शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी परत जाण्याची चिन्हे

By admin | Updated: March 16, 2017 01:01 IST

जिल्ह्यात लागोपाठ सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांना फटका बसतो आहे.

सततच्या आचारसंहितेचा फटका : खर्चाला उरले केवळ दोन आठवडे, विकास खुंटला यवतमाळ : जिल्ह्यात लागोपाठ सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांना फटका बसतो आहे. पर्यायाने शासनाने कोट्यवधींचा निधी देऊनही तो अखर्चित राहण्याची शक्यता बळावली आहे. जिल्हा नियोजन समितीचे अडीचशे कोटींचे बजेट आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागांना वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी प्राप्त होतो. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च न झाल्यास शासनाला परत जावो. पुढील वर्षीचा निधी देताना परत आलेला निधी कमी करून बजेट तयार केले जाते. यवतमाळला शासकीय निधीच्या या खर्चात आचारसंहितेचा अडसर ठरला आहे. जिल्ह्यात सर्व प्रथम दहा नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक पार पडली. आता जिल्हा परिषदेचे ६१ सदस्य आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक झाली. लागोपाठ निवडणुका आल्याने अनेक महिन्यांपासून सतत आचारसंहिता जिल्ह्यात लागू होती. त्यामुळे शासकीय यंत्रणेला विकास कामांची प्रक्रिया मार्गी लावण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. आता मार्च महिना संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक असल्याने निधीच्या खर्चासाठी शासकीय यंत्रणेची धावाधाव होताना दिसते आहे. मात्र त्यानंतरही कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता बळावली आहे. सुरुवातीला या निधीच्या खर्चाची एजंसी जिल्हा परिषद की सार्वजनिक बांधकाम विभाग या मुद्यावरून निधी वाटपाला राजकीय स्तरावरूनही ग्रहण लावले गेले होते. फेरबदलानंतर हे ग्रहण सुटले असले, तरी अद्याप या खर्चाला गती प्राप्त झालेली नाही. तो निधी आता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाला आहे. आचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेने निविदा काढल्या. परंतु सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन विभाग, जिल्हा परिषद, सिंचन अशा विविध विभागांच्या निविदा एकाच वेळी निघाल्याने कंत्राटदारांकडून त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पर्यायाने फेरनिविदा काढाव्या लागत आहे. त्यात पुन्हा आठवडा लोटणार आहे. मग केव्हा फाईल पुढे सरकणार, केव्हा कामाचे आदेश निघणार व केव्हा प्रत्यक्ष काम सुरू होणार असा प्रश्न आहे. सध्याची स्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्र. १ व २ चा जास्तीत जास्त १० ते २० टक्के निधी खर्च होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवर तीन ‘एलएक्यू’ जिल्ह्यात निधी उपलब्ध असूनही तो का खर्च झाला नाही, या मुद्यावर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग व अमरावती विभागातील अन्य दोन आमदारांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न (एलएक्यू) उपस्थित केला आहे. ५०५४ या हेडवरील निधी जिल्हा परिषदेला जुलैपासून आतापर्यंत का दिला गेला नाही, तो अखर्चित राहिल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याच अनुषंगाने आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला जाबही विचारला. प्रशासनाने मात्र ही बाब नाकारली आहे. निधीच्या खर्चाबाबत सुरुवातीपासून नियोजन केले. परंतु सततच्या आचारसंहितेमुळे निविदा व अन्य प्रक्रियेला कमी वेळ मिळाला. तरीही अधिकाधिक निधी खर्च करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. - सचिंद्र प्रताप सिंह जिल्हाधिकारी, यवतमाळ