शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अतिपावसाने शेतात दलदल

By admin | Updated: August 10, 2016 01:17 IST

दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

ओल्या दुष्काळाचे सावट : पूर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी पुसद : दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तर अतिपावसाने सोयाबीन, तूर पीक धोक्यात आले आहे. यासोबतच नदी-नाल्यावरील शेतांना पुराचा फटका बसला आहे. पुसद उपविभागावर यावर्षी ओल्या दुष्काळाचे सावट दिसत आहे. पुसद कृषी उपविभागात महागाव, उमरखेड, पुसद आणि दिग्रस तालुक्याचा समावेश आहे. यंदा पुसद उपविभागात वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. महागाव तालुक्याने तर वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. उपविभागात दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी आता हैराण झाले आहे. या पावसामुळे चिबाड क्षेत्रासह काळ्या कसदार शेतातही दलदल झाली आहे. महिनाभरापासून दररोज कोसळणाऱ्या पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे. चिबाड क्षेत्रातील पिके तर आत्ताच पिवळी पडली असून या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. काळ्या कसदार शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाऊस उसंत देत नसल्याने आंतरमशागतीची कामे खोळंबली आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. निंदण, खुरपण आणि डवरीची कामेही ठप्प पडली आहे. परिणामी पिकांची वाढ खोळंबली आहे. महागाव तालुक्यातील अनेक शेतांमध्ये आजही तळे साचल्याचे दिसत आहे. अशीच अवस्था उमरखेड आणि दिग्रस तालुक्याचीही आहे. नदी-नाल्याच्या तीरावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. काही शेतात तर नदीतील रेती आणि दगड येऊन पडले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. पुसद येथील विदर्भ शेतकरी संघटनेने आमदार मनोहरराव नाईक यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात नदी-नाल्याच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, भवरसिंह सिसोदिया, विजय उबाळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुरुवातीला दमदार पावसामुळे शेतकरी समाधानी होता. यावर्षी मुबलक पिकण्याची आशा होती. परंतु आता शेतकऱ्यांची ही आशा मावळली आहे. अति पावसाने पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. (प्रतिनिधी) सततच्या पावसाने मजुरांचे हात रिते खरीप हंगामात मजुरांना निंदण, खुरपण यासह डवरणीची मोठ्या प्रमाणात कामे मिळतात. सणासुदीच्या दिवसात याच मजुरीवर त्यांचा प्रपंच चालविला जातो. परंतु यावर्षी सततच्या पावसाने मजुरीच मिळत नाही. कोणत्याही शेतात मजुरीचे कामे नाही. सलग १५ दिवस उन्ह तापल्याशिवाय निंदण, खुरपणाची कामे होणे शक्य नाही. अनेक शेतमजुरांना नागपंचमी सारखा सण उधार-उसणवार घेऊन करावा लागला. गावागावात मजूर ठप्प बसून असल्याचे दिसत आहे. सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.