शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

भूखंड खरेदीला बसला ‘चाप’

By admin | Updated: May 10, 2014 00:33 IST

सध्या परिसरात भूखंड खरेदी-विक्रीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. भूखंडांच्या भडकलेल्या दराने तसेच भूखंडधारकांकडून ...

वणी : सध्या परिसरात भूखंड खरेदी-विक्रीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. भूखंडांच्या भडकलेल्या दराने तसेच भूखंडधारकांकडून होणार्‍या फसवणुकीमुळे भूखंडांच्या देवाण-घेवाणीवर मंदी आली आहे. परिसरात शहराच्या चारही बाजूंनी अनेक ले-आऊट पाडले गेले आहेत़ त्यासाठी उत्पादन देणारी सुपिक जमीन अकृषक करण्यात येत आहे. यामुळे ही जमीन आता ‘वांझ’ होत आहे. येथील बाजारातील वर्दळ, वणीकरांजवळ असणारा पैसा, याचा फायदा बिल्डर लॉबी घेण्याच्या तयारीत आहे़ त्यामुळेच शहराच्या एक-दोन किलोमीटर परिसरातील कोणत्याही रस्त्यालगतचे शेत शेतकर्‍यांकडून कवडीमोल दरात घेऊन व त्याचे ले-आऊट पाडून त्यातून पैसा कमविण्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. नवनिर्मित ले-आऊटमधील प्लॉट विकण्यासाठी ग्राहकांनाही विविध आमिषे दाखविली जातात. त्यात भाग्यशाली योजना, मासिक पद्धतीने पैसे भरणे, सवलत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे फलक संबंधित ले-आउटधारकांनी जागोजागी लावले आहेत. प्लॉट विक्री योजनेची आकर्षक पत्रके, फोल्डर जागोजागी दिसून येत आहे. वर्तमान पत्रांमध्ये दररोज या ले-आउटची पत्रके हमखास दिसून येत आहे. काही ले-आऊट निवासासाठी अयोग्य जमिनीवर टाकण्यात आले आहे. तेथे भूगर्भातील पाणी वापरण्यायोग्य नाही. तरीही प्लॉट पाडून ते विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. प्रथम अनेक ले-आऊटधारक ग्राहकांना सुविधांच्या भूलथापा देतात. मात्र नंतर संबंधित ले-आउटमधील प्लॉट विकल्यानंतर सोयी-सुविधांना चक्क बगल दिली जाते, असा अनुभव ग्राहकांना येत आहे. त्यामुळे अशा ले-आउटधारकांविरुद्ध आता ग्राहक तक्रारी करू लागले आहेत़ तथापि ‘साप गेल्यानंतर भूई धोपटण्यात’ काहीच अर्थ नसतो़ वास्तविक शेतीचे अकृषकीकरण केल्यानंतर पाच वर्षांच्या आत त्या जमिनीचा निवास किंवा उद्योगासाठी वापर करणे आवश्यक असते. तसा नियमच आहे. पाच वर्षांत जर संबंधित अकृषकीकरणधारकाने नियोजित कामासाठी त्या जमिनीचा वापर केला नाही, तर अकृषकीकरण आपोआपच रद्द होते, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र तरीही परिसरात अनेक ले-आऊट कित्येक वर्षांपासून तसेच पडून आहेत़ तरीही महसूल विभाग त्याविरुद्ध कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. (स्थानिक प्रतिनिधी) अनेक ले-आउटमध्ये नागरी सुविधा नसल्याची स्थिती दिसून येत आहे.