शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

गतिमान जिल्हा प्रशासनाची गतीच मंदावली

By admin | Updated: December 2, 2014 23:13 IST

जिल्ह्यात अनेक रस्ते, सिंचन, रेल्वे प्रकल्पाची कामे कार्यान्वित आहेत. परंतु सुमारे वर्षभरापासून ही कामे रखडली आहे. या कामांची जबाबदारी सांभाळण्यासाठी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी उपलब्ध नाहीत.

यवतमाळ : जिल्ह्यात अनेक रस्ते, सिंचन, रेल्वे प्रकल्पाची कामे कार्यान्वित आहेत. परंतु सुमारे वर्षभरापासून ही कामे रखडली आहे. या कामांची जबाबदारी सांभाळण्यासाठी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी उपलब्ध नाहीत. यवतमाळ जिल्हा प्रशासनाची गती सध्या मंदावली आहे. खुद्द जिल्हाधिकारी पेपरफूट प्रकरणाने संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अपर जिल्हाधिकारी आहेत मात्र जुन्या अधिकाऱ्याच्या कारनाम्यांनी ते सावध भूमिका घेताना दिसतात. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ताठर भूमिकेने महसूल यंत्रणेसह राजकीय गोटातही काहीशी नाराजी पहायला मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांची सात ते आठ पदे मंजूर आहेत. परंतु आजच्या घडीला नरेंद्र फुलझेले यांच्या रुपाने एकमेव उपजिल्हाधिकारी उपलब्ध आहेत. त्यांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या निवडणूक विभागासोबतच अन्य दोन अतिरिक्त प्रभार आहे. सध्या रस्ते प्रकल्प, लाभक्षेत्र, बेंबळा प्रकल्प, भूसंपादन, महसूल, रोजगार हमी योजना एवढ्या विभागांना पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी नाहीत. दोन विभागांचा अतिरिक्त प्रभार फुलझेलेंकडे, दोन प्रभार यवतमाळचे उपविभागीय अधिकारी टापरे यांच्याकडे तर एका विभागाचा अतिरिक्त प्रभार महसूलचे तहसीलदार राजेश आडपावार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास सर्वच विभागांचे कामकाज प्रभारावर सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजांची गती मंदावली असून बहुतांश कामे पूर्णवेळ अधिकाऱ्याअभावी रखडली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प, निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प, बेंबळा प्रकल्पाचे कालवे, नेर तालुक्यातील कोहळा प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय इतरही रस्ते प्रकल्प आहेत. मात्र या सर्व प्रकल्पांच्या कामांमध्ये पूर्णवेळ अधिकाऱ्याअभावी अडसर निर्माण झाला आहे. या प्रकल्पांसाठी कुठे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या तर कुठे संपादन प्रक्रिया सुरू आहे. कुठे जमीन संपादित करायची आहे. अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यांना मोबदल्याचे धनादेश मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सतत भूसंपादन व लाभक्षेत्र कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)