शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी परत जाण्याची चिन्हे

By admin | Updated: March 16, 2017 01:01 IST

जिल्ह्यात लागोपाठ सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांना फटका बसतो आहे.

सततच्या आचारसंहितेचा फटका : खर्चाला उरले केवळ दोन आठवडे, विकास खुंटला यवतमाळ : जिल्ह्यात लागोपाठ सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांना फटका बसतो आहे. पर्यायाने शासनाने कोट्यवधींचा निधी देऊनही तो अखर्चित राहण्याची शक्यता बळावली आहे. जिल्हा नियोजन समितीचे अडीचशे कोटींचे बजेट आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागांना वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी प्राप्त होतो. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च न झाल्यास शासनाला परत जावो. पुढील वर्षीचा निधी देताना परत आलेला निधी कमी करून बजेट तयार केले जाते. यवतमाळला शासकीय निधीच्या या खर्चात आचारसंहितेचा अडसर ठरला आहे. जिल्ह्यात सर्व प्रथम दहा नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक पार पडली. आता जिल्हा परिषदेचे ६१ सदस्य आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक झाली. लागोपाठ निवडणुका आल्याने अनेक महिन्यांपासून सतत आचारसंहिता जिल्ह्यात लागू होती. त्यामुळे शासकीय यंत्रणेला विकास कामांची प्रक्रिया मार्गी लावण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. आता मार्च महिना संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक असल्याने निधीच्या खर्चासाठी शासकीय यंत्रणेची धावाधाव होताना दिसते आहे. मात्र त्यानंतरही कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता बळावली आहे. सुरुवातीला या निधीच्या खर्चाची एजंसी जिल्हा परिषद की सार्वजनिक बांधकाम विभाग या मुद्यावरून निधी वाटपाला राजकीय स्तरावरूनही ग्रहण लावले गेले होते. फेरबदलानंतर हे ग्रहण सुटले असले, तरी अद्याप या खर्चाला गती प्राप्त झालेली नाही. तो निधी आता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाला आहे. आचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेने निविदा काढल्या. परंतु सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन विभाग, जिल्हा परिषद, सिंचन अशा विविध विभागांच्या निविदा एकाच वेळी निघाल्याने कंत्राटदारांकडून त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पर्यायाने फेरनिविदा काढाव्या लागत आहे. त्यात पुन्हा आठवडा लोटणार आहे. मग केव्हा फाईल पुढे सरकणार, केव्हा कामाचे आदेश निघणार व केव्हा प्रत्यक्ष काम सुरू होणार असा प्रश्न आहे. सध्याची स्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्र. १ व २ चा जास्तीत जास्त १० ते २० टक्के निधी खर्च होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवर तीन ‘एलएक्यू’ जिल्ह्यात निधी उपलब्ध असूनही तो का खर्च झाला नाही, या मुद्यावर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग व अमरावती विभागातील अन्य दोन आमदारांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न (एलएक्यू) उपस्थित केला आहे. ५०५४ या हेडवरील निधी जिल्हा परिषदेला जुलैपासून आतापर्यंत का दिला गेला नाही, तो अखर्चित राहिल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याच अनुषंगाने आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला जाबही विचारला. प्रशासनाने मात्र ही बाब नाकारली आहे. निधीच्या खर्चाबाबत सुरुवातीपासून नियोजन केले. परंतु सततच्या आचारसंहितेमुळे निविदा व अन्य प्रक्रियेला कमी वेळ मिळाला. तरीही अधिकाधिक निधी खर्च करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. - सचिंद्र प्रताप सिंह जिल्हाधिकारी, यवतमाळ