमत किती हे त्या दुकानाच्या संगणकात दिसते. पॅकिंग करणारे ते, एमआरपी ठरविणारे ते आणि संगणकात फिड केलेल्या वस्तू व दरही त्यांचेच, असा एकूणच गोंधळ बाजारपेठेत सुरू आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी ग्राहक बनून यवतमाळच्या बाजारपेठेतील नामांकित दुकानांमध्ये ग्राहक बनून गेल्यास ‘एमआरपी’चा हा गोंधळ पुराव्यानिशी सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. स्वच्छ व दर्जाच्या नावाखाली नामांकित दुकानांमध्ये किलोमागे दहा ते वीस रुपये अधिक घेतले जात आहे. खाण्याच्या तेलाबाबतही असेच प्रकार पहायला मिळतात. ग्राहकाने मागितलेला ब्रॅन्ड न देता किंवा संपला आहे, असे सांगून दुसराच जादा कमिशनचा ब्रॅन्ड ग्राहकाच्या माथी मारला जातो. त्यासाठी तुम्ही सांगितलेल्या ब्रॅन्डपेक्षाही हा ब्रॅन्ड सूपर आहे, असे सांगून ग्राहकांची बोळवण केली जाते.यवतमाळच्या बाजारपेठेत ठिकठिकाणी ही लूट पहायला मिळते. स्वच्छ व दर्जाच्या नावाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या दुकानांमधून तर ग्राहकांच्या लुटीचे हे प्रमाण अधिक आहे. अशा दुकानांमध्ये सहसा श्रीमंत ग्राहकच जात असल्याने तो दर विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याचाच फायदा या दुकानदारांकडून उठविला जात आहे. स्वत:च कोणताही ब्रॅन्ड नसताना मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’निश्चित करून जादादराने वस्तू सर्रास ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. परंतु प्रशासनातून अशा ‘एमआरपी’वर कधी कोणत्या विभागाने कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.कारवाईच्या अधिकाराचा गोंधळदुकानदाराकडून पॅकिंग होणाऱ्या वस्तूवर ‘एमआरपी’ निश्चित करण्याचे अधिकार कुणाला याबाबत जिल्हा प्रशासनातील संबंधित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वत्र अनभिज्ञता आढळून आली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने आपणाला केवळ औषधांवरील ‘एमआरपी’च्या अनुषंगाने कारवाईचे अधिकार असल्याचे सांगितले. वजनमापे नियंत्रण विभागाने आपल्याला अशा कारवाईचे अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले.तर महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अशा कारवाईचे अधिकार वजनमापे विभागालाच असल्याचे सांगितले. यावरून प्रशासनातील अनभिज्ञता उघड झाली.