शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्राचा हेतूच हरविला

By admin | Updated: December 25, 2014 23:39 IST

जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या

वणी : जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या लापरवाहीमुळे सेतू केंद्राचा मुळ हेतू बाजूला राहिला असून अजुनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या केंद्रात येरझारा माराव्या लागत आहे़ केंद्रात संगणकांची संख्या वाढली़ मात्र नागरिकांना होणार त्रास कमी झाला नाही़ सेतू केंद्राच्या या लापरवाही कारभारावर नियंत्रण ठेवणारा कोणी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे़कधीकाळी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातून मिळणारे प्रमाणपत्र जनतेला मोफत व विनासायास मिळायचे़ मात्र यासाठी शासकीय यंत्रणेच्या अनाठायी वेळ यात खर्च होत असल्याने त्यापासून महसूल मिळविता यावा व जनतेची कामेही तत्काळ व्हावी म्हणून शासकीय सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आली़ मात्र शासकीय यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सेतू केंद्र खासगी यंत्रणेकडे देण्यात आली़ येणाऱ्या महसुलामध्ये शासनाचा वाटा निश्चित करण्यात आला़ मात्र विविध कामांसाठी प्रमाणपत्रांची सक्ती सुरू झाल्याने अशी प्रमाणपत्र, शपथपत्र मागणाऱ्यांची संख्या सतत वाढत गेली़ सेतू केंद्राच्या खिडकीवर नागरिकांच्या रांगा दिसायला लागल्या़ प्रस्तावांचे ढिगारे सेतू केंद्रात साचू लागले़ दिलेल्या विहित मुदतीत नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले होते़ त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे़ मग सेतू केंद्रात दलालीचा शिरकाव झाला़ अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्यांना प्रमाणपत्र तत्काळ मिळायला लागली़ त्यामुळे सेतू केंद्रातील काही व्यक्ती दिवसभर सावज टिपण्यातच दिसत होते़ सेतू केंद्राच्या एक खिडकी योजनेला जनता कंटाळली़ त्याचे पडसाद उमटायला लागले़ त्यामुळे शासनाने यामध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी सेतू केंद्राऐवजी महा-ई सेवा सेतू केंद्र सुरू केली़ दोन संगणकाच्या जागी सहा संगणक काम करू लागले़ नागरिकांना ज्या प्रमाणपत्रासाठी १३ ते २० रूपये द्यावे लागत होते़ तेथे आता ३५ रूपये द्यावे लागत आहे़ १५ रूपयाचा अधिक भुर्दंड बसूनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येरझाराचा घालाव्या लागत आहे़ आता तयार होणारे कोणतेही प्रमाणपत्र दिलेल्या पुराव्यासह तीन डेस्कवर फिरते़ दोन डेस्कवर ओके झाल्यानंतर तिसऱ्या डेस्कवर अधिकाऱ्याची डिजीटल स्वाक्षरी होते़ मधल्या एखाद्या डेस्कवरील कर्मचारी गैरहजर किंवा रजेवर असल्यास त्या दिवसाचे कामकाज पेंडिंग राहते़ त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होतो़ सध्या आॅफ सिजन असताना सेतू केंद्राच हे हाल आहे. तर विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर या केंद्राची काय परिस्थिती राहिल, हे सांगता येत नाही. मग हे महा-ई सेवा सेतू काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होतो़ अधिकाऱ्यांनी आताच उपाययोजना केली पाहिजे. (स्थानिक प्रतिनिधी)