शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तालुका नगरपंचायत, अधिक लोकसंख्येची गावे मात्र वंचित

By admin | Updated: October 11, 2015 00:36 IST

तालुका मुख्यालयाच्या सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयावर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ : तालुका मुख्यालयाच्या सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयावर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. कमी लोकसंख्या असूनही केवळ तालुक्याची आहे म्हणून ग्रामपंचायतींची नगरपंचायत झाली. तर दुसरीकडे दहा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली डझनावर गावे मात्र नगरपंचायतीचा दर्जा व पर्यायाने विकासापासून कोसोदूर राहिली आहे. १ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस होता. या नगरपंचायतींची ही पहिलीच निवडणूक आहे. त्या अनुषंगाने तेथील मतदार संख्या व सदस्य संख्येची चर्चा होऊ लागली आहे. शासनाने तालुकास्तरावर असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना थेट नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. ते घेताना लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, तेथील सदस्य संख्या, आर्थिक स्तर याचा विचार केला गेला नाही. केवळ तालुका मुख्यालय हा एकमेव निकष ठेवला गेला. एकीकडे झरी सारख्या देशातील सर्वात लहान ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अर्थात येथून पुढे झरीला नगरविकास विभागामार्फत राज्याचा व केंद्राचा मोठ्या प्रमाणात शहरी विकासासाठी निधी मिळणार आहे. कमी लोकसंख्या असलेल्या या गावाचा झपाट्याने विकास झालेला पहायला मिळेल. या उलट अवस्था १० ते १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांची दिसेल. कारण जिल्ह्यात पाटणबोरी, मुकुटबन, मोहदा, काळीदौलत फुलसावंगी, ढाणकी, शेंबाळपिंपरी, बोरीअरब, लोही, जवळा, वडकी या सारखी अधिक लोकसंख्येची अनेक गावे आहेत. त्यांना विकासाची गरज आहे. तेथे पायाभूत सुविधांचीही मारामार आहे. ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने तेथील विकास रखडला आहे. या गावांना विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींवर अवलंबून रहावे लागते. मात्र तालुका मुख्यालय या निकषात बसत नसल्याने या गावांचा पुढे आणखी अनेक वर्ष विकास होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच या गावातील नागरिकांचा नगरपंचायतीचे धोरण ठरविणाऱ्या युती शासनाविरुद्ध रोष पहायला मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)