शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अतिपावसाने शेतात दलदल

By admin | Updated: August 10, 2016 01:17 IST

दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

ओल्या दुष्काळाचे सावट : पूर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी पुसद : दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तर अतिपावसाने सोयाबीन, तूर पीक धोक्यात आले आहे. यासोबतच नदी-नाल्यावरील शेतांना पुराचा फटका बसला आहे. पुसद उपविभागावर यावर्षी ओल्या दुष्काळाचे सावट दिसत आहे. पुसद कृषी उपविभागात महागाव, उमरखेड, पुसद आणि दिग्रस तालुक्याचा समावेश आहे. यंदा पुसद उपविभागात वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. महागाव तालुक्याने तर वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. उपविभागात दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी आता हैराण झाले आहे. या पावसामुळे चिबाड क्षेत्रासह काळ्या कसदार शेतातही दलदल झाली आहे. महिनाभरापासून दररोज कोसळणाऱ्या पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे. चिबाड क्षेत्रातील पिके तर आत्ताच पिवळी पडली असून या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. काळ्या कसदार शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाऊस उसंत देत नसल्याने आंतरमशागतीची कामे खोळंबली आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. निंदण, खुरपण आणि डवरीची कामेही ठप्प पडली आहे. परिणामी पिकांची वाढ खोळंबली आहे. महागाव तालुक्यातील अनेक शेतांमध्ये आजही तळे साचल्याचे दिसत आहे. अशीच अवस्था उमरखेड आणि दिग्रस तालुक्याचीही आहे. नदी-नाल्याच्या तीरावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. काही शेतात तर नदीतील रेती आणि दगड येऊन पडले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. पुसद येथील विदर्भ शेतकरी संघटनेने आमदार मनोहरराव नाईक यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात नदी-नाल्याच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, भवरसिंह सिसोदिया, विजय उबाळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुरुवातीला दमदार पावसामुळे शेतकरी समाधानी होता. यावर्षी मुबलक पिकण्याची आशा होती. परंतु आता शेतकऱ्यांची ही आशा मावळली आहे. अति पावसाने पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. (प्रतिनिधी) सततच्या पावसाने मजुरांचे हात रिते खरीप हंगामात मजुरांना निंदण, खुरपण यासह डवरणीची मोठ्या प्रमाणात कामे मिळतात. सणासुदीच्या दिवसात याच मजुरीवर त्यांचा प्रपंच चालविला जातो. परंतु यावर्षी सततच्या पावसाने मजुरीच मिळत नाही. कोणत्याही शेतात मजुरीचे कामे नाही. सलग १५ दिवस उन्ह तापल्याशिवाय निंदण, खुरपणाची कामे होणे शक्य नाही. अनेक शेतमजुरांना नागपंचमी सारखा सण उधार-उसणवार घेऊन करावा लागला. गावागावात मजूर ठप्प बसून असल्याचे दिसत आहे. सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.