शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

सेतू केंद्राचा हेतूच हरविला

By admin | Updated: December 25, 2014 23:39 IST

जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या

वणी : जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या लापरवाहीमुळे सेतू केंद्राचा मुळ हेतू बाजूला राहिला असून अजुनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या केंद्रात येरझारा माराव्या लागत आहे़ केंद्रात संगणकांची संख्या वाढली़ मात्र नागरिकांना होणार त्रास कमी झाला नाही़ सेतू केंद्राच्या या लापरवाही कारभारावर नियंत्रण ठेवणारा कोणी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे़कधीकाळी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातून मिळणारे प्रमाणपत्र जनतेला मोफत व विनासायास मिळायचे़ मात्र यासाठी शासकीय यंत्रणेच्या अनाठायी वेळ यात खर्च होत असल्याने त्यापासून महसूल मिळविता यावा व जनतेची कामेही तत्काळ व्हावी म्हणून शासकीय सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आली़ मात्र शासकीय यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सेतू केंद्र खासगी यंत्रणेकडे देण्यात आली़ येणाऱ्या महसुलामध्ये शासनाचा वाटा निश्चित करण्यात आला़ मात्र विविध कामांसाठी प्रमाणपत्रांची सक्ती सुरू झाल्याने अशी प्रमाणपत्र, शपथपत्र मागणाऱ्यांची संख्या सतत वाढत गेली़ सेतू केंद्राच्या खिडकीवर नागरिकांच्या रांगा दिसायला लागल्या़ प्रस्तावांचे ढिगारे सेतू केंद्रात साचू लागले़ दिलेल्या विहित मुदतीत नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले होते़ त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे़ मग सेतू केंद्रात दलालीचा शिरकाव झाला़ अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्यांना प्रमाणपत्र तत्काळ मिळायला लागली़ त्यामुळे सेतू केंद्रातील काही व्यक्ती दिवसभर सावज टिपण्यातच दिसत होते़ सेतू केंद्राच्या एक खिडकी योजनेला जनता कंटाळली़ त्याचे पडसाद उमटायला लागले़ त्यामुळे शासनाने यामध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी सेतू केंद्राऐवजी महा-ई सेवा सेतू केंद्र सुरू केली़ दोन संगणकाच्या जागी सहा संगणक काम करू लागले़ नागरिकांना ज्या प्रमाणपत्रासाठी १३ ते २० रूपये द्यावे लागत होते़ तेथे आता ३५ रूपये द्यावे लागत आहे़ १५ रूपयाचा अधिक भुर्दंड बसूनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येरझाराचा घालाव्या लागत आहे़ आता तयार होणारे कोणतेही प्रमाणपत्र दिलेल्या पुराव्यासह तीन डेस्कवर फिरते़ दोन डेस्कवर ओके झाल्यानंतर तिसऱ्या डेस्कवर अधिकाऱ्याची डिजीटल स्वाक्षरी होते़ मधल्या एखाद्या डेस्कवरील कर्मचारी गैरहजर किंवा रजेवर असल्यास त्या दिवसाचे कामकाज पेंडिंग राहते़ त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होतो़ सध्या आॅफ सिजन असताना सेतू केंद्राच हे हाल आहे. तर विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर या केंद्राची काय परिस्थिती राहिल, हे सांगता येत नाही. मग हे महा-ई सेवा सेतू काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होतो़ अधिकाऱ्यांनी आताच उपाययोजना केली पाहिजे. (स्थानिक प्रतिनिधी)