शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्यांची निर्मिती

By admin | Updated: May 10, 2014 02:31 IST

यवतमाळ शहरात काही महिन्यापूर्वी महाबीजचे बिजोत्पादन केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांच्या नियंत्रणात जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर ...

 यवतमाळ : यवतमाळ शहरात काही महिन्यापूर्वी महाबीजचे बिजोत्पादन केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांच्या नियंत्रणात जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर शेतकरी बियाणे निर्मितीचा प्रयोग राबविणार आहे. महाबिजची यंत्रणा त्याकरिता शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे. खासगी बियाणे कंपन्या आपल्या मालकीच्या कार्यक्षेत्रात बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबवितात. त्याचा नफा स्वत:च्या खिशात ओढतात. मात्र राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाबीज कंपनीने शेतकर्‍यांना बियाणे निर्मितीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकर्‍यांच्या शेतात सीडचे प्लॉट लावण्यात येणार आहे. त्याला योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. तयार झालेले बियाणे प्रक्रियेत पास झाल्यास बाजार दरापेक्षा २० टक्के अधिक दराने शेतकर्‍यांकडून खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी तीन हजार हेक्टरचे नियोजन जिल्ह्याकरिता महाबीजने तयार केले आहे. तीन हजार हेक्टरवर बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत दीड हजार हेक्टरवर बियाणे लागवड करण्यास शेतकर्‍यांनी पुढाकार दर्शविला आहे. यामध्ये सोयाबीन आणि तुरीचा समावेश आहे. पुढाकार दर्शविणार्‍या शेतकर्‍यांना बियाणे महाबीज कंपनी देणार आहे. याला जिल्ह्यातील शेतकरी कसा प्रतिसाद देतात यावर या प्रक्रियेचे यश अवलंबून राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. (शहर वार्ताहर)